शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

काश्मिरातील हिंसाचार प्रकरणी केंद्र सरकार गाफील

By admin | Updated: August 4, 2016 04:10 IST

काश्मीरमधील हिंसाचाराची धग कायम असून, मंगळवारी पुन्हा दोन आंदोलकांचा मृत्यू झाला.

श्रीनगर : काश्मीरमधील हिंसाचाराची धग कायम असून, मंगळवारी पुन्हा दोन आंदोलकांचा मृत्यू झाला. दरम्यान, काश्मीरमधील हिंसाचाराबाबत केंद्र सरकार गाफील असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी बुधवारी केला. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर यांनी टिष्ट्वट केले आहे की, काल दोन आंदोलकांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना अजूनही यात गांभीर्य वाटत नाही; पण केंद्र सरकारही एवढे गाफील कसे? असा सवालही ओमर यांनी केला आहे. पुलवामा जिल्ह्याच्या लेथपुरा भागात मंगळवारी रात्री आंदोलकांनी एका सरकारी अधिकाऱ्याची जीप जाळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सुरक्षा अधिकाऱ्याने गोळीबार केला. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर दुसरा इसम गंभीर जखमी झाला. काश्मिरात संचारबंदी वाढविली काश्मिरात मंगळवारी रात्री झालेल्या हिंसक आंदोलनानंतर येथे संचारबंदी वाढविण्यात आली आहे. पुलवामा जिल्ह्यात अनेक जण या आंदोलनात जखमी झाले आहेत. एका हॉस्पिटलच्या बाहेर रेयाज अहमद या तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरावर छर्ऱ्याच्या खुणा होत्या. त्यानंतर जमाव संतप्त झाला. शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप आला नाही. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, संचारबंदी आतापर्यंत जुन्या शहराच्या पाच पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रात होती. आता बटमालू, शहीदगंज, सौर, जदिबल, कमरवारी आणि बेमिना या भागांत संचारबंदी वाढविण्यात आली आहे. तथापि, बारामुल्ला जिल्ह्याच्या खानपुरा भागात, पुलवामाच्या अवंतिपुरा व पंपोरमध्येही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)>संयुक्त राष्ट्र म्हणते, एलओसीपलीकडील क्षेत्र आमच्या अधिकारात नाही एलओसीपलीकडील (नियंत्रण रेषा) क्षेत्र आमच्या अधिकार क्षेत्रात नाही, असे स्पष्टीकरण संयुक्त राष्ट्र संघाने दिले आहे. संयुक्त राष्ट्राने यापूर्वी स्पष्ट केले होते की, भारत आणि पाकिस्तानमधील आपल्या निरीक्षक गटाकडून (यूएनएमओजीआयपी) आपण काश्मीरवर नजर ठेवून आहोत. याच वक्तव्यावरून संयुक्त राष्ट्र संघाने आता यू टर्न घेतला आहे. संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. विशेष म्हणजे एक दिवसापूर्वीच उप प्रवक्ते फरहान हक यांनी सांगितले होते की, संयुक्त राष्ट्र आपल्या निरीक्षकांच्या गटामार्फत काश्मीरच्या परिस्थितीवर सातत्याने नजर ठेवणार आहे. दरम्यान, भारताचे सातत्याने हेच म्हणणे आहे की, सिमला करारानंतर यूएनएमओजीआयपीचे महत्त्व संपले आहे.