शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

केंद्र सरकारने बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवली

By admin | Updated: January 8, 2016 12:40 IST

ग्रामीण भागांत अतिशय लोकप्रिय असलेल्या बैलगाडीच्या शर्यतीवरील बंदी उठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून आता गावागावांमध्ये पुन्हा ढवळ्या-पवळ्याची जोडी शर्यतीत धावताना दिसेल.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ८ - ग्रामीण भागांत अतिशय लोकप्रिय असलेल्या बैलगाडीच्या शर्यतीवरील बंदी उठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून आता गावागावांमध्ये पुन्हा ढवळ्या-पवळ्याची जोडी शर्यतीत धावताना दिसणार आहे. 
बैलागाड्यांची शर्यत पुन्हा सुरू व्हावी यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यासंदर्भात केंद्रीय पातळीवर विचारही सुरू होता. अखेर आज सरकारने ही मागणी मान्य करत बैलांच्या शर्यतीवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला. मात्र ही परवानगी देतानाच सरकारने काही अटीही घातल्या आहे. या शर्यती आखून दिलेल्या मार्गावरच घेण्यात याव्यात, तसेच त्यांची लांबी २ किलोमीटरपेक्षा जास्त नसावी. शर्यतीपूर्वी बैलांची पशुसंवर्धन विभागाच्या अधिका-यांकडून तपासणी करून घेण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
या शर्यतींदरम्यान बैलांनी जोरात धावावे यासाठी, त्यांना उत्तेजन देण्यासाठी त्यांचे हाल केले जातात, असे सांगत प्राणीमित्र संघटनांनी या शर्यतींना विरोध केला होता. त्या आधारावर पूर्वी काँग्रेस सरकारने बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली होती. 
मात्र शेतकरी नेहमीच आपल्या बैलांची काळजी घेतात, त्यांचा प्रेमाने सांभाळ करतात, शर्यतीसाठी धावणा-या बैलांची तर विशेष काळजी घेतली जाते असा दावा शेतक-यांतर्फे केला जात होता. मात्र तरीही शर्यतींवर बंदी लादण्यात आल्याने शेतक-यांमध्ये नाराजी होती, काही ठिकाणी तर शेतक-यांनी या निर्णयाविरोधात आंदोलनेही केली. अखेर आज सरकारने त्यांची मागणी मान्य करत शर्यतींवरील बंदी उठवल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 
दरम्यान पेटा ( पीपल फॉर दि एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स) या प्राणीमित्र संघटनेने या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ' केंद्र सरकारचा हा निर्णय असंविधानिक व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात असून आम्ही याविरोधात सर्वोच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल करू' असे म्हटले आहे.