शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

बालमृत्यू प्रकरण : योगी सरकारकडून द्वेषपूर्वक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 02:47 IST

उत्तर प्रदेश सरकारच्या शासकीय अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे अनेक निष्पाप बालकांना मृत्यूमुखी पडावे लागले

मुंबई : उत्तर प्रदेश सरकारच्या शासकीय अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे अनेक निष्पाप बालकांना मृत्यूमुखी पडावे लागले, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी आपण शक्य ते सर्व प्रयत्न केले. वैयक्तिक खर्च सोसून अनेकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. मात्र सत्य बाहेर येण्याच्या भीतीपोटी योगी आदित्यनाथ सरकारने आपल्यावर द्वेषाने खोटे गुन्हे दाखल केले. परंतु आपला भारतीय न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून त्यांच्या षडयंत्रातून आपली निर्दोष मुक्तता होईल, असा आशावाद गोरखपूर रुग्णालयातील डॉ. काफील खान यांनी येथे रविवारी व्यक्त केला.स्टुडंट इस्लामिक आॅरगनायझेनच्या (एसआयओ) मुंबई शाखेतर्फे कुर्ला येथील कार्यालयात आयोजिलेल्या चर्चासत्रामध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी जातीयावादी शक्ती विरोधात देशभरात मोहीम राबवून नागरिकांमध्ये जनजागृती व एकजुटता निर्माण करणार असल्याचे स्पष्ट केले.गेल्यावर्षी गोरखपूर रुग्णालयात आॅक्सिजनच्या सिलेंडरच्या कमतरतेमुळे अनेक बालके मृत्यूमुखी पडली होती. त्यावेळी बचावकार्यात मोलाची भूमिका बजाविणाºया डॉ. काफिल खान यांनाच या प्रकरणात दोषी ठरवून गुन्हे दाखल केले होते. न्यायालयाने त्यांच्यावरील सर्व गंभीर गुन्हे मागे घेतले आहेत. एक प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. सध्या जामीनावर बाहेर असलेले डॉ. काफील देशाच्या विविध भागात जावून योगी सरकारची गैरकृत्ये चव्हाट्यावर आणित आहेत. ते म्हणाले, गोरखपूर घटनेचे वार्तांकन सर्व जगासमोर उघड झाले आहे. काहींचा अपवाद वगळता प्रसार माध्यमांनी सर्व प्रकार उघड केला.