शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

नागरिकांचे हाल; दूरवरून आणले पाणी

By admin | Updated: March 11, 2016 22:26 IST

जळगाव : ७ रोजी ज्या भागात पाणीपुरवठा झालेला होता, त्या भागात १० रोजी पाणीपुरवठा होईल, या हिशेबाने नागरिकांनी पाणीसाठा करून ठेवला होता. मात्र पाईपला गळती दुरुस्ती लांबल्याने गुरूवारी पाणीपुरवठा झालाच नाही. शुक्रवारी देखील सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे नागरिकांचा पाणीसाठा संपून त्यांना पिण्यासाठी देखील पाणी उरले नाही. त्यामुळे नागरिकांना हातपंपावरून, विहीरींवरून पाणी भरून आणावे लागले. नेहरू नगर परिसरातील काही नागरिकांनी तर आंघोळीसाठी थेट मेहरूण तलावावर जाऊन पाण्याचे ड्रम भरून आणले. तर पिण्याच्या पाण्यासाठी हातपंपांचा शोध घेत हिंडावे लागले. अनेक नागरिकांनी तर मिनरल वॉटरचे जार विकत आणून वेळ निभावून नेली. स्नेहल कॉलनी, नंदनवननगर परिसरातही चार दिवसांपासून पाणी नसल्याने नागरिकांचे अतोनात हाल्

जळगाव : ७ रोजी ज्या भागात पाणीपुरवठा झालेला होता, त्या भागात १० रोजी पाणीपुरवठा होईल, या हिशेबाने नागरिकांनी पाणीसाठा करून ठेवला होता. मात्र पाईपला गळती दुरुस्ती लांबल्याने गुरूवारी पाणीपुरवठा झालाच नाही. शुक्रवारी देखील सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे नागरिकांचा पाणीसाठा संपून त्यांना पिण्यासाठी देखील पाणी उरले नाही. त्यामुळे नागरिकांना हातपंपावरून, विहीरींवरून पाणी भरून आणावे लागले. नेहरू नगर परिसरातील काही नागरिकांनी तर आंघोळीसाठी थेट मेहरूण तलावावर जाऊन पाण्याचे ड्रम भरून आणले. तर पिण्याच्या पाण्यासाठी हातपंपांचा शोध घेत हिंडावे लागले. अनेक नागरिकांनी तर मिनरल वॉटरचे जार विकत आणून वेळ निभावून नेली. स्नेहल कॉलनी, नंदनवननगर परिसरातही चार दिवसांपासून पाणी नसल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले.

टँकरद्वारे पाणी पुरवण्याची तसदी नाही
मनपाच्या जलवाहिनीची गळती दुरूस्ती करण्यासाठी पाणीपुरवठा खंडित करण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. आधीच दोन दिवस पाणीपुरवठा न झालेल्या भागात दुरुस्तीमुळे आणखी एक-दोन दिवस उशीराने म्हणजे तब्बल चार-पाच दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होतो. अशा परिस्थितीतही मनपाकडून नागरिकांचे हाल टाळण्यासाठी कोणतीही पर्यायी पाणपुरवठा व्यवस्था केली जात नाही. टँकरद्वारे पाणी पुरवण्याची तसदी देखील मनपाकडून घेतली जात नाही. तर नगरसेवकही सोयीस्करपणे प्रशासनाकडे बोट दाखवून मोकळे होतात. त्याचा त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागतो.