शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

विद्यापीठांपुढे संकुचित विचारांचे आव्हान

By admin | Updated: March 26, 2017 00:33 IST

भारतात विद्यापीठांमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यासमोर संकुचित विचारसणीचे आव्हान असून

चंदिगढ : भारतात विद्यापीठांमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यासमोर संकुचित विचारसणीचे आव्हान असून ‘मुक्त अवकाश’ आणि उदारमतवादी मूल्यांच्या नवीनीकरणाचे स्रोत म्हणून त्यांचा बचाव करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी शनिवारी येथे केले. विद्यापीठे लोकांसाठी सामाजिक गतिशीलता आणि समानतेच्या संधी उपलब्ध करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बौद्धिक अविश्वासाच्या या काळात मुक्त अवकाश, ज्ञानाचे खजिने आणि उदार मूल्यांच्या नवीनीकरणाचे स्रोत म्हणून त्यांचा बचाव करणे अत्यावश्यक आहे, असे ते पंजाब विद्यापीठाच्या ६६ व्या दीक्षान्त सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी म्हणाले. देशातील अलीकडच्या घटनांचा थेट उल्लेख न करता उपराष्ट्रपती म्हणाले की, विद्यापीठ कसे असावे आणि कसे नसावे, याबाबत संभ्रम असल्याचे दिसून येते. विद्यापीठांच्या स्वातंत्र्याला जनहिताच्या नावाखाली संकुचित विचारांकडून आव्हान देण्यात आले आहे. आमच्या घटनेत असहमती आणि आंदोलनाच्या हक्काचा मूलभूत हक्कांत समावेश आहे. हा हक्क संकुचित, धार्मिक आणि वैचारिकतेच्या आधारे देशाची व्याख्या करण्यास मनाई करतो. गैरवर्तणूक किंवा हिंसाचाराची प्रकरणे वगळता कोणत्याही विद्यापीठाने आपले शिक्षक आणि विद्यार्थ्यांना विशिष्ट भूमिका घेण्यास किंवा एखाद्या भूमिकेला विरोध करण्यास भाग पाडायला नको. वास्तविक विद्यापीठांनी आपली शैक्षणिक अखंडता अणि स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली पाहिजे, असेही अन्सारी म्हणाले.(वृत्तसंस्था)बौद्धिक स्वातंत्र्याला चालना मिळावीदिल्ली विद्यापीठाच्या नॉर्थ कॅम्पसमध्ये अभाविप आणि डाव्यांशी संलग्न एआयएसए या संघटनांत झालेल्या राड्यांसह इतर शिक्षण संस्थांतील ताज्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी हे खडे बोल सुनावले. विद्यापीठाने बौद्धिक स्वातंत्र्याला चालना मिळेल, असे वातावरण तयार केले पाहिजे. बौद्धिक असंतोषात मतभेद तसेच प्रतिस्पर्ध्यांची समज स्पष्ट करण्याचे सामर्थ्य आहे. यामुळे आम्हा सर्वांना आपल्या विचारांतील सामर्थ्य आणि कमकुवतता ओळखण्यास मदत होते, असेही ते म्हणाले.