शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

सहारनपूरमध्ये केंद्रीय सुरक्षा दले

By admin | Updated: May 26, 2017 01:10 IST

जातीय हिंसाचार उफाळलेल्या सहारनपूूरमध्ये केंद्राने ४०० दंगलकाबू पोलीस कर्मचारी पाठविले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जातीय हिंसाचार उफाळलेल्या सहारनपूूरमध्ये केंद्राने ४०० दंगलकाबू पोलीस कर्मचारी पाठविले आहेत. हे पथक या भागात शांतता प्रस्थापित करण्यात उत्तर प्रदेश सरकारला मदत करणार आहे. दरम्यान, बुधवारी एका समुदायातील युवकाच्या हत्येनंतर आज गुरुवारी दुसऱ्या समुदायातील एका युवकावर गोळीबाराची घटना घडली. या युवकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सहारनपूर जिल्ह्यातील हिंसाचारात दोन जणांचा बळी गेला असून, ४० लोक जखमी झाले आहेत. राज्य सरकारच्या विनंतीनंतर केंद्राने दंगलकाबू पोलीस पथक रवाना केले. राज्य सरकारने हिंसाचाराच्या घटनांबाबत प्राथमिक अहवालही केंद्रीय गृह मंत्रालयाला पाठविला आहे. गृह मंत्रालयाने सहारनपूरमधील घटनांबाबत राज्य सरकारकडून अहवाल मागवला होता. राज्य सरकारच्या विनंतीनंतर सहारनपूरला शीघ्र कृती दलाच्या (आरएएफ) चार कंपन्या (जवळपास ४०० जवान) पाठविण्यात आल्या आहेत. हे कर्मचारी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारला मदत करतील, असे गृह मंत्रालयाचे प्रवक्ते अशोक प्रसाद यांनी पत्रकारांना सांगितले.