शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

काय घडलं त्या दिवशी! चमोली दुर्घटनेत बचावलेल्यांनी सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव

By देवेश फडके | Updated: February 10, 2021 11:39 IST

प्रचंड मोठ्या दुर्घटनेतून वाचलेल्या १२ जणांनी चित्तथरारक अनुभव कथन केला आहे. उत्तराखंडात चमोली जिल्ह्यात हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर चौथ्या दिवशीही बचावकार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

ठळक मुद्देचमोली दुर्घटनेतून बचावलेल्या कर्मचाऱ्यांनी कथन केला रोमांचकारी अनुभवगाणी, व्यायाम यांनी दिला धीरआयटीबीपीच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले

चमोली : उत्तराखंडात चमोली जिल्ह्यात हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर चौथ्या दिवशीही बचावकार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. भारतीय लष्करासह एनडीआरएफ, आयटीबीपीचे जवान दिवस-रात्र मदतकार्य करत आहे. या दुर्घटनेतील १९७ जण अद्यापही बेपत्ता असून, ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, प्रचंड मोठ्या दुर्घटनेतून वाचलेल्या १२ जणांनी चित्तथरारक अनुभव कथन केला आहे. (chamoli disaster survivors recount nightmarish tales their experience)

तपोवन येथे भूमिगत बोगद्यात काही कर्मचारी अडकले होते. त्यातील १२ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. भारत-तिबेट सीमा पोलिसांच्या पथकाने या सर्वांना रुग्णालयात दाखल केले. या सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांनी अक्षरशः अंगावर शहारे आणणारा अनुभव सांगितला. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनचे हे कर्मचारी सुमारे १० तास जीवन-मृत्यूशी लढा देत होते. 

गाण्यांनी दिला मोठा आधार

चमोली दुर्घटनेतून बचावलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, जेव्हा सर्व आशा संपुष्टात आल्या, तेव्हा आम्ही गाणी म्हणायला सुरुवात केली. गढवाली आणि नेपाली भाषेतील गाणी म्हटली. जोरजोरात म्हटली. एकमेकांना शायरी ऐकवली आणि आत्मविश्वास कायम ठेवण्यासाठी हरसंभव प्रयत्न केले. सुमारे ७ तास आम्ही गाणी म्हणत होतो, असा रोमांचकारी अनुभव त्यांनी सांगितला.

आयटीबीपी पथकाने वाचवले

एका कर्मचाऱ्याने सांगितले की, बर्फाळ पाणी आमच्या बुटांमध्ये शिरले होते. त्यामुळे चालताना अडचणी येत होत्या. थंडीमुळे शरीर थरथरत होते. गाणी म्हणत असताना आम्ही व्यायाम करायला सुरुवात केली. व्यायामुळे शरीर उबदार राहण्यास मदत झाली. तीन ते चार तास असेच घालवले. आमच्या मोबाइलवरून संपर्क साधण्याचेही काही प्रयत्न केले. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता आयटीबीपीचे पथक आले आणि आम्हांला सुखरूप बाहेर काढले. 

नेपाळी कामगारांचा अनुभव

हिमकडा कोसळल्यानंतर पाणी भूयारात शिरले. पाणी दोन मीटरपर्यंत वाढले, तेव्हा आम्ही स्टीलच्या काठीचा वापर करून वरती राहण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा स्तर कमी झाल्यानंतर काही तास रांगत पुढे गेलो. मात्र, मलबा असल्याने पुढे जाण्यात अडचणी येत होत्या. त्यानंतर आम्ही कंपनीशी संपर्क साधून आतील परिस्थितीबाबत सूचना दिल्या. त्यामुळे आयटीबीपी पथक सतर्क झाले आणि पुढे येऊन आम्हांला वाचवले.

टॅग्स :uttarakhand glacier burstउत्तराखंड हिमकडाIndian Armyभारतीय जवान