शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चीनचे सीमारेषेवर रस्ते, विमानतळ, हेलिपॅडही; पेंटागॉनचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 09:46 IST

चीनने लष्करी डोकलामजवळ तीन नवीन गावांची उभारणी, दुहेरी-उद्देशीय विमानतळ आणि हेलिपॅड निर्मिती केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : १५ जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारत आणि चीनमधील संबंध ताणलेलेच आहेत. वारंवार दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या फेऱ्या झडत असताना चीनकडून मात्र कुरापतीचे प्रयत्न सुरूच आहेत. चीनने २०२२ मध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आपल्या जवानांची संख्या प्रचंड वाढविली होती, याचवेळी भूमिगत साठवण सुविधा, नवीन रस्ते, दुहेरी-उद्देशीय विमानतळ आणि हेलिपॅड निर्मिती करण्यात येत होती, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे.

अमेरिकेचे संरक्षण विभाग मुख्यालय पेंटागॉनच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. ‘मे २०२० च्या सुरुवातीपासून, भारत-चीन सीमेवरील सततच्या तणावाने चीनच्या पश्चिमी कमांडचे लक्ष वेधून घेतले होते. भारत आणि चीनमधील एलएसीवरील सीमांकनांच्या संदर्भात भिन्न धारणा, दोन्ही बाजूंच्या अलीकडील पायाभूत सुविधांची उभारणी, आदींमुळे तणाव वाढून अनेक चकमकी झाल्या’, असे अहवालात म्हटले आहे. चीनने अशाच प्रकारे संयुक्त शस्त्रास्त्र ब्रिगेडची पूर्व आणि मध्य कमांडमध्ये तैनात केल्याचे अहवालात म्हटले आहे. ५०० पेक्षा अधिक सक्रिय अण्वस्त्रे चीनकडे आहेत. १,००० पेक्षा अधिक सक्रिय अण्वस्त्रे २०३० पर्यंत वाढविण्याची चीन तयारी करत असल्याचे सूत्रांनी माहिती देताना सांगितले.

नेमके काय केले? 

चीनने लष्करी पायाभूत सुविधांचा विकास करताना डोकलामजवळील भूमिगत साठवण सुविधा, एलएसीच्या तीनही क्षेत्रांतील नवीन रस्ते, शेजारील भूतानमधील विवादित भागात तीन नवीन गावांची उभारणी, पँगाँग सरोवरावरील दुसरा पूल, केंद्र क्षेत्राजवळ दुहेरी-उद्देशीय विमानतळ आणि हेलिपॅड, आदींचा समावेश आहे.

संरक्षणमंत्र्यांचे सीमेवर शस्त्रपूजन

भारत आणि चीन यांच्यात पूर्व लडाखमध्ये तीन वर्षांपासून संघर्ष सुरू असताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंग मंगळवारी अरुणाचल प्रदेशातील तवांग येथील सीमारेषेजवळच्या जवानांसोबत दसरा साजरा करणार आहेत. संरक्षण मंत्री तवांगमध्ये ‘शस्त्रपूजन’ही करणार आहेत.

 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणाव