शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उर्जा संकट कमी करण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय, येत्या काही दिवसात कोळशाचे उत्पादन वाढवले ​​जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 08:43 IST

पंतप्रधान कार्यालयाने मंगळवारी कोळसा पुरवठा आणि वीजनिर्मिती संदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत कोळशाची वाहतूक वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा झाली.

नवी दिल्ली: देशावर ओढावलेलं ऊर्जा संकट कमी करण्यासाठी केंद्र सरकार राज्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करत आहे. गेल्या चार दिवसात कोळशाचा साठा वाढवण्यावर भर दिला जातोय. एका महिन्यात परिस्थिती सामान्य होईल, असे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे. दैनंदिन वीज आणि कोळशाच्या पुरवठ्यात कोणतीही कमतरता नाही. दरम्यान, उर्जा संकट कमी करण्यासाठी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने राज्यांना  उच्च किंमतीत वीज न विकण्याचे निर्देश दिले आहेत.

सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोळसा मंत्रालय जानेवारीपासून कोल इंडियाकडून स्टॉक घेण्यासाठी राज्यांना पत्र लिहित आहे, परंतु राज्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. कोल इंडिया फक्त एका मर्यादेपर्यंत साठा करू शकतो कारण ओव्हरस्टॉकिंगमुळे कोळशाला आग लागण्याची भीती असते. कोल इंडियाच्या झारखंड, राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये स्वतःच्या कोळशाच्या खाणी आहेत पण उत्खणण कमी किंवा नसल्यातत जमा आहे.

एका कार्यक्रमात केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, वीज उत्पादकांची कोळशाची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कोळसा पुरवठा सध्या 19.5 लाख टन प्रतिदिन आहे, पण आता हा लवकरच 20 लाख टन केला जाणार आहे. कोळसा मंत्रालयात आम्ही या इंधनाची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. सोमवारी 19.5 लाख टन पुरवठा झाला. यातील 16 लाख टन कोळसा कोल इंडिया आणि उर्वरित सिंगराली कोलियरीज कंपनीने पाठवला होता. एकूण 19.5 लाख टन पुरवठा झाला.

कोळशाचा पुरवठा वाढवण्याच्या सूचना

पंतप्रधान कार्यालयाने मंगळवारी कोळसा पुरवठा आणि वीज निर्मिती संदर्भात आढावा बैठक घेतली. बैठकीत कोळशाची वाहतूक वाढवण्याच्या मार्गांवरही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. कोळसा मंत्रालयाला कोळशाचा पुरवठा वाढवण्यास सांगण्यात आले आहे, तर रेल्वेला वीज प्रकल्पांना इंधन वाहून नेण्यासाठी रेक पुरवण्यास सांगितले आहे. कोळशाच्या कमतरतेमुळे राजस्थान ते केरळपर्यंतच्या लोकांना वीज कपातीला सामोरे जावे लागते.

वीज संकट काळात रेल्वेचे मोठे पाऊल

देशातील वीज संकटादरम्यान रेल्वेनेही एक मोठे पाऊल उचलले आहे. आता पॉवर प्लांटमध्ये कोळसा पोहोचवण्यासाठी गाड्या 24 तास चालवल्या जात आहेत. राष्ट्रीय वाहतूकदाराने कोळशाची ही कमतरता आणीबाणी म्हणून घोषित केली आहे. सर्व झोनल रेल्वेच्या प्रिन्सिपल चीफ ऑपरेटिंग मॅनेजर्सना चोवीस तास ऑपरेशनल कंट्रोल रूम तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Coal Shortageकोळसा संकटCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकार