शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

उर्जा संकट कमी करण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय, येत्या काही दिवसात कोळशाचे उत्पादन वाढवले ​​जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 08:43 IST

पंतप्रधान कार्यालयाने मंगळवारी कोळसा पुरवठा आणि वीजनिर्मिती संदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत कोळशाची वाहतूक वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा झाली.

नवी दिल्ली: देशावर ओढावलेलं ऊर्जा संकट कमी करण्यासाठी केंद्र सरकार राज्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करत आहे. गेल्या चार दिवसात कोळशाचा साठा वाढवण्यावर भर दिला जातोय. एका महिन्यात परिस्थिती सामान्य होईल, असे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे. दैनंदिन वीज आणि कोळशाच्या पुरवठ्यात कोणतीही कमतरता नाही. दरम्यान, उर्जा संकट कमी करण्यासाठी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने राज्यांना  उच्च किंमतीत वीज न विकण्याचे निर्देश दिले आहेत.

सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोळसा मंत्रालय जानेवारीपासून कोल इंडियाकडून स्टॉक घेण्यासाठी राज्यांना पत्र लिहित आहे, परंतु राज्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. कोल इंडिया फक्त एका मर्यादेपर्यंत साठा करू शकतो कारण ओव्हरस्टॉकिंगमुळे कोळशाला आग लागण्याची भीती असते. कोल इंडियाच्या झारखंड, राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये स्वतःच्या कोळशाच्या खाणी आहेत पण उत्खणण कमी किंवा नसल्यातत जमा आहे.

एका कार्यक्रमात केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, वीज उत्पादकांची कोळशाची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कोळसा पुरवठा सध्या 19.5 लाख टन प्रतिदिन आहे, पण आता हा लवकरच 20 लाख टन केला जाणार आहे. कोळसा मंत्रालयात आम्ही या इंधनाची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. सोमवारी 19.5 लाख टन पुरवठा झाला. यातील 16 लाख टन कोळसा कोल इंडिया आणि उर्वरित सिंगराली कोलियरीज कंपनीने पाठवला होता. एकूण 19.5 लाख टन पुरवठा झाला.

कोळशाचा पुरवठा वाढवण्याच्या सूचना

पंतप्रधान कार्यालयाने मंगळवारी कोळसा पुरवठा आणि वीज निर्मिती संदर्भात आढावा बैठक घेतली. बैठकीत कोळशाची वाहतूक वाढवण्याच्या मार्गांवरही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. कोळसा मंत्रालयाला कोळशाचा पुरवठा वाढवण्यास सांगण्यात आले आहे, तर रेल्वेला वीज प्रकल्पांना इंधन वाहून नेण्यासाठी रेक पुरवण्यास सांगितले आहे. कोळशाच्या कमतरतेमुळे राजस्थान ते केरळपर्यंतच्या लोकांना वीज कपातीला सामोरे जावे लागते.

वीज संकट काळात रेल्वेचे मोठे पाऊल

देशातील वीज संकटादरम्यान रेल्वेनेही एक मोठे पाऊल उचलले आहे. आता पॉवर प्लांटमध्ये कोळसा पोहोचवण्यासाठी गाड्या 24 तास चालवल्या जात आहेत. राष्ट्रीय वाहतूकदाराने कोळशाची ही कमतरता आणीबाणी म्हणून घोषित केली आहे. सर्व झोनल रेल्वेच्या प्रिन्सिपल चीफ ऑपरेटिंग मॅनेजर्सना चोवीस तास ऑपरेशनल कंट्रोल रूम तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Coal Shortageकोळसा संकटCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकार