शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

काश्मिरी फुटीरवाद्यांवर केंद्र सरकारचा ३५६ कोटी रुपये खर्च

By admin | Updated: September 9, 2016 04:45 IST

काश्मिरी फुटीरवाद्यांवर सरकारचे गेल्या पाच वर्षांमध्ये ३५६ कोटी रुपये खर्च झाला असून, केंद्राच्या निधीतून होणारा हा खर्च थांबवावा अशी मागणी करणारी याचिका एका वकिलाने सुप्रीम कोर्टात

नवी दिल्ली : काश्मिरी फुटीरवाद्यांवर सरकारचे गेल्या पाच वर्षांमध्ये ३५६ कोटी रुपये खर्च झाला असून, केंद्राच्या निधीतून होणारा हा खर्च थांबवावा अशी मागणी करणारी याचिका एका वकिलाने सुप्रीम कोर्टात केली असून, यावर १४ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. न्यायमुर्ती ए. आर. दवे आणि एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने गुरुवारी हा निर्णय दिला. वकील एम. एल. शर्मा यांनी ही याचिका व्यक्तिगत पातळीवर केली आहे. फुटीरवाद्यांना दिल्या जाणाऱ्या कथित निधीची केंद्रीय गुप्तचर खात्यामार्फत चौकशी करावी, अशी मागणी याचिकेमध्ये करण्यात आली आहे. भारताच्या एकीकृत निधीतून फुटीरवादी गटांना कोणत्याही अधिकाराशिवाय व कायदेशीर परवानगीशिवाय पैसे दिले जाणे चूक आहे, असे जाहीर करावे, अशी मागणी शर्मा यांनी केली आहे. हे गट देशाविरोधात काम करीत असून त्यांना पैसा पुरवणे हे घटनेच्याविरोधात, बेकायदा व भारतीय दंड विधानाचे कलम ४०९ नुसार गुन्हेगारी स्वरुपाचा विश्वासघात असल्याचे याचिकेत म्हटले आहे. शर्मा यांनी विविध प्रसारमाध्यमांत आलेल्या वृत्तांचा हवाला देऊन म्हटले आहे की फुटीरवाद्यांना राहणे, प्रवास करणे व इतर उद्देशांसाठी दिल्या जाणाऱ्या पैशांचे औचित्य काय? न्यायालयानेही तुमच्या या भावनेशी आम्ही सहमत असल्याचे म्हटले. देशविरोधात काम करणाऱ्यांना सरकार पैसा पुरवू शकत नसल्याचे शर्मा यांचे म्हणणे आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)फुटीरवाद्यांची सरकारी पैशांवर मौजभारताने गेल्या पाच वर्षांत या फुटीरवाद्यांचा प्रवास, सुरक्षा आणि हॉटेल्समधील मुक्कामावर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. भारतविरोधातील फुटीरवाद्यांची मोहीम चालविण्यासाठी त्यांच्या प्रवासावर सरकारने २६.४३ कोटी रुपये व फुटीरवाद्यांच्या ऐषोरामी हॉटेल्समधील मुक्कामावर २१ कोटी रुपये खर्च केल्याचे याचिकेत म्हटले आहे. या खर्चाचा बोजा संसदेला न कळवता करदात्यांवर लादण्यात आला आहे व देशाच्या महालेखापालांनीही हा निधी कसा वापरला गेला याचा अहवाल कधीही सादर केलेला नाही, असे शर्मा यांनी म्हटले आहे.