शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

स्वच्छ भारत योजनेला हादरा

By admin | Updated: June 22, 2017 02:06 IST

‘स्वच्छ भारत’ योजना कमालीची यशस्वी ठरत असल्याचा दावा करणाऱ्या सरकारला मात्र हा दावा खरा असल्याचे सिद्ध करता न आल्याने जागतिक बँकेला हात

नितीन अग्रवाल । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत’ योजना कमालीची यशस्वी ठरत असल्याचा दावा करणाऱ्या सरकारला मात्र हा दावा खरा असल्याचे सिद्ध करता न आल्याने जागतिक बँकेला हात आखडता घ्यावा लागला. परिणामी, या योजनेला जबर हादरा बसला आहे. 4 कोटी 17लाख शौचालये उभारल्याचा दावा करणाऱ्या सरकारला या दाव्यात तथ्यांश असल्याचे सिद्ध करण्यासाठी कोणताच मार्ग हाती नाही. त्यामुळे राज्यांतील विविध प्रकल्पांसाठी आर्थिक मदत देण्यास जागतिक बँकेने असमर्थता दाखविली आहे.ग्रामीण विकास मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, स्वच्छ भारत योजनेसाठी (ग्रामीण) जागतिक बँकेशी १५०० दशलक्ष डॉलरचा करार केला होता. पहिला हप्ता गेल्या वर्षी जुलैमध्ये मिळणार होता. दुसरा हप्ता या वर्षी जुलैत मिळणार होता. तथापि, बँकेने मागच्या वर्षी रक्कम जारी केली नाही. या वर्षीही अशीच शक्यता दिसते. सूत्रांनुसार देशभरात शौचालये उभारण्याचे काम गतीने केले जात आहे; परंतु या प्रकल्पातहत बांधण्यात आलेल्या शौचालयाबाबत खातरजमा न झाल्याने जागतिक बँकेने रक्कम जारी केली नाही.ग्रामीण विकासमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दावा केला की, या योजनेसाठी सरकारने पुरेशी आर्थिक व्यवस्था केली. जागतिक बँकेने रक्कम न जारी केल्याने या योजनेवर परिणाम होणार नाही. तांत्रिक समस्या आहे ती या आंतरराष्ट्रीय संस्थेची. भारताकडून समस्या नाही.स्वच्छता आणि पेयजल मंत्रालयाच्या दाव्यानुसार ४.१७ कोटी शौचालये उभारली गेली होती. एकूण उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण ६४.१८ टक्के आहे. जवळपास २.०४ हजार गावे हागणदारीमुक्त घोषित करण्यात आली आहेत. याशिवाय ४ राज्ये आणि १४३ जिल्हे हागणदारीमुक्त मानली गेली आहेत. महाराष्ट्रात ८०.४९ टक्के शौचालये उभारण्यात आली.प्रोत्साहन म्हणून दिली रक्कम जागतिक बँकेच्या सूत्रांनुसार , १५०० दशलक्ष डॉलरपैकी १,४७५ दशलक्ष डॉलर राज्यांना प्रोत्साहन म्हणून दिले जाणार होते. उर्वरित २५ दशलक्ष डॉलरची रक्कम स्वच्छता आणि पेयजल मंत्रालयाला दिली जाणार होती.जागतिक बँक असमाधानी...मागच्या वर्षी स्वच्छ भारत योजनेची प्रगती समाधानकारक म्हणणारी जागतिक बँक आता मात्र असमाधानी आहे.