शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

केंद्रातील युती तुटण्याच्या बेतात

By admin | Updated: November 10, 2014 04:41 IST

मित्रांचे शत्रू झालेल्या भाजपा आणि शिवसेना यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे़ रविवारी केंद्रात मंत्रिमंडळ विस्तारावरून निर्माण झालेले मतभेद विकोपाला गेले

नवी दिल्ली : मित्रांचे शत्रू झालेल्या भाजपा आणि शिवसेना यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे़ रविवारी केंद्रात मंत्रिमंडळ विस्तारावरून निर्माण झालेले मतभेद विकोपाला गेले असून, या तणावानंतर केंद्रातील भाजपा-शिवसेना युतीही तुटण्याची चिन्हे असून, समेट अशक्य असल्याचे चित्र आहे़केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या विस्तारात केवळ एक राज्यमंत्रिपद देऊन केली जाणारी बोळवण शिवसेनेच्या जिव्हारी लागली आणि केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी दिल्लीला गेलेले शिवसेना खासदार अनिल देसाई गेल्या पावलीच माघारी परतले़ त्यातच पूर्वाश्रमीचे शिवसेनावासी असलेले सुरेश प्रभू यांचा शपथविधी सोहळ्याआधी भाजपात प्रवेश, यामुळे शिवसेनेचा आणखी जळफळाट झाला; परिणामी केंद्रीय मंत्रिमंडळात पक्षाचे एकमेव मंत्री असलेले अनंत गीते यांना राजीनामा देण्यास सांगण्याच्या मन:स्थितीत शिवसेना नेतृत्व आहे. भाजपाने शिवसेनेला कॅबिनेट मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते़ मात्र नंतर त्यांनी शिवसेनेला राज्यमंत्रिपद देण्याचा निर्णय घेतला, असा सेना नेत्यांचा दावा आहे. आम्ही आणखी किती अवमान सहन करायचा, अशी प्रतिक्रिया देसार्इंसोबत दिल्लीला गेलेले सेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी या घडामोडीनंतर दिली़ सुरेश प्रभू यांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपद देण्याचा आग्रह धरण्याची पंतप्रधान वा अमित शहा यांना गरज नव्हती, असेही खैरे म्हणाले़ त्यांच्याकडे आज सत्ता आहे़ पण सत्ता सदासर्वकाळ टिकणारी नाही, असेही ते म्हणाले़ (लोकमत न्यूज नेटवर्क)