शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
6
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
7
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
8
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
9
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
10
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
11
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
12
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
13
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
14
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
15
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
16
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
17
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
18
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
19
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
20
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण

विप्रोनं 600 कर्मचा-यांना दिला नारळ

By admin | Updated: April 20, 2017 21:30 IST

देशातील तिसरी सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या विप्रोनं कर्मचा-यांना जबरदस्त धक्का दिला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 20 - देशातील तिसरी सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या विप्रोनं कर्मचा-यांना जबरदस्त धक्का दिला आहे. विप्रोनं कर्मचा-यांच्या वर्षभरातल्या कामाच्या मूल्यमापनाच्या नावाखाली 600 कर्मचा-यांना नोकरीवरून बडतर्फ केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कंपनीच्या 600 कर्मचा-यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. मात्र हा आकडा 2000 पर्यंतही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. डिसेंबर 2016ला कंपनीकडे 1.79 लाख कर्मचारी संख्या होती. ज्यावेळी कंपनीशी संपर्क साधण्यात आला, त्यावेळी कामगिरीच्या आधारावर मूल्यामापनाची प्रक्रिया खूप कठीण आहे, असं सांगण्यात आलं. दरवर्षी ही संख्या खाली किंवा वर होऊ शकते. मात्र कंपनीनं काढण्यात आलेल्या कर्मचा-यांसंदर्भात कोणतीही टिपण्णी केली नाही. विप्रोनं सांगितलं की, कर्मचा-यांच्या वार्षिक मूल्यमापन प्रक्रियेत मेंटरिंग, री- ट्रेनिंग सारख्या गोष्टी सामील आहेत. कंपनीच्या चौथ्या तिमाहीत अहवाल आणि पूर्ण वर्षाचा आकडा 25 एप्रिलला जाहीर केला जाणार आहे. आधीच अमेरिका, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या देशांमध्ये कामगार व्हिसासंदर्भात आयटी कंपन्यांत वातावरण दूषित झालं आहे. कंपन्या ब-याचदा कर्मचा-यांना क्लायंटच्या साइटवर पाठवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपातील कार्य व्हिसा वापरतात. या देशांमध्ये व्हिसा नियम कडक झाल्यामुळे आयटी कंपन्यांमध्ये आव्हानाची परिस्थिती उद्भवली आहे. भारतीय आयटी कंपन्यांना 60 टक्के महसूल हा उत्तर अमेरिकेतल्या बाजारांतून प्राप्त होतो. तसेच 20 टक्के नफा हा यूरोप आणि इतर देशांमधून मिळवला जातो. त्यामुळे एकंदरीत आयटी कंपन्यांवर अनिश्चिततेचे वादळ घोंगावताना दिसत आहे.