शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

शब्द वगळण्याचा प्रकार जाणीवपूर्वक चव्हाण यांनी व्यक्त केली शंका: मोदींनी भूमिका स्पष्ट करावी

By admin | Updated: January 30, 2015 21:11 IST

नागपूर: केंद्र आणि राज्यात सत्ता आल्यापासून भाजपने त्यांचा हिंदुत्वाचा छुपा अजेंडा राबविणे सुरू केले आहे, यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेस नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केली. संविधानाच्या सरनाम्यातील धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे दोन शब्द वगळणे हा त्यातलाच प्रकार असून तो जाणीवपूर्वक केला गेला असावा, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.

नागपूर: केंद्र आणि राज्यात सत्ता आल्यापासून भाजपने त्यांचा हिंदुत्वाचा छुपा अजेंडा राबविणे सुरू केले आहे, यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेस नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केली. संविधानाच्या सरनाम्यातील धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे दोन शब्द वगळणे हा त्यातलाच प्रकार असून तो जाणीवपूर्वक केला गेला असावा, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रभाषा प्रचार सभेच्या धनवटे सभागृहात आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. देशभरात हिंदुत्वाच्या मुद्दावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा काही संघटनांचा प्रयत्न गंभीर आहे. महात्मा गांधी यांच्या खुन्याचे उदात्तीकरण असो किंवा सविधानाच्या सरनाम्यातून धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे शब्द वगळणे असो हे त्यातलेच प्रकार आहेत. मुळात घटना बदलविण्याची मानसिकताच भाजपची आहे. त्यामुळे हे शब्द वगळणे ही तांत्रिक चूक वाटत नाही तर तसे जाणीवपूर्वक केले गेले असावे अशी शंका येते. एखादी गोष्ट करून त्याचे काय पडसाद उमटतात याची चाचणी घेण्याचाच ही खेळी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात त्यांची भूमिका सष्ट करावी. हिंदुत्वाच्या अजेंड्याला समर्थन असेल तर तसे जाहीर करावे किंवा विरोध असेल तर तो स्पष्ट करावा, असे चव्हाण म्हणाले.
राज्यात पक्षाच्या पराभवाचे विश्लेषण केले जात आहे. यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. त्यावर चर्चा सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष पदाबाबत त्यांना विचारणा केली असता त्यावर त्यांनी बोलणे टाळले (प्रतिनिधी)
चौकट करावी
तर नटराजन यांच्यावर
कारवाई करावी
संविधानाला साक्षी ठेवून मंत्री शपथ घेत असल्याने त्यांच्याकडून घेतले जाणारे निर्णय हे कायद्याच्या चौकटीतच असणे अपेक्षित असते. अशा वेळी कोणाच्या सांगण्यावरून जर मंत्री जयंती नटराजन यांनी निर्णय घेतले असेल तर त्यांच्यावर कारवाई करायला हवी, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी माजी केंद्रीय मंत्री जयंती नटराजन यांच्या आरोपावर दिली. राहुल गांधींवर केलेले आरोपही त्यांनी फेटाळून लावले. राजकीय क्षेत्रात काम करताना एक नेता म्हणून त्यांच्याकडे आलेले पत्र संबंधितांकडे पाठवावे लागते. मात्र त्यावर निर्णय घेण्याचे अधिकार हे मंत्र्यांना असतात, असे ते म्हणाले.