शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या २६ ठिकाणांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
3
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
4
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
5
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
6
राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
7
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
8
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
9
शिवाजी साटम यांच्या कमबॅकनंतर पार्थ समथानची CID 2 मधून एक्झिट; म्हणाला, "हे आधीच..."
10
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
11
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
12
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
13
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
14
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
15
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
16
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
17
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
18
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
19
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी

चीन सीमेलगत नव्या ५४ चौक्या

By admin | Updated: October 25, 2014 08:32 IST

सीमा भागातील विकासकामांवर चीनने आक्षेप घेतला असतानाच भारताने त्याला भीक न घालता सीमेलगत ५४ नव्या चौक्या उभारण्याची घोषणा केली आहे.

 ग्रेटर नोएडा : सीमा भागातील विकासकामांवर चीनने आक्षेप घेतला असतानाच भारताने त्याला भीक न घालता सीमेलगत ५४ नव्या चौक्या(बॉर्डर आऊटपोस्ट) उभारण्याची तसेच चीनने कायम वाद उभा केलेल्या अरुणाचल प्रदेशमध्ये पायाभूत सुविधांसाठी १७५ कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे.केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी इंडो-तिबेटीयन सीमा पोलीस दलाच्या ५३ व्या स्थापनादिनी शुक्रवारी ही घोषणा केली. चीनसोबतचा सीमावाद चर्चेतून सोडविण्याची भारताची इच्छा आहे. सन्मानासह शांतता हेच भारताचे धोरण असून चीन आणि अन्य शेजारी देशांशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करण्यावर आमचा भर आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. भारताला चीनसोबत शांतता हवी आहे त्यासाठी देशाच्या सन्मानाची किंमत चुकवली जाणार नाही.'हम लोग शांती चाहते है सन्मान के साथ, असन्मान के साथ शांती नही हो सकती' असे सांगत त्यांनी अलीकडील चीनच्या सीमेवरील तणावाचा संदर्भ दिला. आत्मसन्मान ही सर्वांशी निगडीत बाब आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व शेजारी देशांशी शांततापूर्ण संबंध ठेवण्याची आणि सीमावाद शांततेने सोडविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सीमेबद्दल वाद असेल तर त्याबाबत चर्चा करावी, असे त्यांनी चीनच्या अध्यक्षांना सांगितले आहे. चीनने नेहमीच सीमेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. भारताला आपल्या हद्दीत पायाभूत सेवा द्यायच्या आहेत.