शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

बालमृत्यू प्रकरण : योगी सरकारकडून द्वेषपूर्वक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 02:47 IST

उत्तर प्रदेश सरकारच्या शासकीय अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे अनेक निष्पाप बालकांना मृत्यूमुखी पडावे लागले

मुंबई : उत्तर प्रदेश सरकारच्या शासकीय अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे अनेक निष्पाप बालकांना मृत्यूमुखी पडावे लागले, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी आपण शक्य ते सर्व प्रयत्न केले. वैयक्तिक खर्च सोसून अनेकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. मात्र सत्य बाहेर येण्याच्या भीतीपोटी योगी आदित्यनाथ सरकारने आपल्यावर द्वेषाने खोटे गुन्हे दाखल केले. परंतु आपला भारतीय न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून त्यांच्या षडयंत्रातून आपली निर्दोष मुक्तता होईल, असा आशावाद गोरखपूर रुग्णालयातील डॉ. काफील खान यांनी येथे रविवारी व्यक्त केला.स्टुडंट इस्लामिक आॅरगनायझेनच्या (एसआयओ) मुंबई शाखेतर्फे कुर्ला येथील कार्यालयात आयोजिलेल्या चर्चासत्रामध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी जातीयावादी शक्ती विरोधात देशभरात मोहीम राबवून नागरिकांमध्ये जनजागृती व एकजुटता निर्माण करणार असल्याचे स्पष्ट केले.गेल्यावर्षी गोरखपूर रुग्णालयात आॅक्सिजनच्या सिलेंडरच्या कमतरतेमुळे अनेक बालके मृत्यूमुखी पडली होती. त्यावेळी बचावकार्यात मोलाची भूमिका बजाविणाºया डॉ. काफिल खान यांनाच या प्रकरणात दोषी ठरवून गुन्हे दाखल केले होते. न्यायालयाने त्यांच्यावरील सर्व गंभीर गुन्हे मागे घेतले आहेत. एक प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. सध्या जामीनावर बाहेर असलेले डॉ. काफील देशाच्या विविध भागात जावून योगी सरकारची गैरकृत्ये चव्हाट्यावर आणित आहेत. ते म्हणाले, गोरखपूर घटनेचे वार्तांकन सर्व जगासमोर उघड झाले आहे. काहींचा अपवाद वगळता प्रसार माध्यमांनी सर्व प्रकार उघड केला.