शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

अधिवेशनाचा प्रारंभ गदारोळाने

By admin | Updated: July 21, 2015 22:45 IST

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात मंगळवारी प्रचंड गदारोळात झाली. राज्यसभेत काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधकांनी ललित मोदीप्रकरणी परराष्ट्र व्यवहारमंत्री

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात मंगळवारी प्रचंड गदारोळात झाली. राज्यसभेत काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधकांनी ललित मोदीप्रकरणी परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि व्यापमं घोटाळ्यात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली; परंतु सरकारने विरोधकांची मागणी फेटाळून लावल्याने दिवसभर कामकाज ठप्प राहिले.सरकारने स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळताना या मुद्यावर चर्चेची तयारी दर्शविली. पण आधी राजीनामा, मगच चर्चा या मागणीवर विरोधक अडून बसले. गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज चारदा तहकूब करावे लागले. त्यामुळे प्रश्नोत्तराचा तास आणि शून्य प्रहरही गोंधळात वाहून गेला. कुणीही राजीनामा देणार नाही. आम्ही समर्पणाच्या भावनेतून देशासाठी काम करीत राहू, तुम्ही अडथळे आणत राहा. तुम्हाला चर्चा करायची असल्यास आमची तयारी आहे, असे संसदीय कामकाजमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी स्पष्ट केले. कामकाज सुरू होताच काँग्रेस सदस्यांनी आयपीएलचे फरार माजी आयुक्त ललित मोदी यांना स्वराज आणि राजेंनी केलेल्या मदतीचा मुद्दा उचलून धरला. पक्षाचे उपनेते आनंद शर्मा यांनी सरकारवर हल्लाबोल करताना मर्यादा ओलांडल्याचा आरोप केला. लोकसभा निवडणुकीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रामाणिकपणा, पारदर्शकता, भ्रष्टाचारमुक्ती आदी आश्वासने दिली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले. काँग्रेस सदस्यांच्या गोंधळातच अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सरकार त्वरित या मुद्यावर चर्चेस तयार असल्याचे सांगितले. खुद्द सुषमा स्वराज या चर्चेला उत्तर देतील, अशीही ग्वाही त्यांनी दिली; परंतु काँग्रेसचे सदस्य सभापतींच्या आसनासमक्ष येऊन परराष्ट्रमंत्र्यांच्या बडतर्फीसाठी घोषणाबाजी करीत राहिले.समाजवादी पार्टी आणि माकपनेही काँग्रेसच्या मागणीला पाठिंबा दिला. परराष्ट्रमंत्री तसेच राजस्थान, मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप आहेत. त्यांच्यावरील आरोपांची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि ही चौकशी पूर्ण होईपर्यंत तिघांनीही पदत्याग करावा, अशी मागणी माकप नेते सीताराम येचुरी यांनी केली. उपसभापतींनी चर्चा सुरू करण्यास सांगितले; परंतु विरोधक चर्चेच्या मन:स्थितीत नव्हते. माजी सदस्यांना श्रद्धांजलीपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत, राज्यसभेत दिवंगत माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आल्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)