शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

उत्तराखंडने उडविली केंद्र सरकारची झोप

By admin | Updated: April 21, 2016 03:40 IST

उत्तराखंडमधील काँग्रेसचे सरकार बडतर्फ करीत राष्ट्रपती राजवट लागू केल्यामुळे मोदी सरकारची चिंता वाढली आहे. २५ एप्रिल रोजी संसदेचे अधिवेशन सुरू होईल तेव्हा या निर्णयावर संसदेची

हरीश गुप्ता, नवी दिल्लीउत्तराखंडमधील काँग्रेसचे सरकार बडतर्फ करीत राष्ट्रपती राजवट लागू केल्यामुळे मोदी सरकारची चिंता वाढली आहे. २५ एप्रिल रोजी संसदेचे अधिवेशन सुरू होईल तेव्हा या निर्णयावर संसदेची मोहोर लागणे अशक्य असताना न्यायालयाने अवलंबलेल्या कठोर भूमिकेमुळे केंद्र सरकारला अन्याय पर्यायांवर विचार करणे भाग पडणार आहे.उच्च न्यायालयात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना केंद्र सरकारला आधीच चपराक बसली आहे. बहुमत नसल्यामुळे राज्यसभेतही सरकारचे पानीपत होणार हे निश्चित. संसदेचे अधिवेशन सुरू होताच दोन आठवड्यात स्वतंत्ररीत्या दोन्ही सभागृहांची राष्ट्रपती राजवटीला संमती मिळविणे बंधनकारक आहे. मध्येच संस्थगित करण्यात आलेले अधिवेशन सुरू होताच सरकारला लोकसभेत मंजुरी मिळविणे शक्य होईल; मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राज्यसभेत सरकारला पराभव अटळ आहे. निवडून आलेले राज्य सरकार फूट पाडून बडतर्फ करणे योग्य आहे काय? हा प्रश्न उपस्थित झाला असून भाजपला तृणमूल काँग्रेस, अण्णाद्रमुक, समाजवादी पक्ष, बसपा आणि बिजदसारख्या प्रमुख प्रादेशिक पक्षांचा पाठिंबा मिळवावा लागेल. यातील बहुतांश पक्ष सरकारला विविध मुद्यांवर समर्थन देत असले तरी सरकार पाडल्याबद्दल केंद्र सरकारला यापैकी एकही पक्ष समर्थन देण्याची शक्यता नाही.>शक्तिपरीक्षणाचा मार्ग प्रशस्त करणार...संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच हा वाद संसदेबाहेर सोडविण्यावर सरकार भर देणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. अपात्र आमदारांच्या याचिकेवर न्यायालयाचा निर्णय काहीही लागो, राष्ट्रपती राजवट मागे घेतानाच नऊ बंडखोर आमदारांना अपात्र ठेवून हरीश रावत यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची संधी देण्याचा मार्ग केंद्र सरकार प्रशस्त करू शकते. येत्या काही दिवसांतच सरकारकडून अंतिम निर्णयाची अपेक्षा आहे.> उत्तराखंडचा प्रयोग घातकच -तृणमूल काँग्रेस...आमचा काँग्रेसला विरोध आहे मात्र उत्तराखंडमधील प्रयोग हा घातक पायंडा ठरेल. कोणतेही निवडून आलेले सरकार निसटते बहुमत असल्यास मूठभर आमदारांच्या बळावर खाली खेचले जाईल. आज उत्तराखंडबाबत हे घडले उद्या ते प. बंगालबाबत घडेल. तृणमूल काँग्रेस बहुमतात असली तरी फूट पाडून सरकार अल्पमतात आणले जाईल. हा घातक पायंडा असून पक्षांतरविरोधी कायद्याची टर उडविणे ठरते, असे तृणमूल काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने लोकमतला प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले.