शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेची ‘लक्ष्य’पूर्र्ती!

By admin | Updated: October 2, 2015 04:24 IST

पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत अभियान’ या पंचवार्षिक योजनेचे पहिल्या वर्षीचे शौचालय बांधणीचे नियोजित उद्दिष्टाहून बरीच अधिक मजल मारण्यात आल्याचा दावा केंद्र सरकारने केला.

नवी दिल्ली : पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत अभियान’ या पंचवार्षिक योजनेचे पहिल्या वर्षीचे शौचालय बांधणीचे वेळेपूर्वीच ओलांडून नियोजित उद्दिष्टाहून बरीच अधिक मजल मारण्यात आल्याचा दावा केंद्र सरकारने गुरुवारी केला. मात्र ज्या प्रमाणात गवगवा झाला ते पाहता या मोहिमेचा प्रभाव कुठे दिसलाच नाही. स्वातंत्र्यानंतरचा सर्वाधिक महत्त्वाकांक्षी नागरी प्रकल्प अशी प्रसिद्धी मिळालेल्या या योजनेला २०१९पर्यंत देशातील सर्व गावे हागणदारीमुक्त करण्याच्या दिशेने मोठी मजल गाठावी लागेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.पंतप्रधान मोदींनी स्वत: हातात झाडू घेऊन गतवर्षी गांधी जयंतीला स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली होती. या अभियानांतर्गत केंद्र सरकारने ग्रामीण भागात ६0 लाख नवी शौचालये बांधण्याचे लक्ष्य ठरवले होते. प्रत्यक्षात वर्ष संपण्याआधीच ८१.४१ लाख शौचालये बांधून तयार आहेत. देशात सध्या दररोज ५१ हजार नवी शौचालये तयार होत आहेत, अशी माहिती केंद्रीय पाणीपुरवठा व मलनि:सारण (पेयजल व स्वच्छता) मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. बिहार, राजस्थान, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, राजस्थान, हरयाणाने या योजनेत लक्षणीय प्रगती साधली आहे; तर उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचलसारखी काही राज्ये या आघाडीवर निर्धारित लक्ष्यापेक्षा मागे आहेत, असे मंत्रालयाची आकडेवारी सांगते.समस्यांचा डोंगरखुल्या जागेवर शौचाच्या जागतिक प्रमाणात भारताचा वाटा सर्वाधिक ६० टक्के आहे. प्रत्यक्षात हागणदारीमुक्ती गावांचे उद्दिष्ट गाठताना समस्यांचा डोंगर पार करावा लागणार असेच चित्र दिसत आहे. अपुरा निधी, जिल्हा परिषदा आणि महापालिकांच्या क्षमतेचा अभाव, निष्प्रभ ठरलेल्या जनजागृती मोहिमा, शौचालयांचा वापर करण्यास लोकांना प्रवृत्त करण्यात आलेले अपयशही या घटकांत समाविष्ट आहे. शौचालयांच्या बांधणीत सरकारला अपेक्षित असलेला प्रतिसाद खासगी क्षेत्राकडून न मिळणे हेही महत्त्वाचे कारण आहे.यंदाच्या गांधी जयंतीच्या कार्यक्रमात गतवर्षासारखा कोणताही गाजावाजा, थाटमाट अथवा बडेजाव नाही. तमाम ग्रामपंचायतींनी ग्रामसभेचे आयोजन करावे, लोकांमधे स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करावी असे मंत्रालयाने एका परिपत्रकाद्वारे कळवले आहे.सातत्यपूर्ण जनजागृती मोहीम राबवत शौचालय वापराची संस्कृती रुजवावी लागेल; तरच स्वच्छ भारत मोहिमेत सहभागी समुदायाला हा कार्यक्रम यशस्वी करता येईल.- एम. रामचंद्रन, माजी केंद्रीय नगर विकास सचिव