शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
2
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
3
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
4
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
5
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
6
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
7
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
8
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
9
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
10
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
11
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
12
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
13
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
14
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
15
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
16
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
17
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
18
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
19
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
20
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?

वाजपेयींच्या पावलावर मोदींचे पाऊल; इंधन साठवण्यासाठी 'हा' पर्याय वापरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 10:34 IST

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने एका महत्त्वपूर्ण निर्णयाला तत्वतः मंजुरी दिली आहे

नवी दिल्ली- केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने एका महत्त्वपूर्ण निर्णयाला तत्वतः मंजुरी दिली आहे. भारतात कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण होऊन आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्यास साठवलेले कच्चे तेल १२ दिवस वापरले जाऊ शकते. आता हाच साठा १२ दिवसांवरून २२ दिवसांपर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. देशातील विविध राज्यांत भूगर्भात खाणकाम करुन हा साठा केला जाईल. 

हे साठे कर्नाटक व ओडिशा या राज्यांमध्ये करण्याचा सरकारचा विचार आहे. पेट्रोलियम पदार्थांच्या तुटवड्यावेळेस वापरायच्या साठ्याला स्ट्रॅटर्जिक पेट्रोलियम रिझर्व्ह म्हणजेच एसपीआर असे म्हटले जाते. या दोन साठ्यांची क्षमता ६.५ मिलियन मेट्रिक टन (एमएमटी) असेल. जमिनीखाली खोदून भारताने सध्या ५.३३ एमएमटी इतका पेट्रोलियम साठा याआधीच तयार ठेवला आहे. त्यात विशाखापट्टणम (१.३३ एमएमटी), मंगळुरु (१.५ एमएमटी), पदूर (२.५ एमएमटी) यांचा समावेश आहे. हायड्रोकार्बन पदार्थ साठवण्यासाठी जमिनीखाली मानवनिर्मित गुहांचा वापर केला जातो. पेट्रोलियम पदार्थांचा तुटवडा निर्माण झाल्यावर त्यातील इंधन वापरले जाते. 

अर्थव्यवस्थेसाठी पी. व्ही. नरसिंह राव आणि डॉ. मनमोहन सिंह यांचे प्रयत्न१९९० च्या दशकामध्ये आखाती देशांतील युद्धांमुळे भारतीय अर्थव्यवस्था दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली. त्यामुळेच कच्च्या तेलाची आयात करण्यावर प्रचंड पैसा खर्च होऊ लागला व भारताची परदेशी चलनाची गंगाजळी झपाट्याने आटली. केवळ तीन आठवडेच पुरेल इतकेच परदेशी चलन भारताकडे शिल्लक राहिले. या परिस्थितीत भारताला सोने गहाण ठेवण्याचा पर्याय स्वीकारावा लागला. पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव व त्यांचे अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंह यांनी भारतीय अर्थव्यवस्थेची द्वारे मुक्त करुन खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा पर्याय निवडला. यामुळे भारतात मुक्त अर्थव्यवस्थेचे आणि गुंतवणुकीस पोषक वातावरण तयार झाले.

अटलबिहारी वाजपेयींचे धोरणअर्थव्यवस्थेला रुळावर आणण्याचे काम राव आणि सिंह या जोडीने केले असले, तरी पेट्रोलियम पदार्थांबाबत भारत अजूनही आखाती देश व ओपेक देशांवरच अवलंबून होता, आजही आहे. या देशांतील यादवी, राजकीय अस्थिरता, ओपेकचे निर्णय, अमेरिकेचे धोरण, त्यांची आपापसांतील युद्धे, डॉलरचा भाव याचा भारतातील पेट्रोलशी व त्याच्या दराशी थेट संबंध आहे. या परावलंबित्वावर काही काळापुरता तरी तोडगा निघावा, यासाठी नरसिंह राव यांच्यानंतर सत्तेत आलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रयत्न केले. भूगर्भात खोदकाम करुन इंधनाचा साठा करावा, हा निर्णय त्यांनी १९९८ साली घेतला.

यावर्षी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनेही त्यापुढे एक पाऊल जात इंधन साठा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. हा साठा करण्यासाठी मे महिन्यात संयुक्त अरब अमिरातीमधून मंगळुरू येथे इंधन साठा दाखल झाला आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCrude Oilखनिज तेलAtal Bihari Vajpayeeअटल बिहारी वाजपेयी