शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

शिक्षणाचा दर्जा उचावण्यासाठी प्रयत्नांची गरज मुख्यमंत्री: भारतीय विद्या भवन्सच्या शाळा इमारतीचे उद्घाटन

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

फोटो ओळी - इमारत कोनशिलेच्या अनावरणप्रसंगी उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, अजय संचेती, बनवारीलाल पुरोहित, कृष्णा खोपडे, आशिष देशमुख, श्याम वर्धने, राजेंद्र पुरोहित, राकेश पुरोहित.

फोटो ओळी - इमारत कोनशिलेच्या अनावरणप्रसंगी उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, अजय संचेती, बनवारीलाल पुरोहित, कृष्णा खोपडे, आशिष देशमुख, श्याम वर्धने, राजेंद्र पुरोहित, राकेश पुरोहित.
नागपूर : विज्ञान क्षेत्रात दैनंदिन होणारे बदल भारतीय शिक्षण पद्धतीशी जोडून ग्रामीण भागात शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
त्रिमूर्तिनगरतील भारतीय विद्या भवन्सच्या भगवानदास पुरोहित विद्या मंदिरच्या चौथ्या शाळेच्या इमारतीचे उद्घाटन शुक्रवारी फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय विद्या भवन्स नागपूर केंद्राचे अध्यक्ष व माजी खासदार बनवारीलाल पुरोहित होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अजय संचेती, महापौर प्रवीण दटके, आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, आशिष देशमुख, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्याम वर्धने, डॉ. सुनंदा सोनारीकर उपस्थित होते.
ग्रामीण भागात शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू असून, या क्षेत्रात शिक्षक आणि शिक्षण संस्थांचाही सहभाग मोलाचा ठरतो, असे फडणवीस म्हणाले. शिक्षण क्षेत्रातील भारतीय विद्या भवन्सची कामगिरी मोलाची असल्याचे ते म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, कोराडी-खापरखेडा या भागातून मोठ्या प्रमाणात मुले शिक्षणासाठी नागपुरात येतात. त्यांच्यासाठी कोराडी कॉलनीतील दहा एकर जागेत भवन्सने शाळा सुरू करावी.
बनवारीलाल पुरोहित यांनी संस्थेबाबत माहिती दिली. प्राचीन आणि आधुनिक संस्कृतीची सांगड घालून युवापिढीला गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश असून, शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचे काम संस्थेतर्फे केले जात आहे, असे बनवारीलाल पुरोहित म्हणाले.
सुरुवातीला फडणवीस यांच्या हस्ते नव्या इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण झाले. यावेळी त्यांच्या हस्ते मोहन सालोडकर, प्रखर गुप्ता आणि कौस्तुभ व्यास या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि इमारत उभारणीत योगदान देणारे अविनाश डोंगरे, दिलीप म्हसे, विनयकुमार जैन व रेणुका मोहरील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन संगीता बत्रा यांनी केले. प्रो. क्यू.एच. जीवाजी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला व्ही.व्ही. भास्करन, डॉ. रूपा कुळकर्णी यांच्यासह शहरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.