शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर खोऱ्यामध्ये प्रथमच फडकले चीनचे झेंडे

By admin | Updated: October 16, 2016 00:59 IST

जम्मू काश्मीरमध्ये शुक्रवारी प्रथमच चीनचे झेंडे फडकवण्यात आले. काल दुपारचा नमाज आटोपल्यानंतर बारामुल्ला परिसरात आंदोलनकर्त्यांनी चीनचे झेंडे फडकवल्याचे

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये शुक्रवारी प्रथमच चीनचे झेंडे फडकवण्यात आले. काल दुपारचा नमाज आटोपल्यानंतर बारामुल्ला परिसरात आंदोलनकर्त्यांनी चीनचे झेंडे फडकवल्याचे फडकावल्याने ही बाब पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा तसेच केंद्र सरकारने गांभीर्याने घेतली आहे. काश्मीर खोऱ्यात अनेकदा पाकिस्तानचे झेंडे फडकावले जातात. त्याची स्थानिक रहिवासी व पोलिसांनाही सवय झाली आहे मात्र चीनचे झेंडे प्रथमच फडकावण्यात आल्यामुळे स्थानिक रहिवाशांनाही आश्चर्य वाटले. भारतासाठी हा धोक्याचा इशारा असल्याचे गुप्तचर यंत्रणा आणि लष्कराला वाटत आहे. श्रीनगरमध्ये शुक्रवारी नमाज संपल्यानंतर काही जणांनी नेहमीप्रमाणे घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावेळी काही जणांनी चीनचा झेंडा हातात घेत, आम्हाला चीनकडून मदत हवी आहे, अशी घोषणाबाजी सुरू केली. जवळपास पाच ते सहा आंदालकांकडे चीनचे झेंडे दिसत होते. अर्थातच या आंदोलकांनी आपले चेहरे झाकून घेतले होते. पाकिस्तानचे झेंडे फडकावणारे निदर्शनही नेहमी याच पद्धतीने चेहरे झाकून घेत असतात. या आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेकही केली. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी अश्रुधूराचा वापर करत निदर्शकांना पांगवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग ब्रिक्स परिषदेसाठी शनिवारी गोव्यात दाखल झाले. ते भारतात येणार असतानाच, काश्मीर खेऱ्यात चीनचे झेंडे फडकावले गेल्याने यामागे चीनमधील काही गट आहेत की काय, अशी शंका घेण्यात येत आहे. मात्र हे चीनचे झेंडे पाकिस्तानमधूनच आले किंवा आणले असावेत, असे सांगण्यात येत आहे (वृत्तसंस्था)चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग ब्रिक्स परिषदेसाठी येत असतानाच हा प्रकार घडला. दहशतवादी संघटनेचा कमांडर बुरहानी वणीचा खात्मा केल्यापासून काश्मीर खोरे धुमसत आहे. हिंसाचारामुळे अनेकांचा बळी गेला आहे आणि हजारो जखमी झाले आहे. या काळात अनेकदा पाकिस्तानी झेंडे फडकावण्यात आले होते. संचारबंदी उठवली; प्रीपेड मोबाइल सुरूचीनचे झेंडे फडकावल्याच्या पार्श्वभूमीवर खोऱ्यात तणाव निर्माण होण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र तसे घडले नाही आणि रहिवाशांनीही या आंदोलकांना साथ दिली नाही. त्यामुळे श्रीनगरमधील परिस्थितीमध्ये सुधारणा होत असल्याचे जाणवत आहे. संपूर्ण काश्मीर खोऱ्यातील संचारबंदी शनिवारी उठवण्यात आली. मात्र अनेक भागांमध्ये जमावबंदी लागू आहे. तीन महिन्यांपासून बंद केलेली प्रीपेड फोनची कॉल सुविधादेखील पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मात्र मोबाइल इंटरनेट सेवा अद्यापही ठप्प आहे. काश्मीरममधील सामान्य जीवन विस्कळीत होऊन ९९ दिवस झाले आहेत. रविवारी १00 दिवस पूर्ण होतील.