शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
3
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
4
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
5
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
6
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
7
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
8
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
9
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
10
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
11
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
12
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
13
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
14
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
15
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
16
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
17
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
18
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
19
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
20
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा

काश्मीरचं वातावरण दूषित करण्यात चीनचाही हात- मेहबूबा मुफ्ती

By admin | Updated: July 15, 2017 14:47 IST

काश्मीरमध्ये ज्या हिंसेच्या घटना घडत आहेत. त्यामागे बाहेरच्या शक्ती आहेत. आता तर चीननेही हस्तक्षेप करायला सुरुवात केली आहे

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि.15- वर्षभरापासून जम्मू आणि काश्मीरचं वातावरण ढवळून निघालं आहे. काश्मीरमध्ये अशांतता पसरली आहे. या अशांतते मागे फुटीरतावादी आणि पाकिस्तान असल्याचा दावा केला जात आहे. आता यामागे चीनचाही हात असल्याचा दावा मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केला आहे. काश्मीरमध्ये ज्या हिंसेच्या घटना घडत आहेत. त्यामागे बाहेरच्या शक्ती आहेत. आता तर चीननेही हस्तक्षेप करायला सुरुवात केली आहे, असा दावा मुफ्ती यांनी केला आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या वर्षभरापासून अशांततेचं वातावरण आहे. तेथिल कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. जम्मू-काश्मीरमधील वातावरण दूषित करण्याचा बाहेरच्या शक्तींचा हात आहे, पण आता चीनचाही त्यात हात आहे, असा दावा मेहबूबा मुफ्ती यांनी केला. राजनाथ सिंह यांच्यासोबतच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मेहबूबा मुफ्ती यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
काश्मीरमध्ये आपण कायदा व सुव्यवस्थेची लढाई लढत नाही. जोपर्यंत संपूर्ण देश, राजकीय पक्ष या परिस्थितीत साथ देत नाहीत, तोपर्यंत ही लढाई आपण जिंकू शकत नाही, असं मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या आहेत . काश्मीरमधील अस्थिरतेच्या प्रश्नी सर्व राजकीय पक्षांनी एकजूट दाखवली आहे. याचा मला आनंद झाला आहे. सर्व जण काश्मीरच्या समस्यांचा एकत्र सामना करत आहेत, असंही त्या म्हणाल्या आहेत. राज्यात जीएसटीला मंजुरी देण्यात आली त्यावेळी राष्ट्रपतींनी आम्हाला कलम ३७० च्या मुद्द्यावर विशेष लक्ष देणार असल्याचं आश्वासन दिलं होते. कलम ३७० हा मुद्दा आमच्या भावनांशी जोडलेला आहे, असंही त्या यावेळी म्हणाल्या.
आणखी वाचा
 

"पाकिस्तानला धडा शिकवणार", शहिदाच्या मुलीचा निर्धार

जम्मू काश्मीर : चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा

अमरनाथ यात्रा हल्ला: पीडीपी आमदाराच्या ड्रायव्हरला अटक

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या घरी जवळपास आर्ध्यातास बैठक झाली. काश्मीर खोऱ्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकारने काय पाऊलं उचलली आहेत, याची माहितीही राजनाथ सिंह यांनी मुफ्ती यांना दिली आहे. तसंच अमरनाथ यात्रेमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली. सोमवारी अमरनाथ यात्रेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. हा हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला तर 21 जण जखमी झाले होते. या हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर यात्रेच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विविध उपाययोजना राबविल्या जातं आहेत.