शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
4
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
6
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
7
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
8
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
9
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
10
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
11
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
12
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
13
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
14
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
15
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
16
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
18
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
19
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
20
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी

बिहार पॅकेजवरून आरोप-प्रत्यारोप

By admin | Updated: August 21, 2015 00:11 IST

जुन्याच योजनांना नवा साज चढवत देण्यात आलेले १.२५ लाख कोटी रुपयांचे पॅकेज हा निवडणूक जुमला असल्याचा आरोप होत असतानाच केंद्र सरकारने त्यासाठी

नवी दिल्ली : जुन्याच योजनांना नवा साज चढवत देण्यात आलेले १.२५ लाख कोटी रुपयांचे पॅकेज हा निवडणूक जुमला असल्याचा आरोप होत असतानाच केंद्र सरकारने त्यासाठी अतिरिक्त तरतूद करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. या पॅकेजअंतर्गत प्रत्येक योजना नवी राहणार आहे. सुरू न झालेली कामे हाती घेण्यासाठी निधीचा वापर केला जाईल. केंद्राकडून सर्वसाधारण मदतीचा ओघ सुरूच राहणार असून त्याशिवाय दिला गेलेला हा वेगळी निधी असेल, असा खुलासाही केला आहे. बिहारच्या पॅकेजवरून नितीशकुमार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संयुक्तरीत्या हल्ला चढविल्यानंतर केंद्रीय मंत्री रविशंकर यांनी मदत पॅकेजचे राजकारण केले जाऊ नये, असा इशारा दिला.मोदींनी बिहारसाठी पॅकेजची घोषणा केली असली तरी त्यासाठी कोणतीही अर्थसंकल्पीय तरतूद केली नसून हा पैसा कुठून दिला जाणार तेसुद्धा स्पष्ट करण्यात आलेले नाही, या विसंगतीकडे विरोधकांनी लक्ष वेधले असता उच्चपदस्थ सूत्रांनी येत्या काही वर्षात पॅकेजअंतर्गत समाविष्ट योजनांना अर्थसंकल्पात स्थान दिले जाणार असल्याचे नमूद केले. एवढे मोठे पॅकेज देण्यात आल्यामुळे तुटीचा बोजा वाढणार असल्याची भीतीही सूत्रांनी निरर्थक ठरवली आहे. प्रस्तावित खर्च हा भांडवली खर्चाचा भाग असेल. त्यामुळे उत्पादकता वाढीस लागून बदल्यात उच्च विकास दर लाभेल. नव्या योजना सुरू करण्यांसह अद्याप सुरू न करण्यात आलेली कामे संपविण्यासाठी हा निधी उपयोगात आणला जाईल, असेही सूत्रांनी म्हटले. (लोकमत न्यूज नेटवर्क)