शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

चतु:संप्रदाय आखाड्याचे शनिवारी ध्वजारोहण

By admin | Updated: August 20, 2015 22:10 IST

नाशिक : साधुग्राममधील दिगंबर, निर्वाणी, निर्मोही या तिन्ही अनी आखाड्यांच्या ध्वजारोहणानंतर आता चतु:संप्रदाय खालशात शनिवारी (दि.२२) सकाळी आठ वाजता ध्वजारोहण होणार आहे. त्यासाठी चतु:संप्रदाय खालशात ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. चतु:संप्रदाय आखाड्याचा ध्वज लाल रंगाचा असणार आहे. त्यावर पर्वत घेऊन जाणार्‍या हनुमानाचे निशाण असणार आहे.

नाशिक : साधुग्राममधील दिगंबर, निर्वाणी, निर्मोही या तिन्ही अनी आखाड्यांच्या ध्वजारोहणानंतर आता चतु:संप्रदाय खालशात शनिवारी (दि.२२) सकाळी आठ वाजता ध्वजारोहण होणार आहे. त्यासाठी चतु:संप्रदाय खालशात ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. चतु:संप्रदाय आखाड्याचा ध्वज लाल रंगाचा असणार आहे. त्यावर पर्वत घेऊन जाणार्‍या हनुमानाचे निशाण असणार आहे.
ध्वजाची लांबी २१ फूट, तर रुंदी ८ फूट असणार आहे. लाल रंगाचा हनुमानाला शेंदूर लावला जात असल्याने ध्वजेचा रंग लाल असल्याचे सांगण्यात येत आहे. साधू- महंतांकडून होणार्‍या चुकांबाबतची सुनावणी याठिकाणी होऊन त्यांना दंड व शिक्षा देण्याचा अधिकार चतु:संप्रदाय खालशाला देण्यात आला आहे. सदर खालशात तिन्ही अनी आखाड्यांतून एका महंतांची नियुक्ती करण्यात येते. चारही महंतांच्या स्वाक्षरीने शिक्षा, दंड ठरविण्यात येतो. कुंभमेळा दरम्यान न्यायालयीन प्रक्रिया या आखाड्यात पार पाडली जाते. चतु:संप्रदाय आखाड्यात तिन्ही अनी आखाड्यांतील साधू-महंतांचे वादग्रस्त प्रश्न मिटविले जातात. त्यासाठी चतु:संप्रदाय खालशाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच महंत, महामंडलेश्वर पदव्या प्रदान करण्यासाठी चतु:संप्रदाय खालशाची मंजुरी घ्यावी लागते. खालशात चतु:संप्रदाय वरिष्ठ खालसा आहे. त्यामुळे चतु:संप्रदाय खालशाच्या ध्वजारोहणानंतरच इतर खालशात ध्वजारोहण करण्याची परंपरा आहे. आखाड्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या मानपान नाट्यानंतर आता खालशाच्या ध्वजारोहणातही मानपानाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. आखाड्याच्या ध्वजारोणांनतर खालशांनी ध्वजारोहणास सुरवात केली आहे. दोन दिवसांत आठ ते दहा खालशात ध्वजारोहण सोहळा पार पडला आहे. मात्र चतु:संप्रदाय खालशाचे ध्वजारोहण महंतांच्या आगमनामुळे लांबले होते. ध्वजारोहणाला चतु:संप्रदायाचे महंत बर्फानी दादाजी, महंत फुलडोलदास बिहारी महाराज, महंत रामलखनदास महाराज, महंत रासबिहारीदास महाराज, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज उपस्थित राहणार आहेत.
( प्रतिनिधी)

त्या खालशांना दंड करणार
चतु:संप्रदाय खालशात ध्वजारोहण झाल्याशिवाय इतर कोणत्याही खालशात ध्वजारोहण होत नाही असा नियम आहे. मात्र याबाबत माहिती नसल्याने काही खालशांमध्ये ध्वजारोहण झाले. मात्र ज्या खालशांनी ध्वजारोहण केले. त्यांना दंड देण्यात येणार आहे. परंपरा माहिती करून न घेता खालशांनी ध्वजारोहण करणे योग्य नाही.
महंत फुलडोलदास बिहारी महाराज, चतु:संप्रदाय खालसा