शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
6
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
7
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
8
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
9
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
10
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
11
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
12
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
13
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
14
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
15
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
16
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
17
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
18
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
19
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
20
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...

एक्स्प्रेसवेवरील वाहनांचा वेग 130-140 पर्यंत वाढवण्याचा केंद्राचा विचार

By admin | Updated: March 12, 2016 17:09 IST

देशभरातील एक्स्प्रेसवेवरील वाहनांचा सरासरी वेग ताशी 130-140 किलोमीटर वाढवण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली आहे

ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. १२ - देशभरातील एक्स्प्रेसवेवरील वाहनांचा सरासरी वेग ताशी 130-140 किलोमीटर वाढवण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली आहे. सध्या एक्स्प्रेसवेवरील वाहनांचा सरासरी वेग ताशी 100 किलोमीटर आहे. देशभरात नव्याने मोठ्या प्रमाणात एक्स्प्रेसवे बांधण्यात येत असल्याने हा नियम बदलण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे. 
 
याच आठवड्यात गुडगावमध्ये पार पडलेल्या गुंतवणुकदारांच्या परिषदेत नितीन गडकरी यांनी पादचा-यांना आणि धीम्या गतीच्या वाहनांना परवानगी नसलेल्या रस्त्यांवर भरधाव वेगात गाड्या चालवण्यासंबंधी बोलत हा नियम बदलण्याचे संकेत दिले होते. 
 
यासाठी आम्ही वेगळा नियम आणणार आहोत. या रस्त्यांवर कमीत कमी एंट्री आणि एक्झिट पॉइंट असतील. शहरातील काही भागात आणि ठराविक ठिकाणच्या वाहनांच्या वेगाची पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने नोंद केली आहे. निर्देशन देऊन स्पीड लिमिटवर वचक बसवण्याचा त्यांना अधिकार असेल अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिली आहे. 
 
जगभरात सध्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्याची मागणी होत आहे. जेणकरुन अपघातांवर नियंत्रण आणण्यात येईल. वाहनांमध्ये स्पीडोमीटर लावण्यावरुनदेखील चर्चा सुरु आहे. संपुर्ण वाहतूक व्यवस्थेला प्रगत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. परमीट राज संपवणे हा यामागचा उद्धेश आहे. आम्ही राज्यातील अनेक महामार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करत आहोत जेणेकरुन केंद्राची गुंतवणुक वापरुन त्यांचा विस्तार करता येईल. त्यामुळे वाहनांची गती आणि सुरक्षादेखील वाढवता येईल असं मत गडकरी यांनी नोंदवलं आहे.