शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

'सबका साथ'साठी केंद्र सरकार सोनिया गांधींच्या दारी

By admin | Updated: February 22, 2015 16:02 IST

अर्थसंकल्पीय अधिवेशन निर्विघ्न पार पडावे यासाठी मोदी सरकारने नरमाईची भूमिका घेतली आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. २२ - अर्थसंकल्पीय अधिवेशन निर्विघ्न पार पडावे यासाठी मोदी सरकारने नरमाईची भूमिका घेतली आहे. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी रविवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करत अधिवेशनात विरोधी पक्षांनी  सहकार्य करावे अशी विनंती केली. तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडून देशभरातील जनतेला मोठ्या अपेक्षा असतात. हे अधिवेशन सुरळीत पार पडावे ही सर्व पक्षांची सामूहिक जबाबदारी असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वच पक्षांकडून सहकार्य मिळेल अशी आशा व्यक्त केली. 
सोमवारपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. संसदेच्या गेल्या अधिवेशनात विरोधकांनी राज्यसभेत सरकारची चांगलीच कोंडी केली. लोकसभेत भाजपाला बहुमत असले तरी राज्यसभेत भाजपाकडे बहुमत नाही. गेल्या अधिवेशनात मोदी सरकारचे अनेक महत्त्वाकांक्षी विधेयक लोकसभेत मंजूर झाले पण राज्यसभेत विरोधकांनी अडवून धरले. अखेर अध्यादेश जारी करत मोदी सरकारने या समस्येवर तात्पुरता तोडगा काढला. 
अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेसोबतच राज्यसभेतही विरोधकांचे सहकार्य मिळावे यासाठी मोदी सरकारने जोरदार तयारी सुरु केली आहे. रविवारी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक पार पडली. यामध्ये मोदींनी सर्व पक्षीय नेत्यांना त्यांच्या जबाबदारीची आठवण करुन देत सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी एकत्र येऊन काम करुया असे आवाहन केले. तर संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी थेट काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. नायडूंनी भूमी अधिग्रहण विधेयकासह अनेक महत्त्वाचे विधेयक लोकसभा व राज्यसभेत मंजूर करण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती सोनिया गांधी यांना केली. या अधिवेशनाला यशस्वी करण्यासाठी केंद्र सरकार विरोधकांनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याचे नायडूंनी सांगितले.