शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

चीन सीमेलगत नव्या ५४ चौक्या

By admin | Updated: October 25, 2014 08:32 IST

सीमा भागातील विकासकामांवर चीनने आक्षेप घेतला असतानाच भारताने त्याला भीक न घालता सीमेलगत ५४ नव्या चौक्या उभारण्याची घोषणा केली आहे.

 ग्रेटर नोएडा : सीमा भागातील विकासकामांवर चीनने आक्षेप घेतला असतानाच भारताने त्याला भीक न घालता सीमेलगत ५४ नव्या चौक्या(बॉर्डर आऊटपोस्ट) उभारण्याची तसेच चीनने कायम वाद उभा केलेल्या अरुणाचल प्रदेशमध्ये पायाभूत सुविधांसाठी १७५ कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे.केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी इंडो-तिबेटीयन सीमा पोलीस दलाच्या ५३ व्या स्थापनादिनी शुक्रवारी ही घोषणा केली. चीनसोबतचा सीमावाद चर्चेतून सोडविण्याची भारताची इच्छा आहे. सन्मानासह शांतता हेच भारताचे धोरण असून चीन आणि अन्य शेजारी देशांशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करण्यावर आमचा भर आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. भारताला चीनसोबत शांतता हवी आहे त्यासाठी देशाच्या सन्मानाची किंमत चुकवली जाणार नाही.'हम लोग शांती चाहते है सन्मान के साथ, असन्मान के साथ शांती नही हो सकती' असे सांगत त्यांनी अलीकडील चीनच्या सीमेवरील तणावाचा संदर्भ दिला. आत्मसन्मान ही सर्वांशी निगडीत बाब आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व शेजारी देशांशी शांततापूर्ण संबंध ठेवण्याची आणि सीमावाद शांततेने सोडविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सीमेबद्दल वाद असेल तर त्याबाबत चर्चा करावी, असे त्यांनी चीनच्या अध्यक्षांना सांगितले आहे. चीनने नेहमीच सीमेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. भारताला आपल्या हद्दीत पायाभूत सेवा द्यायच्या आहेत.