शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

कॅशलेस रेल्वे तिकिटांच्या नियमांमध्ये होणार मोठे बदल

By admin | Updated: June 6, 2017 11:20 IST

इंडियन रेल्वे 1 जुलैपासून सध्याच्या नियमांमध्ये मोठे बदल करते आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 6-  इंडियन रेल्वे 1 जुलैपासून सध्याच्या नियमांमध्ये मोठे बदल करते आहे. या नव्या नियमांचा रेल्वे प्रवाशांना मोठा फायदा होणार असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाकडून केला जातो आहे. तसंच कॅशलेश तिकीट विक्रीवर असणाऱ्या नियमांमध्येही बदल केले जाणार आहेत. रेल्वेचं तात्काळ तिकीट रद्द केल्यास 50 टक्के पैसे प्रवाशांना रिफंड केले जाणार आहेत. याआधी तात्काळ  तिकीट रद्द केल्यास एकही रूपया परत दिला जात नव्हता. तसंच सेकंड एसीवर शंभर रूपये, थर्ड एसीसाठी 90 रूपये आणि स्लीपर कोचसाठी 60 रूपये कापले जाणार आहेत. तात्काळ तिकीट रद्द करताना हा नियम लागू होइल. 
 
असे असतील नवे नियम- 
 
- गाडीच्या नियोजित वेळेच्या 48 तासापासून ते 12 तास आधीपर्यंत तिकीट रद्द केल्यास 25 टक्के चार्ज लागतो. यामध्ये एक अट टाकण्यात आली आहे, 25 टक्के किंवा 48 तासांच्या आधीच्या चार्जपैकी जो चार्ज जास्त असेल तो लागू होणार आहे. 
 
- ट्रेन यायचा 12 ते 4 तास आधी तिकीट रद्द करण्यावर तिकिटाच्या 50 टक्के चार्ज लावला जातो. यामध्ये एक नियम लागू करण्यात आला आहे, 50 टक्के किंवा 48 तास आधी तिकीट  रद्द केल्यावर लागणाऱ्या चार्जपेक्षा जो जास्त असेल तो चार्ज लागला जाणार आहे.  जर एखाद्या व्यकतीने गाडीच्या नियोजित वेळेच्या चार तास आधी तिकीट रद्द केल्यास त्या व्यक्तीला तिकीटाचे पैसे परत मिळणार नाही. 
 
- RAC तिकीट धारकांनी ट्रेन येण्याच्या तीस मिनीटं आधीपर्यंत तिकीट रद्द केल्यास कॅन्सलेशन चार्ज कापून पैसे परत मिळतील. 
 
- जर तुमच्याकडे ई-तिकीट असेल आणि जर ट्रेन रद्द झाली तर त्यासाठी तिकीट डिपॉझिट रिसिप्ट जमा करणं गरजेचं नाही. तिकीटाचे पैसे परस्पर अकाउंटमध्ये जमा होतील. तर काउंटर तिकीटचा रिफंड तिकीट काउंटरवरच दिला जाइल. 
 
- जर तुमच्याकडे ई-तिकीट असेल आणि नाव वेटिंग यादीत असल्यास प्रवाशांना प्रवास  करता येणार नाही. वेटिंगमध्ये ई-तिकीट घेऊन प्रवास केल्यास बिना-तिकीट ग्राह्य धरलं जाइल. वेटिंग ई-तिकीट परस्पर रद्द होणार आहे तसंत तिकिटाचे पैसे त्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये जमा केले जाणार आहेत.