शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

काय घडलं त्या दिवशी! चमोली दुर्घटनेत बचावलेल्यांनी सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव

By देवेश फडके | Updated: February 10, 2021 11:39 IST

प्रचंड मोठ्या दुर्घटनेतून वाचलेल्या १२ जणांनी चित्तथरारक अनुभव कथन केला आहे. उत्तराखंडात चमोली जिल्ह्यात हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर चौथ्या दिवशीही बचावकार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

ठळक मुद्देचमोली दुर्घटनेतून बचावलेल्या कर्मचाऱ्यांनी कथन केला रोमांचकारी अनुभवगाणी, व्यायाम यांनी दिला धीरआयटीबीपीच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले

चमोली : उत्तराखंडात चमोली जिल्ह्यात हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर चौथ्या दिवशीही बचावकार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. भारतीय लष्करासह एनडीआरएफ, आयटीबीपीचे जवान दिवस-रात्र मदतकार्य करत आहे. या दुर्घटनेतील १९७ जण अद्यापही बेपत्ता असून, ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, प्रचंड मोठ्या दुर्घटनेतून वाचलेल्या १२ जणांनी चित्तथरारक अनुभव कथन केला आहे. (chamoli disaster survivors recount nightmarish tales their experience)

तपोवन येथे भूमिगत बोगद्यात काही कर्मचारी अडकले होते. त्यातील १२ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. भारत-तिबेट सीमा पोलिसांच्या पथकाने या सर्वांना रुग्णालयात दाखल केले. या सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांनी अक्षरशः अंगावर शहारे आणणारा अनुभव सांगितला. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनचे हे कर्मचारी सुमारे १० तास जीवन-मृत्यूशी लढा देत होते. 

गाण्यांनी दिला मोठा आधार

चमोली दुर्घटनेतून बचावलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, जेव्हा सर्व आशा संपुष्टात आल्या, तेव्हा आम्ही गाणी म्हणायला सुरुवात केली. गढवाली आणि नेपाली भाषेतील गाणी म्हटली. जोरजोरात म्हटली. एकमेकांना शायरी ऐकवली आणि आत्मविश्वास कायम ठेवण्यासाठी हरसंभव प्रयत्न केले. सुमारे ७ तास आम्ही गाणी म्हणत होतो, असा रोमांचकारी अनुभव त्यांनी सांगितला.

आयटीबीपी पथकाने वाचवले

एका कर्मचाऱ्याने सांगितले की, बर्फाळ पाणी आमच्या बुटांमध्ये शिरले होते. त्यामुळे चालताना अडचणी येत होत्या. थंडीमुळे शरीर थरथरत होते. गाणी म्हणत असताना आम्ही व्यायाम करायला सुरुवात केली. व्यायामुळे शरीर उबदार राहण्यास मदत झाली. तीन ते चार तास असेच घालवले. आमच्या मोबाइलवरून संपर्क साधण्याचेही काही प्रयत्न केले. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता आयटीबीपीचे पथक आले आणि आम्हांला सुखरूप बाहेर काढले. 

नेपाळी कामगारांचा अनुभव

हिमकडा कोसळल्यानंतर पाणी भूयारात शिरले. पाणी दोन मीटरपर्यंत वाढले, तेव्हा आम्ही स्टीलच्या काठीचा वापर करून वरती राहण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा स्तर कमी झाल्यानंतर काही तास रांगत पुढे गेलो. मात्र, मलबा असल्याने पुढे जाण्यात अडचणी येत होत्या. त्यानंतर आम्ही कंपनीशी संपर्क साधून आतील परिस्थितीबाबत सूचना दिल्या. त्यामुळे आयटीबीपी पथक सतर्क झाले आणि पुढे येऊन आम्हांला वाचवले.

टॅग्स :uttarakhand glacier burstउत्तराखंड हिमकडाIndian Armyभारतीय जवान