शहरं
Join us  
Trending Stories
1
मेस्सी राष्ट्रवादीच्या नेत्याला भेटायला जाणार, ते शरद पवार नाहीत; दिल्लीत कंपन्यांनी एका 'हँडशेक'साठी मोजले १ कोटी...
2
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
3
Sydney Shooting: पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे
4
राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली
5
जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच...
6
सुपरहिरो! "मी मरणार आहे, कुटुंबाला सांगा...", गन हिसकावली, दहशतवाद्यांशी भिडला अहमद
7
धक्कादायक! प्रसिद्ध दिग्दर्शक आणि त्याच्या पत्नीची राहत्या घरी निर्घृण हत्या; मनोरंजन विश्वात खळबळ
8
खळबळजनक! वहिनीचं भयंकर 'सरप्राईज गिफ्ट'; नणंदेच्या डोळ्यांवर पट्टी बांधून तव्याने केले ५० वार
9
IND vs SA: टी२० मध्ये सुपरफास्ट ४००० धावा, तिलक वर्माचा नवा विक्रम, विराटलाही टाकलं मागं!
10
Pune Crime: कोचिंगमध्ये रक्तरंजित संघर्ष! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ला; एकाचा मृत्यू; हल्ला करणारा विद्यार्थी फरार
11
"खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही..."; भाजपात प्रवेश करताच तेजस्वी घोसाळकरांनी मांडली व्यथा
12
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
13
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
14
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
15
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
16
Health Tips: हृदय विकाराच्या 'या' सात सूक्ष्म संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच करा उपाय!
17
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
18
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
19
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
20
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरातील हिंसाचार प्रकरणी केंद्र सरकार गाफील

By admin | Updated: August 4, 2016 04:10 IST

काश्मीरमधील हिंसाचाराची धग कायम असून, मंगळवारी पुन्हा दोन आंदोलकांचा मृत्यू झाला.

श्रीनगर : काश्मीरमधील हिंसाचाराची धग कायम असून, मंगळवारी पुन्हा दोन आंदोलकांचा मृत्यू झाला. दरम्यान, काश्मीरमधील हिंसाचाराबाबत केंद्र सरकार गाफील असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी बुधवारी केला. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर यांनी टिष्ट्वट केले आहे की, काल दोन आंदोलकांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना अजूनही यात गांभीर्य वाटत नाही; पण केंद्र सरकारही एवढे गाफील कसे? असा सवालही ओमर यांनी केला आहे. पुलवामा जिल्ह्याच्या लेथपुरा भागात मंगळवारी रात्री आंदोलकांनी एका सरकारी अधिकाऱ्याची जीप जाळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सुरक्षा अधिकाऱ्याने गोळीबार केला. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर दुसरा इसम गंभीर जखमी झाला. काश्मिरात संचारबंदी वाढविली काश्मिरात मंगळवारी रात्री झालेल्या हिंसक आंदोलनानंतर येथे संचारबंदी वाढविण्यात आली आहे. पुलवामा जिल्ह्यात अनेक जण या आंदोलनात जखमी झाले आहेत. एका हॉस्पिटलच्या बाहेर रेयाज अहमद या तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरावर छर्ऱ्याच्या खुणा होत्या. त्यानंतर जमाव संतप्त झाला. शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप आला नाही. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, संचारबंदी आतापर्यंत जुन्या शहराच्या पाच पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रात होती. आता बटमालू, शहीदगंज, सौर, जदिबल, कमरवारी आणि बेमिना या भागांत संचारबंदी वाढविण्यात आली आहे. तथापि, बारामुल्ला जिल्ह्याच्या खानपुरा भागात, पुलवामाच्या अवंतिपुरा व पंपोरमध्येही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)>संयुक्त राष्ट्र म्हणते, एलओसीपलीकडील क्षेत्र आमच्या अधिकारात नाही एलओसीपलीकडील (नियंत्रण रेषा) क्षेत्र आमच्या अधिकार क्षेत्रात नाही, असे स्पष्टीकरण संयुक्त राष्ट्र संघाने दिले आहे. संयुक्त राष्ट्राने यापूर्वी स्पष्ट केले होते की, भारत आणि पाकिस्तानमधील आपल्या निरीक्षक गटाकडून (यूएनएमओजीआयपी) आपण काश्मीरवर नजर ठेवून आहोत. याच वक्तव्यावरून संयुक्त राष्ट्र संघाने आता यू टर्न घेतला आहे. संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. विशेष म्हणजे एक दिवसापूर्वीच उप प्रवक्ते फरहान हक यांनी सांगितले होते की, संयुक्त राष्ट्र आपल्या निरीक्षकांच्या गटामार्फत काश्मीरच्या परिस्थितीवर सातत्याने नजर ठेवणार आहे. दरम्यान, भारताचे सातत्याने हेच म्हणणे आहे की, सिमला करारानंतर यूएनएमओजीआयपीचे महत्त्व संपले आहे.