शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

उत्तराखंडने उडविली केंद्र सरकारची झोप

By admin | Updated: April 21, 2016 03:40 IST

उत्तराखंडमधील काँग्रेसचे सरकार बडतर्फ करीत राष्ट्रपती राजवट लागू केल्यामुळे मोदी सरकारची चिंता वाढली आहे. २५ एप्रिल रोजी संसदेचे अधिवेशन सुरू होईल तेव्हा या निर्णयावर संसदेची

हरीश गुप्ता, नवी दिल्लीउत्तराखंडमधील काँग्रेसचे सरकार बडतर्फ करीत राष्ट्रपती राजवट लागू केल्यामुळे मोदी सरकारची चिंता वाढली आहे. २५ एप्रिल रोजी संसदेचे अधिवेशन सुरू होईल तेव्हा या निर्णयावर संसदेची मोहोर लागणे अशक्य असताना न्यायालयाने अवलंबलेल्या कठोर भूमिकेमुळे केंद्र सरकारला अन्याय पर्यायांवर विचार करणे भाग पडणार आहे.उच्च न्यायालयात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना केंद्र सरकारला आधीच चपराक बसली आहे. बहुमत नसल्यामुळे राज्यसभेतही सरकारचे पानीपत होणार हे निश्चित. संसदेचे अधिवेशन सुरू होताच दोन आठवड्यात स्वतंत्ररीत्या दोन्ही सभागृहांची राष्ट्रपती राजवटीला संमती मिळविणे बंधनकारक आहे. मध्येच संस्थगित करण्यात आलेले अधिवेशन सुरू होताच सरकारला लोकसभेत मंजुरी मिळविणे शक्य होईल; मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राज्यसभेत सरकारला पराभव अटळ आहे. निवडून आलेले राज्य सरकार फूट पाडून बडतर्फ करणे योग्य आहे काय? हा प्रश्न उपस्थित झाला असून भाजपला तृणमूल काँग्रेस, अण्णाद्रमुक, समाजवादी पक्ष, बसपा आणि बिजदसारख्या प्रमुख प्रादेशिक पक्षांचा पाठिंबा मिळवावा लागेल. यातील बहुतांश पक्ष सरकारला विविध मुद्यांवर समर्थन देत असले तरी सरकार पाडल्याबद्दल केंद्र सरकारला यापैकी एकही पक्ष समर्थन देण्याची शक्यता नाही.>शक्तिपरीक्षणाचा मार्ग प्रशस्त करणार...संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच हा वाद संसदेबाहेर सोडविण्यावर सरकार भर देणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. अपात्र आमदारांच्या याचिकेवर न्यायालयाचा निर्णय काहीही लागो, राष्ट्रपती राजवट मागे घेतानाच नऊ बंडखोर आमदारांना अपात्र ठेवून हरीश रावत यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची संधी देण्याचा मार्ग केंद्र सरकार प्रशस्त करू शकते. येत्या काही दिवसांतच सरकारकडून अंतिम निर्णयाची अपेक्षा आहे.> उत्तराखंडचा प्रयोग घातकच -तृणमूल काँग्रेस...आमचा काँग्रेसला विरोध आहे मात्र उत्तराखंडमधील प्रयोग हा घातक पायंडा ठरेल. कोणतेही निवडून आलेले सरकार निसटते बहुमत असल्यास मूठभर आमदारांच्या बळावर खाली खेचले जाईल. आज उत्तराखंडबाबत हे घडले उद्या ते प. बंगालबाबत घडेल. तृणमूल काँग्रेस बहुमतात असली तरी फूट पाडून सरकार अल्पमतात आणले जाईल. हा घातक पायंडा असून पक्षांतरविरोधी कायद्याची टर उडविणे ठरते, असे तृणमूल काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने लोकमतला प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले.