शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

एक्स्प्रेसवेवरील वाहनांचा वेग 130-140 पर्यंत वाढवण्याचा केंद्राचा विचार

By admin | Updated: March 12, 2016 17:09 IST

देशभरातील एक्स्प्रेसवेवरील वाहनांचा सरासरी वेग ताशी 130-140 किलोमीटर वाढवण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली आहे

ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. १२ - देशभरातील एक्स्प्रेसवेवरील वाहनांचा सरासरी वेग ताशी 130-140 किलोमीटर वाढवण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली आहे. सध्या एक्स्प्रेसवेवरील वाहनांचा सरासरी वेग ताशी 100 किलोमीटर आहे. देशभरात नव्याने मोठ्या प्रमाणात एक्स्प्रेसवे बांधण्यात येत असल्याने हा नियम बदलण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे. 
 
याच आठवड्यात गुडगावमध्ये पार पडलेल्या गुंतवणुकदारांच्या परिषदेत नितीन गडकरी यांनी पादचा-यांना आणि धीम्या गतीच्या वाहनांना परवानगी नसलेल्या रस्त्यांवर भरधाव वेगात गाड्या चालवण्यासंबंधी बोलत हा नियम बदलण्याचे संकेत दिले होते. 
 
यासाठी आम्ही वेगळा नियम आणणार आहोत. या रस्त्यांवर कमीत कमी एंट्री आणि एक्झिट पॉइंट असतील. शहरातील काही भागात आणि ठराविक ठिकाणच्या वाहनांच्या वेगाची पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने नोंद केली आहे. निर्देशन देऊन स्पीड लिमिटवर वचक बसवण्याचा त्यांना अधिकार असेल अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिली आहे. 
 
जगभरात सध्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्याची मागणी होत आहे. जेणकरुन अपघातांवर नियंत्रण आणण्यात येईल. वाहनांमध्ये स्पीडोमीटर लावण्यावरुनदेखील चर्चा सुरु आहे. संपुर्ण वाहतूक व्यवस्थेला प्रगत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. परमीट राज संपवणे हा यामागचा उद्धेश आहे. आम्ही राज्यातील अनेक महामार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करत आहोत जेणेकरुन केंद्राची गुंतवणुक वापरुन त्यांचा विस्तार करता येईल. त्यामुळे वाहनांची गती आणि सुरक्षादेखील वाढवता येईल असं मत गडकरी यांनी नोंदवलं आहे.