शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

सेंट्रल डेस्क...युजीसीच्या शिष्यवृत्तींमध्ये घसघशीत वाढ उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना दिलासा, अंमलबजावणी सुरु

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

वाशिम - विद्यापीठ अनुदान आयोगाच्यावतीने उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या सोळा प्रकारच्या शिष्यवृत्तींमध्ये मानव संसाधन विकास मंत्रालयाने वाढ केली आहे. डिसेंबरपासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

वाशिम - विद्यापीठ अनुदान आयोगाच्यावतीने उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या सोळा प्रकारच्या शिष्यवृत्तींमध्ये मानव संसाधन विकास मंत्रालयाने वाढ केली आहे. डिसेंबरपासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी सोळा प्रकारच्या शिष्यवृत्ती देण्यात येतात. यामध्ये निवृत्त विद्वान प्राध्यापक, बेरोजगार महिला, डॉ. राधाकृष्णन मानवता व सामाजिक शास्त्र आणि भाषा, स्वामी विवेकानंद समाजशास्त्र, आदी शिष्यवृत्तींचा समावेश आहे. मानव संसाधन विकास मंत्रालयाने या शिष्यवृत्तींमध्ये यंदापासून घसघशीत वाढ केली आहे. याचा फायदा उच्च शिक्षण घेणार्‍या गुणवंत तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना होणार आहे. निवृत्त झालेल्या विद्वान प्राध्यापकांचा शैक्षणीक क्षेत्रात उपयोग करुन घेण्याच्या उद्देशाने त्यांना देण्यात येणारी येणारी शिष्यवृत्ती दरमहा वीस हजारावरुन एकतीस हजार रुपये करण्यात आली आहेे. बेरोजगार महिलांची शिष्यवृत्ती २५ हजार रूपयांवरून ३८,८०० रूपये करण्यात आली आहे. डॉ. राधाकृष्णन मानवता व सामाजिक शास्त्र आणि भाषा या विषयांसाठी देण्यात येणारी २५ हजार रूपयांची शिष्यवृत्ती आता ३८ हजार ८०० रूपये करण्यात आली आहे. स्वामी विवेकानंद एकुलत्या मुलीसाठी सजामशास्त्र विषयासाठी देण्यात येणारी ८ हजार रूपयांची शिष्यवृत्ती १२ हजार ४०० रुपये, विज्ञान मानवता, सामाज शास्त्र शिष्यवृत्ती १६ हजार रूपयांवरून २५ हजार रुपये, परदेशी विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी १२ हजार रूपयांची शिष्यवृत्ती १८ हजार ६०० रूपये, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर व्यावसायीक शिक्षणासाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती पाच हजार रूपयांवरून सात हजार ८०० रुपये, गेट, जीपॅट पात्र विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान, अभियांत्रीकी आणि औषध निर्माण शाखेच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी देण्यात येणारी ८ हजार रूपयांची शिष्यवृत्ती आता १२ हजार ४०० रुपये करण्यात आली आहे. इंदिरा गांधी शिष्यवृत्ती मध्येही ११०० रूपयांची वाढ करण्यात आली आहे. पूर्वी ही शिष्यवृत्ती दरमहा दोन हजार रूपये होती. आता तीन हजार शंभर रूपये करण्यात आली आहे. वाढीव शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी डिसेंबर, महिन्यापासून सुरू झाली असुन राज्यातील सर्व विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे.
।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।