शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

थंडीची लाट ओसरली; काश्मीर, पंजाबला दिलासा

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

थंडी ओसरली; १४ फेब्रुवारी २०१५

थंडी ओसरली; १४ फेब्रुवारी २०१५

उत्तर भारतातील थंडीचा जोर ओसरला
दिलासा : काश्मिरात पारा अजूनही गोठणांकाच्या आसपास
नवी दिल्ली : पंजाब, हरियाणा आणि राजस्थानसह उत्तर भारतातील थंडीचा जोर काहीसा ओसरल्याने गेल्या अनेक दिवसांपासून कडाक्याच्या थंडीने हैराण झालेल्या या भागातील जनतेला थोडासा दिलासा मिळाला आहे.
जम्मू-काश्मीर खोर्‍यातील काही भागांत पारा अजूनही गोठणांकाच्या आसपास आहे. लेहमध्ये पारा उणे २.६ अंश सेल्सियसवर असल्याचे हवामान विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले. किमान तापमान उणे १५ अंश सेल्सियसवर आल्याने कारगिल शहर मात्र गारठलेले आहे. शुक्रवारी कारगिलमध्ये तापमान उणे १६.६ अंश सेल्सियस होते.
जम्मू-काश्मीरची उन्हाळी राजधानी असलेल्या श्रीनगरात पारा उणे ०.२ अंश सेल्सियसवर उतरला. पहलगाममध्ये तापमान शून्याखाली घसरत ५.४ अंश सेल्सियस नोंदले गेले. गुलमर्गमध्ये किमान तापमान उणे २.६ अंश सेल्सियस नोंदले गेले. पुढच्या आठवड्यात जम्मू-कश्मीरमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
पंजाब, हरियाणात पारा चढला
पंजाब आणि हरियाणातील अनेक भागांतील थंडीचा कहर कमी झाला असून दोन्ही राज्यांतील किमान तापमानात वाढ झाली आहे. राजधानी चंदीगडमध्ये किमान तापमान १०.६ अंश सेल्सियस नोंदले गेले. हरियाणातील अंबाला, हिसार आणि नारनौल येथेही किमान तापमान अनुक्रमे ९.५ ते १०.६ अंशांदरम्यान नोंदले गेले. शेजारच्या पंजाब राज्यातील लुधियाना, पटियालात किमान तापमान ९.८ आणि १०.७ अंश सेल्सियस नोंदले गेले. या दोन्ही राज्यांत पुढील २४ तासांत हवामान कोरडे राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
दिल्लीकरांसाठी शनिवारची सकाळ सुसह्य ठरली.. येथील किमान तापमान १० अंश सेल्सियसच्या आसपास नोंदले गेले, तर आर्द्रतेचे प्रमाण ९३ टक्के होते. दृश्यमानताही सकाळी साडेआठ वाजता ४ हजार मीटर होती.
श्रीगंगानगर सर्वात कमी तापमान
शनिवारी पारा बर्‍यापैकी वर सरकल्याने संपूर्ण राजस्थानमधील थंडीचा जोर कमी झाला. तथापि, काल शुक्रवारी रात्री सर्वाधिक कमी तापमान श्रीगंगानगरमध्ये नोंदले गेले. राजस्थानमधील सर्वच ठिकाणी रात्रीतून तापमानाचा पारा १ ते ५ अंश सेल्सियसदरम्यान चढल्याने थंडीने हवालदिल जनतेला मोठा दिलासा मिळाला. उदयपूर, माऊंट अबू, जयपूर, अजमेर, कोटा, बारमेर, जैसलमेर, जोधपूर, चुरू आणि बिकानेर येथे किमान तापमान १०.८ ते १७.७ अंश सेल्सियसदरम्यान नोंदले गेले. येत्या २४ तासांत राजस्थानमधील तापमान आणखी वाढू शकते, असे हवामान विभागाने म्हटले आहे.