शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

थंडीतही हवामान कोरडे!

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

थंडीतही हवामान कोरडे!

थंडीतही हवामान कोरडे!
मुंबई : राज्यात सर्वत्र कडाक्याची थंडी पडली असतानाच राज्यातील हवामान मात्र कोरडे नोंदविण्यात येत आहे. गेल्या चोविस तासांत गोव्यासह संपुर्ण राज्यातील हवामान कोरडे नोंदविण्यात आले असून, पुढील तासांसाठीदेखील गोव्यासह राज्यात हवामान कोरडे राहील, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे.
उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली असून, उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणार्‍या वार्‍याचा जोर कायम आहे. परिणामी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचा किमान तापमानाचा पारा खाली घसरला असून, शनिवारी विदर्भात थंडीची लाट आली होती. मात्र चोविस तासांतच विदर्भातील थंडीची लाट काहीशी ओसरली आहे. परंतू तरिही किमान तापमान स्थिर असल्याने थंडीचा जोर कायम आहे. हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भाच्या काही भागात किमान तापमान सरासरीपेक्षा लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाडयाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट झाली आहे. तर कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा उल्लेखनीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.
दरम्यान, मुंबईच्या किमान तापमानाचा पारा शनिवारीदेखील १९ अंश नोंदविण्यात आला असून, येथील थंड वातावरणामुळे मुंबईकरांना गारवा चांगलाच जाणवू लागला आहे. शिवाय पुढील चोविस तासांत शहरात ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून, किमान तापमान काही अंशी खाली घसरेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. (प्रतिनिधी)
......................
प्रमुख शहरांचे किमान तापमान
यवतमाळ ७.८
वर्धा ९.५
नागपूर ८.५
चंद्रपूर १०
बुलढाणा १०.६
अकोला ९.४
नांदेड ८
परभणी १०.६
उस्मानाबाद १०.३
नाशिक १०.४
मालेगाव १०
जळगाव १०
अहमदनगर ९.८
......................