शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

बिहार पॅकेजवरून आरोप-प्रत्यारोप

By admin | Updated: August 21, 2015 00:11 IST

जुन्याच योजनांना नवा साज चढवत देण्यात आलेले १.२५ लाख कोटी रुपयांचे पॅकेज हा निवडणूक जुमला असल्याचा आरोप होत असतानाच केंद्र सरकारने त्यासाठी

नवी दिल्ली : जुन्याच योजनांना नवा साज चढवत देण्यात आलेले १.२५ लाख कोटी रुपयांचे पॅकेज हा निवडणूक जुमला असल्याचा आरोप होत असतानाच केंद्र सरकारने त्यासाठी अतिरिक्त तरतूद करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. या पॅकेजअंतर्गत प्रत्येक योजना नवी राहणार आहे. सुरू न झालेली कामे हाती घेण्यासाठी निधीचा वापर केला जाईल. केंद्राकडून सर्वसाधारण मदतीचा ओघ सुरूच राहणार असून त्याशिवाय दिला गेलेला हा वेगळी निधी असेल, असा खुलासाही केला आहे. बिहारच्या पॅकेजवरून नितीशकुमार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संयुक्तरीत्या हल्ला चढविल्यानंतर केंद्रीय मंत्री रविशंकर यांनी मदत पॅकेजचे राजकारण केले जाऊ नये, असा इशारा दिला.मोदींनी बिहारसाठी पॅकेजची घोषणा केली असली तरी त्यासाठी कोणतीही अर्थसंकल्पीय तरतूद केली नसून हा पैसा कुठून दिला जाणार तेसुद्धा स्पष्ट करण्यात आलेले नाही, या विसंगतीकडे विरोधकांनी लक्ष वेधले असता उच्चपदस्थ सूत्रांनी येत्या काही वर्षात पॅकेजअंतर्गत समाविष्ट योजनांना अर्थसंकल्पात स्थान दिले जाणार असल्याचे नमूद केले. एवढे मोठे पॅकेज देण्यात आल्यामुळे तुटीचा बोजा वाढणार असल्याची भीतीही सूत्रांनी निरर्थक ठरवली आहे. प्रस्तावित खर्च हा भांडवली खर्चाचा भाग असेल. त्यामुळे उत्पादकता वाढीस लागून बदल्यात उच्च विकास दर लाभेल. नव्या योजना सुरू करण्यांसह अद्याप सुरू न करण्यात आलेली कामे संपविण्यासाठी हा निधी उपयोगात आणला जाईल, असेही सूत्रांनी म्हटले. (लोकमत न्यूज नेटवर्क)