शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

उत्तराखंडमध्ये येणार नवा जमीन कायदा, धामी मंत्रिमंडळाची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 14:07 IST

आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक झाली. 

उत्तराखंड विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. विधानसभेच्या अध्यक्षांनी राज्यपालांचे अभिभाषण वाचून दाखवल्यानंतर पहिल्या दिवशी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. दरम्यान, आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक झाली. 

या बैठकीत अनेक महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. उत्तराखंड मंत्रिमंडळाने राज्यातील नवीन जमीन कायद्याला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. राज्य सरकारने या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून या कायद्याची औपचारिक अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया पुढे जाईल.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, राज्यातील लोकांच्या दीर्घकालीन मागणीचा आणि त्यांच्या भावनांचा पूर्ण आदर करून, आज मंत्रिमंडळाने जमीन कायद्याला मान्यता दिली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्याच्या संसाधनांचे, सांस्कृतिक वारशाचे आणि नागरिकांच्या हक्कांचे रक्षण होईल. तसेच, राज्याची मूळ ओळख टिकवून ठेवण्यातही महत्त्वाची भूमिका असणार आहे.

पुढे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी लिहिले की, आमचे सरकार लोकांच्या हितासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. आम्ही त्यांचा विश्वास कधीही तुटू देणार नाही. या निर्णयामुळे हे स्पष्ट होते की, आम्ही आमच्या राज्याचे आणि संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. निश्चितपणे हा कायदा राज्याचे मूळ स्वरूप टिकवून ठेवण्यासाठी देखील उपयुक्त ठरणार आहे.

नवीन जमीन कायद्यात काय आहे खास?मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या या जमीन कायद्याअंतर्गत, राज्यातील जमीन बाहेरील व्यक्तींनी खरेदी करण्यासाठी काही कडक तरतुदी करण्यात आल्या आहेत. यामध्ये, हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर काही निर्बंध लादले जाऊ शकतात. ज्यामुळे बाहेरील गुंतवणूकदारांकडून होणारी अनियंत्रित जमीन खरेदी थांबवता येईल आणि स्थानिक लोकांचे हित जपले जाईल. जेणेकरून बाहेरील लोकांकडून मोठ्या प्रमाणात जमिनीची खरेदी रोखता येईल आणि स्थानिक लोक विस्थापित होऊ शकणार नाहीत.

याअंतर्गत, बाहेरील लोकांना जमीन खरेदी करण्यासाठी कमाल मर्यादा १२.५ एकरची रद्द करून, त्यासाठी परवानगी जिल्हाधिकारी स्तरावर देण्याची तरतूद करण्यात आली. याचबरोबर, नवीन जमीन कायद्याबाबत राज्यातील तहसील स्तरावर सामान्य जनता, बुद्धिजीवी आणि विविध संघटनांकडून सूचना घेण्यात आल्या. या सूचनांच्या आधारे, नवीन कायद्याची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, जमीन कायद्यातील तरतुदी करताना उद्योग आणि नवीन गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण राहणार नाही, याकडेही लक्ष देण्यात आले आहे.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंड