शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

थंडीची लाट ओसरली; काश्मीर, पंजाबला दिलासा

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

थंडी ओसरली; १४ फेब्रुवारी २०१५

थंडी ओसरली; १४ फेब्रुवारी २०१५

उत्तर भारतातील थंडीचा जोर ओसरला
दिलासा : काश्मिरात पारा अजूनही गोठणांकाच्या आसपास
नवी दिल्ली : पंजाब, हरियाणा आणि राजस्थानसह उत्तर भारतातील थंडीचा जोर काहीसा ओसरल्याने गेल्या अनेक दिवसांपासून कडाक्याच्या थंडीने हैराण झालेल्या या भागातील जनतेला थोडासा दिलासा मिळाला आहे.
जम्मू-काश्मीर खोर्‍यातील काही भागांत पारा अजूनही गोठणांकाच्या आसपास आहे. लेहमध्ये पारा उणे २.६ अंश सेल्सियसवर असल्याचे हवामान विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले. किमान तापमान उणे १५ अंश सेल्सियसवर आल्याने कारगिल शहर मात्र गारठलेले आहे. शुक्रवारी कारगिलमध्ये तापमान उणे १६.६ अंश सेल्सियस होते.
जम्मू-काश्मीरची उन्हाळी राजधानी असलेल्या श्रीनगरात पारा उणे ०.२ अंश सेल्सियसवर उतरला. पहलगाममध्ये तापमान शून्याखाली घसरत ५.४ अंश सेल्सियस नोंदले गेले. गुलमर्गमध्ये किमान तापमान उणे २.६ अंश सेल्सियस नोंदले गेले. पुढच्या आठवड्यात जम्मू-कश्मीरमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
पंजाब, हरियाणात पारा चढला
पंजाब आणि हरियाणातील अनेक भागांतील थंडीचा कहर कमी झाला असून दोन्ही राज्यांतील किमान तापमानात वाढ झाली आहे. राजधानी चंदीगडमध्ये किमान तापमान १०.६ अंश सेल्सियस नोंदले गेले. हरियाणातील अंबाला, हिसार आणि नारनौल येथेही किमान तापमान अनुक्रमे ९.५ ते १०.६ अंशांदरम्यान नोंदले गेले. शेजारच्या पंजाब राज्यातील लुधियाना, पटियालात किमान तापमान ९.८ आणि १०.७ अंश सेल्सियस नोंदले गेले. या दोन्ही राज्यांत पुढील २४ तासांत हवामान कोरडे राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
दिल्लीकरांसाठी शनिवारची सकाळ सुसह्य ठरली.. येथील किमान तापमान १० अंश सेल्सियसच्या आसपास नोंदले गेले, तर आर्द्रतेचे प्रमाण ९३ टक्के होते. दृश्यमानताही सकाळी साडेआठ वाजता ४ हजार मीटर होती.
श्रीगंगानगर सर्वात कमी तापमान
शनिवारी पारा बर्‍यापैकी वर सरकल्याने संपूर्ण राजस्थानमधील थंडीचा जोर कमी झाला. तथापि, काल शुक्रवारी रात्री सर्वाधिक कमी तापमान श्रीगंगानगरमध्ये नोंदले गेले. राजस्थानमधील सर्वच ठिकाणी रात्रीतून तापमानाचा पारा १ ते ५ अंश सेल्सियसदरम्यान चढल्याने थंडीने हवालदिल जनतेला मोठा दिलासा मिळाला. उदयपूर, माऊंट अबू, जयपूर, अजमेर, कोटा, बारमेर, जैसलमेर, जोधपूर, चुरू आणि बिकानेर येथे किमान तापमान १०.८ ते १७.७ अंश सेल्सियसदरम्यान नोंदले गेले. येत्या २४ तासांत राजस्थानमधील तापमान आणखी वाढू शकते, असे हवामान विभागाने म्हटले आहे.