शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

आणीबाणी समर्थक व विरोधक सत्तेसाठी एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 05:26 IST

देशात ४३ वर्षांपूर्वी आणीबाणी आणणारे आणि आणीबाणीला कडाडून विरोध करणारे सध्या सत्तेच्या लालसेसाठी एकत्र आले असून, विकासाला विरोध करून ते देशात अराजकता निर्माण करू पाहत आहेत

संत कबीर नगर (उत्तर प्रदेश) : देशात ४३ वर्षांपूर्वी आणीबाणी आणणारे आणि आणीबाणीला कडाडून विरोध करणारे सध्या सत्तेच्या लालसेसाठी एकत्र आले असून, विकासाला विरोध करून ते देशात अराजकता निर्माण करू पाहत आहेत, अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे केले.मगहर गावी असलेल्या संत कबीराच्या मजहरला (समाधी) पंतप्रधानांनी कार्यक्रमाआधी चादर चढवली. त्यानंतरच्या सभेतील त्यांचे भाषण पूर्णपणे लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराप्रमाणे होते. काँग्रेसच्या आणीबाणीला विरोध करणारे अनेक राजकीय पक्ष तसेच त्या काळात तुरुंगात गेलेले विरोधी नेते हे सध्या भाजपाविरोधी आघाडीत एकत्र आले आहेत. त्याचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की, या सर्वांच्या एकत्र येण्याचे एकच कारण आहे आणि ते म्हणजे सत्तालोलुपता. सत्तेपोटी परस्परविरोधी विचारांची मंडळी कशी एकत्र येतात, हे सर्वांना पाहायला मिळत आहे.या सभेत पंतप्रधानांनी महात्मा फुले, महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावांचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, या राष्ट्रपुरुषांनी समाजातील असमानता दूर करण्यासाठी प्रयत्न केले होते. डॉ. आंबेडकर यांनी तर सर्वांना समान अधिकार दिले, राज्यघटना दिली. पण या महापुरुषांच्या नावाने राजकारण करून समाजात दुही निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (वृत्तसंस्था)आम्ही शांतता,स्थैर्य देत आहोतकाही राजकीय पक्षांना देशात शांतता, विकास व स्थैर्य नको आहे. त्यांना हवी आहे केवळ अशांतता. देशात अशांतता व अस्थिरता असेल, तरच राजकीय फायदा उठवता येईल, असे या विरोधी पक्षांना वाटत आहे. पण या राजकीय पक्षांना व नेत्यांना देशातील जनतेचा स्वभाव माहीत नाही. जनतेला विकास, शांतता व स्थैर्य हवे आहे आणि आम्ही ते देत आहोत, असा दावा मोदींनी केला.