शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

केंद्र सरकार शेतक-यांचे हित जपणार - राष्ट्रपतींची ग्वाही

By admin | Updated: February 23, 2015 12:35 IST

भूमी अधिग्रहण विधेयकावरुन विरोधकांनी सरकारची कोंडी करण्याची तयारी सुरु केली असतानाच केंद्र सरकार शेतक-यांचे हित जपण्यास प्राधान्य देईल अशी ग्वाही राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दिली आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. २३ - भूमी अधिग्रहण विधेयकावरुन विरोधकांनी सरकारची कोंडी करण्याची तयारी सुरु केली असतानाच केंद्र सरकार शेतक-यांचे हित जपण्यास प्राधान्य देईल अशी ग्वाही राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दिली आहे. सबका साथ सबका विकास हाच केंद्र सरकारचा अजेंडा असल्याचे राष्ट्रपतींनी म्हटले आहे. 
दिल्लीत आजपासून विरोधकांकडून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त सत्रात अभिभाषण केले. यामध्ये त्यांनी केंद्र सरकारच्या नऊ महिन्याचा कामकाजाचा लेखाजोखा आणि आगामी योजना सभागृहासमोर मांडल्या. विकास करतानाच स्वच्छता राखणे गरजेचे आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधीने त्यांचा ५० टक्के निधी हा स्वच्छता अभियानावर खर्च करावा असे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक शाळेत स्वच्छतागृह, २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर, प्रत्येकाला अन्न, शहर व खेड्यांमध्ये २४ तास वीज यासाठी केंद्र सरकार अथक प्रयत्न करत आहे असे राष्ट्रपतींनी सांगितले. 
 
राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील प्रमुख मुद्दे 
 
उद्योग सहज सुरु करता यावे यासाठी सिंगल विंडो सिस्टम, भारताला उत्पादन हब बनवण्यासाठी मेक इन इंडिया योजना.
अर्थव्यवस्थेचा झपाट्याने विकास होते, आर्थिक विकास दर ७.४ टक्क्यांवर पोहोचला आहे - प्रणव मुखर्जी
केंद्र व राज्य सरकारला एकत्र काम करता यावे यासाठी नियोजन आयोग बरखास्त करुन नीती आयोगाची स्थापना केली
 शिक्षणासाठी पढे भारत, बढे भारत ही योजना राबवणार, शिक्षणाला प्राधान्य देणार
> अहमदाबाद, नागपूरमध्ये मेट्रोला हिरवा कंदील, हाय स्पीड ट्रेनसाठी अंतिम रिपोर्ट तयार
> जास्तीत जास्त रोजगार निर्माण करण्यास केंद्र सरकारचे प्राधान्य
केंद्र सरकार जुने कायदे बंद करणार, अशा १,७४१ कायद्यांची यादी सरकारने तयार केली आहे