शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
3
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
5
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
6
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
7
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
8
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
9
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
10
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
11
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
12
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
13
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
14
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
15
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
16
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
17
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
18
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
19
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
20
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश

दाल सरोवरासह काश्मिरातील जलाशय गोठले उत्तर भारतात थंडीची लाट

By admin | Updated: December 27, 2014 23:38 IST

श्रीनगर - येथील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेले दाल सरोवर व शहरातील अन्य जलाशय गोठले असून, शुक्रवारची रात्र ही या हंगामातील सर्वात थंड रात्र म्हणून नोंदविली गेली. त्या रात्री येथील तापमान उणे ५.६ अंश सेल्सिअस एवढे होते.

श्रीनगर - येथील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेले दाल सरोवर व शहरातील अन्य जलाशय गोठले असून, शुक्रवारची रात्र ही या हंगामातील सर्वात थंड रात्र म्हणून नोंदविली गेली. त्या रात्री येथील तापमान उणे ५.६ अंश सेल्सिअस एवढे होते.
थंडीचा कडाका वाढल्याने तापमान १.५ अंशाने घसरून शहराच्या मध्यभागी असलेले दाल सरोवर अंशत: गोठले गेले. या सरोवरात शिकारे चालवून आपले पोट भरणाऱ्या मल्लाहांनी अनेक ठिकाणी बर्फ तोडून आपले शिकारे किनाऱ्यापर्यंत नेले. शहरातील नळांमध्येही पाणी गोठले गेले होते. थंडीमुळे स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असले तरी, दुसरीकडे पर्यटकांना मात्र ही थंडी पर्वणीसारखी वाटत आहे. पहाटेच्या वेळी दाटलेल्या धुक्यामुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. लडाख भागातील लेहमध्ये किमान तापमान उणे १६.४ तर कारगीलमध्ये किमान तापमान उणे १४.५ अंश एवढे नोंदवले गेले.

उत्तर प्रदेशात थंडीची लाट कायम
लखनौ - उत्तर प्रदेशात गेल्या २४ तासात थंडीची लाट कायम राहिल्याने सामान्य जनजीवन विस्कळीत झाले. बाराबंकीत धुके व थंडीमुळे पाच जणांचा मृत्यू झाला. येथील गोदरी गावात धुक्यातून जात असलेल्या एका ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दोन तरुण ठार झाले. राजधानी लखनौत सूर्याचे दर्शन झाले नाही व दिवसभर थंडीचा कडाका होता. नागरिकांनी रस्त्याच्या कडेला शेकोट्या पेटवून थंडीपासून स्वत:चे संरक्षण केले.
अलाहाबाद व बरेलीतही थंडीचा कडाका जास्त होता. वाराणसी, कानपूर, आग्रा, गोरखपूर, बरेली येथे तापमान सामान्य स्थितीहून बरेच कमी होते. सर्वात कमी तापमान आग्रा येथे २.८ अंश से. एवढे नोंदवण्यात आले.

बिहारमध्ये थंडीचा कहर
पाटणा-बिहारची राजधानी असलेले पाटणा शहर थंडीच्या लाटेत लपेटले गेले असून येथे कमाल तापमान १५.४ अंश तर किमान ५.६ अंश एवढे नोंदविले गेले आहे. धुक्यामुळे रस्त्यावरची दृष्यता सकाळच्या वेळी ५० मीटरहून कमी झाली होती.
हवामान खात्याचे संचालक ए.के. सेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटणा शहरालगतच्या ३० कि.मी. च्या परिसरात धुके दाटल्याने तापमानात ९ अंशाने घट झाली. गया येथे सर्वात कमी तापमान, ५.७ अंश एवढे नोंदविले गेले. धुक्यामुळे रस्ते व रेल्वे वाहतूकही विस्कळित झाली. अनेक गाड्या कित्येक तास विलंबाने धावत होत्या. विमान वाहतूकीवरही या वातावरणाचा परिणाम झाला.