शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

मालेगावप्रकरणी मेमध्येच आरोपपत्र

By admin | Updated: May 10, 2016 03:17 IST

: मालेगावमध्ये २00८ साली बॉम्बस्फोट प्रकरणात अटक झालेल्या अभिनव भारत संघटनेच्या आरोपींवर तब्बल आठ वर्षांनी, या महिन्यात आरोपपत्र दाखल केले जाईल,

नवी दिल्ली : मालेगावमध्ये २00८ साली बॉम्बस्फोट प्रकरणात अटक झालेल्या अभिनव भारत संघटनेच्या आरोपींवर तब्बल आठ वर्षांनी, या महिन्यात आरोपपत्र दाखल केले जाईल, अशी माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेतर्फे (एनआयए) सोमवारी देण्यात आली. या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करण्यात यावा, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने एनआयएला दिल्या होत्या.या प्रकरणातील तपास आम्ही पूर्ण केला आहे आणि शक्यतो याच महिन्यात आम्ही मुंबईतील संबंधित न्यायालयात आरोपपत्र दाखल करू, असे एनआयएचे महासंचालक शरदकुमार यांनी सोमवारी सांगितले. आरोपपत्र दाखल करण्यास जाणूनबुजून बिलंब होत असल्याच्या आरोपाचा त्यांनी इन्कार केला. ते म्हणाले की, या प्रकरणातील आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात तसेच सर्वोच्च न्यायालयात विविध कारणास्तव धाव घेतली होती. त्या सर्व प्रकरणांचा निकाल लागेपर्यंत आम्हाला आरोपपत्र दाखल करणे शक्य नव्हते. आता सर्व न्यायालयांतील प्रकरणे निकालात निघाली असल्याने आरोपपत्र दाखल करण्यात कोणतीही अडचण राहिलेली नाही.मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात १४ जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत.बॉम्बस्फोट प्रकरणात कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंग, शिवनारायण कालसांगरा, समीर कुलकर्णी, रमेश उपाध्याय, श्याम साहू, राकेश धावडे, जगदीश म्हात्रे, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी, प्रवीण टाकळकी, अजय यांना अटक करण्यात आली होती. रामचंद्र कालसांगरा आणि संदीप डांगे हे २00७ च्या समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोटांमधील मालेगाव प्रकरणात फरार दाखवण्यात आले आहेत. समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोटात ६८ जण मरण पावले होते. या स्फोटात प्रथमच अभिनव भारत या हिंदुत्ववादी संघटनेचे नाव पुढे आले होते. मालेगाव प्रकरणातील सर्व आरोपींनी आपला बॉम्बस्फोटांशी संबंध नसल्याचे तसेच बॉम्बस्फोटांच्या कारस्थानातही सहभागी नसल्याचे म्हटले आहे.