शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

उर्जा संकट कमी करण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय, येत्या काही दिवसात कोळशाचे उत्पादन वाढवले ​​जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 08:43 IST

पंतप्रधान कार्यालयाने मंगळवारी कोळसा पुरवठा आणि वीजनिर्मिती संदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत कोळशाची वाहतूक वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा झाली.

नवी दिल्ली: देशावर ओढावलेलं ऊर्जा संकट कमी करण्यासाठी केंद्र सरकार राज्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करत आहे. गेल्या चार दिवसात कोळशाचा साठा वाढवण्यावर भर दिला जातोय. एका महिन्यात परिस्थिती सामान्य होईल, असे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे. दैनंदिन वीज आणि कोळशाच्या पुरवठ्यात कोणतीही कमतरता नाही. दरम्यान, उर्जा संकट कमी करण्यासाठी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने राज्यांना  उच्च किंमतीत वीज न विकण्याचे निर्देश दिले आहेत.

सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोळसा मंत्रालय जानेवारीपासून कोल इंडियाकडून स्टॉक घेण्यासाठी राज्यांना पत्र लिहित आहे, परंतु राज्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. कोल इंडिया फक्त एका मर्यादेपर्यंत साठा करू शकतो कारण ओव्हरस्टॉकिंगमुळे कोळशाला आग लागण्याची भीती असते. कोल इंडियाच्या झारखंड, राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये स्वतःच्या कोळशाच्या खाणी आहेत पण उत्खणण कमी किंवा नसल्यातत जमा आहे.

एका कार्यक्रमात केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, वीज उत्पादकांची कोळशाची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कोळसा पुरवठा सध्या 19.5 लाख टन प्रतिदिन आहे, पण आता हा लवकरच 20 लाख टन केला जाणार आहे. कोळसा मंत्रालयात आम्ही या इंधनाची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. सोमवारी 19.5 लाख टन पुरवठा झाला. यातील 16 लाख टन कोळसा कोल इंडिया आणि उर्वरित सिंगराली कोलियरीज कंपनीने पाठवला होता. एकूण 19.5 लाख टन पुरवठा झाला.

कोळशाचा पुरवठा वाढवण्याच्या सूचना

पंतप्रधान कार्यालयाने मंगळवारी कोळसा पुरवठा आणि वीज निर्मिती संदर्भात आढावा बैठक घेतली. बैठकीत कोळशाची वाहतूक वाढवण्याच्या मार्गांवरही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. कोळसा मंत्रालयाला कोळशाचा पुरवठा वाढवण्यास सांगण्यात आले आहे, तर रेल्वेला वीज प्रकल्पांना इंधन वाहून नेण्यासाठी रेक पुरवण्यास सांगितले आहे. कोळशाच्या कमतरतेमुळे राजस्थान ते केरळपर्यंतच्या लोकांना वीज कपातीला सामोरे जावे लागते.

वीज संकट काळात रेल्वेचे मोठे पाऊल

देशातील वीज संकटादरम्यान रेल्वेनेही एक मोठे पाऊल उचलले आहे. आता पॉवर प्लांटमध्ये कोळसा पोहोचवण्यासाठी गाड्या 24 तास चालवल्या जात आहेत. राष्ट्रीय वाहतूकदाराने कोळशाची ही कमतरता आणीबाणी म्हणून घोषित केली आहे. सर्व झोनल रेल्वेच्या प्रिन्सिपल चीफ ऑपरेटिंग मॅनेजर्सना चोवीस तास ऑपरेशनल कंट्रोल रूम तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Coal Shortageकोळसा संकटCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकार