शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचा हेतू तपासा

By admin | Updated: November 22, 2015 01:47 IST

गोव्यात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला जगभर नावाजले जाते. अशा महोत्सवात गोंधळ घालणाऱ्या एफटीआयआयच्या काही विद्यार्थ्यांमुळे आंतरराष्ट्रीय

- संदीप आडनाईक,  पणजी

गोव्यात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला जगभर नावाजले जाते. अशा महोत्सवात गोंधळ घालणाऱ्या एफटीआयआयच्या काही विद्यार्थ्यांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर महोत्सवाला गालबोट लागू नये. या विद्यार्थ्यांच्या या जाणीवपूर्वक करण्यात आलेल्या कृत्याचा हेतू तपासा, असे आवाहन माहिती व प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धनसिंग राठोड यांनी शनिवारी येथे केले.४६व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी कर्नल राठोड येथे आले आहेत. त्यांची प्रस्तुत प्रतिनिधीने संवाद साधला, तेव्हा त्यांनी चित्रपट व्यवसायाशी संबंधित काही गोष्टींबाबत भूमिका स्पष्ट केली. फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकाराबद्दल कर्नल राठोड म्हणाले की, भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर मलिन करण्याचा प्रयत्न हा निंदाजनक आहे. विशेषत: भारतीय व्यक्तींकडूनच तसा प्रकार होणार असेल, तर कठोर कारवाई ही व्हायलाच हवी. त्यात मी स्वत: हस्तक्षेप करणार नाही; पण अशा प्रकाराची मी अपेक्षाच केली नव्हती.जेम्स बाँडच्या ‘स्पेक्टर’ आणि यशराज फिल्मस्च्या ‘तितली’ यासारख्या चित्रपटांतील संवादांना तसेच काही दृश्यांना कात्री लावण्यात आल्याच्या मुद्द्यावरही कर्नल राठोड यांना विचारले असता ते म्हणाले की, सेन्सॉर बोर्डाचे मुख्य काम हे प्रमाणपत्र देण्याचे आहे. ज्या चित्रपटाची निर्मिती झाली, त्यांना प्रमाणपत्र द्या; पण त्यांच्या विचारांवर आक्षेप घेण्याचा मुळातच बोर्डाला अधिकार नाही आणि त्यात सरकार हस्तक्षेपही करीत नाही. सेन्सॉर बोर्ड पारदर्शकसेन्सॉर बोर्डाचे कामकाज अधिक पारदर्शक करण्यात येत आहे. ही प्रक्रिया आम्ही आता आॅनलाइन सुरू करत आहोत. याशिवाय प्रमाणपत्राची प्रतही तत्काळ पीडीएफ फॉर्मेटमध्ये देण्यात येणार आहे. चित्रपट निर्मात्यांच्या अधिकारावर गदा येऊ नये, यासाठी काळजी घेतली जाईल. येत्या पाच वर्षांत सॉफ्टवेअरमध्येही आमूलाग्र बदल करण्यात येतील, असेही राठोड यांनी सांगितले.नवा सिनेमॅटोग्राफ अ‍ॅक्ट लवकरचजुन्या काळापासून चालत आलेल्या सिनेमॅटोग्राफ अ‍ॅक्टमध्ये आम्ही बदल करण्याचा विचार करत आहोत. त्यावर तज्ज्ञांशी आणि चित्रपट क्षेत्रातील नामवंतांशी चर्चा केल्यानंतर त्याचे नवीन कायद्यात बदल करण्यात येईल, अशी माहितीही कर्नल राठोड यांनी दिली....तर निहलानी यांच्यावरकारवाई - कर्नल राठोडसेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी केलेल्या काही विधानांवरून गदारोळ उठला आहे. त्यांच्यावर कारवाई करणार का, असा प्रश्नविचारला असता कर्नल राठोड यांनी सांगितले की, याची माहिती घेईन. व्यक्तिगत पातळीवर त्यांनी काही विधान केले असेल तर त्यावर सरकारचे काही नियंत्रण असणार नाही; कारण तो भाषास्वातंत्र्यांचा भाग आहे; परंतु सेन्सॉर बोर्डाशी संबंधित काही वक्तव्य त्यांनी केले असेल तर देश आणि जनतेच्या हितासाठी त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत विचार करू.