शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र झेंड्याची कर्नाटकची मागणी केंद्राने फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 09:58 IST

स्वतंत्र झेंड्याची कर्नाटकचे मुख्यमंत्री एस. सिद्दारमय्या यांची मागणी केंद्र सरकारनं फेटाळून लावली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि, 19- स्वतंत्र झेंड्याची कर्नाटकचे मुख्यमंत्री एस. सिद्दारमय्या यांची मागणी केंद्र सरकारनं फेटाळून लावली आहे. राज्यघटनेत राज्यांच्या स्वतंत्र झेंड्याची कुठलीही तरतूद नाही, असं म्हणत केंद्र सरकारनं ही मागणी फेटाळून लावली. राज्यघटनेतील ‘एक देश, एक ध्वज’ या सिद्धांताच्या आधारावर तिरंगा हाच संपूर्ण देशाचा ध्वज आहे, असंही केंद्रीय गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
आपला एकच देश आहे आणि एकच ध्वज आहे, असं गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. राज्यांना स्वतंत्र ध्वज देण्याची परवानगी देणारी अशी कोणतीही कायदेशीर तरतूद नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे. कर्नाटक राज्याचा एक ध्वज आहे, जो जनतेचं प्रतिनिधीत्व करतो, पण सरकारचं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 
आणखी वाचा
 

पाकिस्तानच्या मोर्टर हल्ल्यात सापडलेल्या 217 विद्यार्थ्यांची केली सुटका

RJ मलिष्काच्या घरात डेंग्यूच्या अळ्या, मुंबई मनपानं बजावली नोटीस

गोव्यात बीफची कमतरता भासू देणार नाही - मनोहर पर्रीकर

कर्नाटकमधल्या कॉंग्रेसप्रणीत सरकारने वेगळा झेंड्याची मागणी केली आहे. यासाठी राज्य सरकारने 9 सदस्यांची ध्वज समिती स्थापन केली आहे. यापुर्वी 2012 मध्येही कर्नाटकमधून स्वतंत्र झेंड्याची मागणी करण्यात आली. पण केंद्रातील तत्कालिन सरकारने ही मागणी फेटाळली होती. असं केल्यास देशातील एकता आणि अखंडताचा भंग ठरेल असं म्हणत ही मागणी वाजपेयींनी फेटाळली होती. त्यानंतर आता पुन्हा या मागणीने डोकं वर काढलं आहे. 

 
कर्नाटकमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमधील राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी झेंड्याचा आराखडा बनवण्यासाठी एक 9 सदस्यांची समितीही स्थापन करण्याता आली आहे. या समितीचे अध्यक्षपद कर्नाटकच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रमुखांकडे सोपवण्यात आले आहे. आता ही समिती झेंड्याचा आराखडा बनवून राज्य सरकारला सोपवेल. वेगळा झेंडा बनवण्याची कर्नाटक सरकारचा घाट यशस्वी झाल्यास जम्मू काश्मीरनंतर स्वतंत्र ध्वज असणारे कर्नाटक हे देशातील दुसरे राज्य ठरू शकते. असे झाल्यास अन्य राज्यांकडूनही स्वतंत्र ध्वजाची मागणी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 
 
मात्र कर्नाटक सरकारच्या या योजनेस भाजपाकडून विरोध होत आहे. राज्याच्या दुसरा ध्वज बनवल्यास तिरंग्याचे महत्त्व कमी होईल. तसेच त्यातून अखंडतेच्या भावनेला धक्का लागेल, असंही काही जणांचं मत आहे. तर केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनीही या मागणीस विरोध केला आहे.