शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
3
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
4
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
5
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
6
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
7
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
8
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
9
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
10
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
11
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
12
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
13
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
14
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
15
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
16
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
17
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
18
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
19
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
20
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी

स्वच्छ रेल्वे, स्वच्छ भारत

By admin | Updated: February 27, 2015 02:33 IST

भारतीय रेल्वेच्या या अंदाजपत्रकात उच्चस्तरीय स्वच्छतेच्या मुद्द्यावर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी भर दिला आहे. रेल्वे ही प्रवासादरम्यान आपले स्वत:चे घर

भारतीय रेल्वेच्या या अंदाजपत्रकात उच्चस्तरीय स्वच्छतेच्या मुद्द्यावर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी भर दिला आहे. रेल्वे ही प्रवासादरम्यान आपले स्वत:चे घर आहे, असे समजून सरकारच्या या योजनेत सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वेमंत्र्यांनी प्रवाशांना केले आहे. सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत रेल्वे मंत्रालय आता ‘स्वच्छ रेल्वे-स्वच्छ भारत’ योजनेसाठी काम करणार आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयात रेल्वे स्टेशन आणि डब्यांच्या स्वच्छतेसाठी एक स्वतंत्र विभाग सुरू करण्यात येणार आहे. यासाठी स्वच्छतेच्या क्षेत्रातील व्यावसायिक कंपन्यांची सेवा घेण्यात येणार असून, रेल्वे कर्मचाऱ्यांना सेवा-स्वच्छतेच्या नव्या पद्धतीसाठी खास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. संशोधन, आराखडा आणि मानक संघटन या त्रिसूत्रीच्या आधारे सहा महिन्यांत व्हॅक्युम स्वच्छतागृहे उभारण्याचा आराखडा तयार करण्यावर काम सुरू आहे. त्याचप्रमाणे आॅनबोर्ड हाउस किपिंग सर्व्हिसची गुणवत्ता सुधारण्यावर रेल्वे मंत्रालयातर्फे भर देण्यात येणार आहे. सध्या ही सेवा ५00 जोड डब्यांत सुरू आहे. ग्राहकांच्या तक्रारींवर तत्काळ उपाय योजण्यावर रेल्वे मंत्रालयाचा भर आहे. प्रवाशांच्या बिछान्यासोबतच त्यांना कचरा जमा करण्यासाठी स्वतंत्र बॅग देण्यात येणार आहे. यामुळे प्रवासी त्यांच्याजवळचा कचरा त्यात जमा करू शकतात. वातानुकूलित नसणाऱ्या डब्यात कचरापेट्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. मोठ्या रेल्वे कोचिंग टर्मिनल्सजवळ टाकाऊ वस्तूंपासून ऊर्जानिर्मिती करणाऱ्या प्लॅन्टसची निर्मिती करण्याची योजना आहे. या योजनेअंतर्गत एका प्रायोगिक तत्त्वावर प्लॅन्टसची उभारणी करण्यात येणार असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने ही योजना सर्वत्र कार्यान्वित करण्यात येणार आहे, असेही प्रभू यांनी सांगितले.६५०- रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, डब्यातील स्वच्छतागृहांत सुधारणा करण्यात येणार आहे. गेल्या वर्षीच्या १२0 स्थानकांच्या तुलनेत यंदा ६५0 अतिरिक्त स्थानकांवर नवी स्वच्छतागृहे बांधण्यात येणार आहेत. प्रवासी डब्यांत १७ हजार जैव स्वच्छतागृहे (बायो टॉयलेट्स) उभारण्यात येणार आहेत. यापूर्वी १७,३८८ जैव स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत. १३८ -रेल्वे प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी रेल्वेमंत्र्यांनी हेल्पलाइन सुरूकरण्याची घोषणा केली़ १३८ हा या हेल्पलाइनचा क्रमांक असून, सुरक्षाविषयक तक्रारींसाठी १८२ हेल्पलाइन क्रमांक जाहीर केला़ १३८ हा क्रमांक २४ तास सुरू असेल़ या क्रमांकावर संपर्क साधून प्रवासी आपल्या तक्रारी वा समस्या नोंदवू शकतील़ तसेच सुरक्षेसंदर्भातील तक्रारी १८२ या टोल फ्री क्रमांकावर नोंदवता येतील, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले़