शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

काँग्रेसचे मोदी सरकारला आव्हान

By admin | Updated: May 5, 2016 01:36 IST

सत्ताधाऱ्यांतर्फे आरोप अशा व्यक्तींवर लावले जात आहेत की ज्यांचा आॅगस्टा वेस्टलँड सौद्याशी अजिबात संबंध नाही. इटलीत दोन न्यायालयांनी परस्परविरोधी निकाल दिले आहेत.

- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली

सत्ताधाऱ्यांतर्फे आरोप अशा व्यक्तींवर लावले जात आहेत की ज्यांचा आॅगस्टा वेस्टलँड सौद्याशी अजिबात संबंध नाही. इटलीत दोन न्यायालयांनी परस्परविरोधी निकाल दिले आहेत. त्यापैकी एका आदेशातील सोयीस्कर भागाचा राजकीय स्वार्थासाठी वापर करणाऱ्यांवर आपण विश्वास ठेवणार आहोत काय? भारत सार्वभौम राष्ट्र आहे. या देशाचे कायदे स्वतंत्र आहेत. केंद्र सरकारकडे सीबीआय, सक्त वसुली संचलनालय अशा अनेक संस्था आहेत. दोन वर्षांत आरोपातले तथ्य न तपासता, केवळ मोघम आरोपांवर विश्वास ठेवण्याऐवजी सरकारने विवेकाचा वापर करण्याची गरज आहे. आपला मुद्दा स्पष्ट करतांना अभिषेक सिंगवींनी काँग्रेसच्या इराद्याची झलकही शायरीच्या एका पंक्तितून सादर केली. सिंगवी म्हणाले, शाखाओं से टूट जायेवो पत्ते नही है हमआंधियोंसे कह दो अपनी औकात में रहे....!सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक आरोपाचे मुद्देसूद खंडन करीत अभिषेक सिंगवींनी आपल्या अर्ध्या तासाच्या भाषणात सत्ताधाऱ्यांच्या तथाकथित आरोपाच्या अक्षरश: चिंध्या केल्या. सत्तेवर कोण आहे हे महत्वाचे नाही. सरकार ही कायम चालणारी प्रक्रिया आहे, याची जाणीव करून देत सिंगवी म्हणाले, वाजपेयी सरकारच्या काळात या सौद्याचा प्रारंभ झाला. पंतप्रधानांचे तत्कालिन सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा यांनी या कराराला चालना दिली या घटनेसह आॅगस्टा हेलिकॉप्टर सौद्याचे तारीखवार विश्लेषण सिंगवींनी सरकारला सुनावले. त्यांचे भाषण संपताच काँग्रेससह तमाम विरोधकांनी बाके वाजवून सिंगवींचे अभिनंदन केले. सत्ताधारी सदस्य यावेळी बचावात्मक मुद्रेत होते.यानंतर नेहमीच्या भडक शैलीत सुब्रमण्यम स्वामींनी सोनिया गांधींना टार्गेट करीत बोलायला प्रारंभ करताच, ज्या दस्तऐवजांच्या आधारे आपण बेछूट आरोप करीत सुटला आहात, ते सर्वप्रथम सभागृहाच्या पटलावर ठेवून साक्षांकीत करा, असा आग्रह तमाम काँग्रेस सदस्यांनी धरला. सभागृहात यावेळी बराच गदारोळ झाला. या गदारोळातच स्वामी म्हणाले, माझे आरोप तथ्यांवर आधारीत आहेत. ज्या लोकांनी या सौद्यासाठी लाच दिली ते सध्या इटलीच्या तुरूंगात आहेत. आॅगस्टा वेस्टलँड कंपनीला काळया यादीत टाकण्याची प्रक्रिया, मोदी सरकारच्या काळात सुरू झाली. युपीएच्या काळात अशी कोणती शक्ती होती की ज्याने तत्कालिन संरक्षण मंत्री अँथनींना कराराच्या शर्ती बदलण्यास भाग पाडले. पोलिटिकल सेक्रेटरी व एपी ही आद्याक्षरे कोणाच्या दिशेने अंगुली निर्देश करीत आहेत? असा सवाल करीत स्वामींनी सोनिया गांधींचे नाव असलेल्या एका पत्रातला मसुदा वाचायला प्रारंभ केला तेव्हा सभागृहातला गदारोळ टीपेला पोहोचला. यावेळी हातातली फाईल उंचावत अत्यंत त्वेषाने अहमद पटेल म्हणाले, आपल्या आरोपातले खरे तथ्य तुम्ही सभागृहासमोर ठेवणार नसाल तर माझ्याकडे ही फाईल तयार आहे. त्यात आम्ही कोणीही भ्रष्टाचार केल्याचा एकही पुरावा नाही. ही फाईल सभागृहाच्या पटलावर ठेवायला मी तयार आहे. राज्यसभेत आॅगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर सौद्यातील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत अल्पकालिन चर्चेचा प्रारंभ झाला. भाजपच्या भूपेंद्र यादवांनी चर्चेची सुरूवात केली. कॅग अहवालाचा आधार घेत यादव म्हणाले, विशिष्ठ कंपनीला कंत्राट मिळावे म्हणून ठरलेल्या शर्तीत बदल करण्यात आले. हेलिकॉप्टर्सचे परिक्षणही भारताबाहेर केले. कॅगच्या अहवालानुसार नियोजित किमतीपेक्षा सहा पट किंमत मोजली गेली. भुपेंद्र यादवांच्या आरोपांच्या निमित्ताने सरकारवर बरसत जनता दल (यु) चे नेते शरद यादव म्हणाले, सिंगवींनी मांडलेल्या मुद्यांची मी पुनरावृत्ती करणार नाही मात्र विरोधकांवर बेछूट आरोप करणारा सरकारचा व्यवहार इतका उथळ असू नये. आरोप करणे फार सोपे आहे मात्र सार्वजनिक जीवनात राजकीय नेत्याला आपले निष्कलंक चारित्र्य घडवायला दीर्घकाळ लागतो. दोन वर्षे सरकारने काही केले नाही. अंतत: यातून काहीही निष्पन्न होणार नाही, याची मला खात्री आहे. समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव म्हणाले, विरोधकांनी ज्या बोफोर्स तोफांना बदनाम केले. त्याच तोफा कारगील युध्दात प्रभावी ठरल्या. आॅगस्टा वेस्टलँड सौद्यात काहीतरी अनियमितता आहे, असे लक्षात येताच युपीए सरकारने आपल्या कारकिर्दीतच सौदा रद्द केला. व्यवहाराची चौकशी करण्याची जबाबदारी सीबीआयकडे सोपवली. वादग्रस्त सौद्यातल्या तीन हेलिकॉप्टर्सना बाजूला ठेवून त्यांचा वापर टाळला. या बाबीही लक्षात घ्यायला हव्यात. संरक्षण खरेदीसारख्या संवेदनशील विषयात आरोपांच्या अशाच फैरी झडत राहिल्या तर देशाचे संरक्षणच धोक्यात येईल, याचे भान ठेवले पाहिजे. - बसप नेत्या मायावती म्हणाल्या, वादग्रस्त खरेदी प्रकरणाची भारतात चौकशी सुरू आहे. अन्य देशातल्या न्यायालयांच्या निकालातील काही भागावर बेधडक विश्वास ठेवण्याऐवजी, चौकशीचे निष्कर्ष येईपर्यंत सरकारने थांबायला हवे होते. सरकारच्या हाती खरं तरदोन वर्षे होती. ठरवले असते तर एव्हाना चौकशी पूर्ण झाली असती. आनंद शर्मांनी स्वामींच्या विकृत मानसिकतेवर थेट हल्ला चढवला.