शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठांच्या सेवेसाठी केंद्राचे नवे धोरण!

By admin | Updated: August 30, 2016 04:42 IST

भारतात ६0 हून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना वार्धक्यात अधिक सुरक्षित व सन्मानजनक जीवन जगता यावे, यासाठी केंद्र सरकार लवकरच खास नवे धोरण जाहीर करणार आहे.

सुरेश भटेवरा,  नवी दिल्ली भारतात ६0 हून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना वार्धक्यात अधिक सुरक्षित व सन्मानजनक जीवन जगता यावे, यासाठी केंद्र सरकार लवकरच खास नवे धोरण जाहीर करणार आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी भारतीय दंड विधान तसेच पालक व नागरीक कल्याण व पोटगीचा कायदा यांत आवश्यक दुरुस्त्या करून हे कायदे अधिक कठोर करण्याचा सरकारचा इरादा आहेच, शिवाय दारिद्र्यरेषेखालील तसेच अन्य ज्येष्ठांनाही आजारपणात चांगली आरोग्य सेवा, अपंगत्वावर मात करणारी उपकरणे, आरोग्य विमा आदी सुविधा पुरवण्याचा संकल्पही या धोरणात आहे. ज्येष्ठ नागरिकांबाबत केंद्र सरकारचे नवे राष्ट्रीय धोरण १९१९ च्या नॅशनल पॉलिसी आॅफ ओल्डर पर्सन्स (नोपो) धोरणाची जागा घेणार आहे. ते जाहीर करण्यापूर्वी नव्या ज्येष्ठ नागरिकांच्या राष्ट्रीय परिषदेची बैठक ३0 आॅगस्ट रोजी होणार आहे. या बैठकीत सरकारच्या नव्या धोरणाची सखोल चिकि त्सा व पुनर्विलोकन करण्यात येईल आणि त्यानंतर या धोरणाला अंतिम स्वरूप दिले जाईल, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.भारतीय संस्कृतीतली एकत्र कुटुंब पध्दती संपुष्टात आल्यापासून देशात ज्येष्ठांना विविध अत्याचारांना व अपमानांना सामोरे जावे लागत आहे. वाढत्या महागाईत चौकोनी कुटुंबांचे जीवनमान बदलले आहे. वाढत्या महागाईत स्वत:च्या गरजा भागवताना अनेकांना वृद्ध मातापित्यांची काळजीही ओझे वाटते. गगनचुंबी इमारतीतील घरांत वृध्दांचे आयुष्य अडगळीसारख़ झाले आहे. केंद्र सरकारने या गोष्टींची दखल घेत नवे धोरण जाहीर करण्याचे ठरवले आहे.नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरोच्या २0१४ सालच्या आकडेवारीनुसार दरवर्षी १ हजारांहून अधिक वृद्धांची हत्या होते.अनेक ज्येष्ठांची फसवणूक केली जाते. त्यांंच्या संपत्तीसह अन्य जंगम मालमत्तेची चोरी, मिळकतीवर दरोडा घालण्याचे प्रकार घडतात. हेल्पेज इंडिया या ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या अहवालानुसार देशातील १0 कोटींपैकी ५0 टक्के ज्येष्ठांना वार्धक्यात स्वकियांंकडून मानसिक व शारिरीक छळाला सामोरे जावे लागते.