शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
5
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
6
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
7
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
8
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
9
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
10
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
11
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
12
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
13
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
14
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
15
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
16
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
17
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
18
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
19
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
20
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

काश्मिरी फुटीरवाद्यांवर केंद्र सरकारचा ३५६ कोटी रुपये खर्च

By admin | Updated: September 9, 2016 04:45 IST

काश्मिरी फुटीरवाद्यांवर सरकारचे गेल्या पाच वर्षांमध्ये ३५६ कोटी रुपये खर्च झाला असून, केंद्राच्या निधीतून होणारा हा खर्च थांबवावा अशी मागणी करणारी याचिका एका वकिलाने सुप्रीम कोर्टात

नवी दिल्ली : काश्मिरी फुटीरवाद्यांवर सरकारचे गेल्या पाच वर्षांमध्ये ३५६ कोटी रुपये खर्च झाला असून, केंद्राच्या निधीतून होणारा हा खर्च थांबवावा अशी मागणी करणारी याचिका एका वकिलाने सुप्रीम कोर्टात केली असून, यावर १४ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. न्यायमुर्ती ए. आर. दवे आणि एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने गुरुवारी हा निर्णय दिला. वकील एम. एल. शर्मा यांनी ही याचिका व्यक्तिगत पातळीवर केली आहे. फुटीरवाद्यांना दिल्या जाणाऱ्या कथित निधीची केंद्रीय गुप्तचर खात्यामार्फत चौकशी करावी, अशी मागणी याचिकेमध्ये करण्यात आली आहे. भारताच्या एकीकृत निधीतून फुटीरवादी गटांना कोणत्याही अधिकाराशिवाय व कायदेशीर परवानगीशिवाय पैसे दिले जाणे चूक आहे, असे जाहीर करावे, अशी मागणी शर्मा यांनी केली आहे. हे गट देशाविरोधात काम करीत असून त्यांना पैसा पुरवणे हे घटनेच्याविरोधात, बेकायदा व भारतीय दंड विधानाचे कलम ४०९ नुसार गुन्हेगारी स्वरुपाचा विश्वासघात असल्याचे याचिकेत म्हटले आहे. शर्मा यांनी विविध प्रसारमाध्यमांत आलेल्या वृत्तांचा हवाला देऊन म्हटले आहे की फुटीरवाद्यांना राहणे, प्रवास करणे व इतर उद्देशांसाठी दिल्या जाणाऱ्या पैशांचे औचित्य काय? न्यायालयानेही तुमच्या या भावनेशी आम्ही सहमत असल्याचे म्हटले. देशविरोधात काम करणाऱ्यांना सरकार पैसा पुरवू शकत नसल्याचे शर्मा यांचे म्हणणे आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)फुटीरवाद्यांची सरकारी पैशांवर मौजभारताने गेल्या पाच वर्षांत या फुटीरवाद्यांचा प्रवास, सुरक्षा आणि हॉटेल्समधील मुक्कामावर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. भारतविरोधातील फुटीरवाद्यांची मोहीम चालविण्यासाठी त्यांच्या प्रवासावर सरकारने २६.४३ कोटी रुपये व फुटीरवाद्यांच्या ऐषोरामी हॉटेल्समधील मुक्कामावर २१ कोटी रुपये खर्च केल्याचे याचिकेत म्हटले आहे. या खर्चाचा बोजा संसदेला न कळवता करदात्यांवर लादण्यात आला आहे व देशाच्या महालेखापालांनीही हा निधी कसा वापरला गेला याचा अहवाल कधीही सादर केलेला नाही, असे शर्मा यांनी म्हटले आहे.