शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या मोबाइल वापरावर बंदी

By admin | Updated: July 14, 2017 15:02 IST

मुरादाबादच्या एका कॉलेजने विद्यार्थ्यांच्या मोबाइल फोन वापरावर बंदी आणली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुरादाबाद, दि. 14- उत्तर प्रदेशातील मुरादाबादच्या एका कॉलेजने विद्यार्थ्यांच्या मोबाइल फोन वापरावर बंदी आणली आहे. कॉलेज प्रशासनाने नोटीस जारी करून या संदर्भातील माहिती विद्यार्थ्यांना दिली आहे. मोबाइलच्या वापरामुळे विद्यार्थ्यांचं लक्ष भटकतं असल्याचं कारण देत मोबाइल वापरावर बंदी घालण्यात आली आहे. कॉलेजच्या या नव्या नियमानुसार आता कॉलेजच्या आवारात विद्यार्थ्यांना मोबाइल वापरता येणार नाही. 
 
मुरादाबादमधील महाराजा हरिशचंद्र पीजी कॉलेजमध्ये मोबाइल वापरावरील ही बंदी लागू करण्यात आली आहे. कॉलेजमधील कोणताही विद्यार्थी जर कॉलेजच्या आवारात मोबाइल वापरताना सापडला तर त्या विद्यार्थ्याचा मोबाइल जप्त केला जाइल, असं या कॉलेजने नोटीसमध्ये म्हंटलं आहे. 
 
मोबाइल फोन वापरल्याने मुलांचं अभ्यासावरून लक्ष भरकटतं आहे. विद्यार्थी सोशल मीडियावर जास्त अॅक्टीव्ह आहेत त्यामुळे त्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं आहे. कॉलेजमध्ये अभ्यासाची शिस्त कायम रहावी म्हणून मोबाइलचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं, कॉलेजचे मुख्याध्यापक डॉ.विशेष गुप्ता यांनी सांगितलं आहे. 
आणखी वाचा
 

आता व्हॉट्सअॅपवरुन कोणतीही पाठवा फाईल

भारतीय शास्त्रज्ञांनी शोधली आकशगंगा, नाव दिले "सरस्वती"

VIDEO : अकोल्यातील रॅन्चोनं बनवली मिस्ड कॉलनं सुरू होणारी बाईक

मोबाइलचा अती वापर हा सगळ्यांसाठीच घातक आहे. मोबाइल न वापरण्यासाठी आम्ही कोणतंही फर्मान जारी करत नाही आहोत. पण मुलांचं अभ्यासात लक्ष लागावं, त्यांनी वर्गात हजेरी लावावी हे आमचं ध्येय आहे. त्यासाठीच वर्गात मोबाइलचा वापर चालणार नाही. ज्या विद्यार्थ्यांला अती महत्त्वाचा फोन आला असेल त्या फोनला उत्तर द्यायलाही त्याने कॉलेजच्या बाहेर जाऊन बोलावं, असं मुख्याध्यापक विशेष गुप्ता यांनी सांगितलं आहे. मुलांना घरून मिळणारे पैसे ते मोबाइलच्या रिचार्जमध्ये खर्च करतात. यासाठीच पालकांनी मुलांचा मोबाइल किमान एकदा तरी चेक करायला हवा. त्यांनी पुरविलेले पैसे कुठे खर्च होतात याकडे लक्ष दिलं पाहिजे. विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचे दुरूपयोग माहिती नाहीत तसंच त्याचा त्यांच्या आयुष्यावर होणाऱ्या परीणामांची जाण नाही आहे. हे सगळं कमी करण्यासाठी कॉलेजच्या आवारात मोबाइल बंदी केल्याचं मुख्याध्यापक विशेष गुप्ता यांनी सांगितलं आहे.