शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

पशुधन खरेदी-विक्रीवर केंद्राचे निर्बंध

By admin | Updated: May 28, 2017 04:07 IST

केंद्र सरकारने जनावरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने गुरांच्या बाजारात होण्याऱ्या विक्रीवर बंदी आणली असून, त्यानुसार गुरांची खरेदी करणाऱ्यांना आपण त्यांची कत्तल

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जनावरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने गुरांच्या बाजारात होण्याऱ्या विक्रीवर बंदी आणली असून, त्यानुसार गुरांची खरेदी करणाऱ्यांना आपण त्यांची कत्तल करणार नाही, असे प्रतिज्ञापत्रच द्यावे लागणार आहे. मात्र यामुळे भाकड गायी कोण विकत घेणार, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण होणार आहे, तर दुसरीकडे एक लाख कोटी रुपयांची उलाढाल असलेला देशातील मांस उत्पादन उद्योगच अडचणीत सापडणार आहे.या प्राण्यांची विक्री किंवा खरेदी करणाऱ्यांना आपण शेतकरी असल्याचे पुरावे व्यवहाराच्या वेळी सादर करावे लागतील. तसेच खरेदी व विक्री करणाऱ्यांना या जनावरांचा वापर कत्तलीसाठी करणार नाही, असे हमीपत्रही द्यावे लागेल. गुरांच्या कत्तली वा त्यांच्या मांसविक्रीवर बंदी यावी, या उद्देशाने हा नवा नियम करण्यात आलेला नाही, असे सरकार म्हणत आहे. पशुबाजार आणि तेथील व्यवहारांवर नियंत्रण यावे हा या नव्या नियमांमागील हेतू आहे, असे पर्यावरणमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले. बकरा आणि मेंढ्या यांचा यात समावेश करण्यात आलेला नाही. या प्राण्यांचा बळी देण्याची काही समाजांमध्ये प्रथा आहे.पशू व्यापाराऐवजी पशुधन वाढवणे, हा आमचा यामागील हेतू असल्याचे भाजपा नेत्यांनी सांगितले. - देशातील ईशान्येकडील राज्यांसह अनेक राज्यांमध्ये गोवंश हत्याबंदी नाही. पण नव्या कायद्यामुळे त्या राज्यांमध्येही जनावरांच्या खरेदी-विक्रीवर निर्बंध येणार आहेत. केरळ सरकारने केंद्राच्या या निर्णयाला विरोध केला असून, तिथे सत्ताधारी डावे पक्ष आणि विरोधात असलेला काँग्रेस या मुद्द्यावर एकत्र आले आहेत. हा निर्णय अयोग्य असल्याचे केरळ सरकारने म्हटले आहे.- केंद्रीय पर्यावरण विभागाने गायी-म्हशी, बैल, कालवड, सांड, बछडे, उंट या प्राण्यांना कत्तलींसाठी गुरांच्या बाजारात विकता येणार नाही, असा आदेश काढला असून, तो सध्या तीन महिन्यांसाठी आहे. मात्र त्याचा फटका गरीब शेतकऱ्यांना व कत्तलखान्यांना बसणार आहे. गेल्या आठवड्यात याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली.