शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

विद्यापीठांपुढे संकुचित विचारांचे आव्हान

By admin | Updated: March 26, 2017 00:33 IST

भारतात विद्यापीठांमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यासमोर संकुचित विचारसणीचे आव्हान असून

चंदिगढ : भारतात विद्यापीठांमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यासमोर संकुचित विचारसणीचे आव्हान असून ‘मुक्त अवकाश’ आणि उदारमतवादी मूल्यांच्या नवीनीकरणाचे स्रोत म्हणून त्यांचा बचाव करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी शनिवारी येथे केले. विद्यापीठे लोकांसाठी सामाजिक गतिशीलता आणि समानतेच्या संधी उपलब्ध करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बौद्धिक अविश्वासाच्या या काळात मुक्त अवकाश, ज्ञानाचे खजिने आणि उदार मूल्यांच्या नवीनीकरणाचे स्रोत म्हणून त्यांचा बचाव करणे अत्यावश्यक आहे, असे ते पंजाब विद्यापीठाच्या ६६ व्या दीक्षान्त सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी म्हणाले. देशातील अलीकडच्या घटनांचा थेट उल्लेख न करता उपराष्ट्रपती म्हणाले की, विद्यापीठ कसे असावे आणि कसे नसावे, याबाबत संभ्रम असल्याचे दिसून येते. विद्यापीठांच्या स्वातंत्र्याला जनहिताच्या नावाखाली संकुचित विचारांकडून आव्हान देण्यात आले आहे. आमच्या घटनेत असहमती आणि आंदोलनाच्या हक्काचा मूलभूत हक्कांत समावेश आहे. हा हक्क संकुचित, धार्मिक आणि वैचारिकतेच्या आधारे देशाची व्याख्या करण्यास मनाई करतो. गैरवर्तणूक किंवा हिंसाचाराची प्रकरणे वगळता कोणत्याही विद्यापीठाने आपले शिक्षक आणि विद्यार्थ्यांना विशिष्ट भूमिका घेण्यास किंवा एखाद्या भूमिकेला विरोध करण्यास भाग पाडायला नको. वास्तविक विद्यापीठांनी आपली शैक्षणिक अखंडता अणि स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली पाहिजे, असेही अन्सारी म्हणाले.(वृत्तसंस्था)बौद्धिक स्वातंत्र्याला चालना मिळावीदिल्ली विद्यापीठाच्या नॉर्थ कॅम्पसमध्ये अभाविप आणि डाव्यांशी संलग्न एआयएसए या संघटनांत झालेल्या राड्यांसह इतर शिक्षण संस्थांतील ताज्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी हे खडे बोल सुनावले. विद्यापीठाने बौद्धिक स्वातंत्र्याला चालना मिळेल, असे वातावरण तयार केले पाहिजे. बौद्धिक असंतोषात मतभेद तसेच प्रतिस्पर्ध्यांची समज स्पष्ट करण्याचे सामर्थ्य आहे. यामुळे आम्हा सर्वांना आपल्या विचारांतील सामर्थ्य आणि कमकुवतता ओळखण्यास मदत होते, असेही ते म्हणाले.