शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

जातनिहाय जनगणना १५ मार्चपूर्वी पूर्ण करा केंद्राचा आदेश : राज्यांना केंद्रीय मदत रोखण्याचा इशारा

By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST

नवी दिल्ली : जनगणना पूर्ण करण्यात होत असलेल्या अकारण विलंबाची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने राज्यांना १५ मार्चपूर्वी जातनिहाय जनगणना पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे. उपरोक्त मुदतीत ही प्रक्रिया पार न पाडल्यास ग्रामीण भागात घरे बांधण्यासाठी तसेच कल्याण निवृत्ती योजनांना दिले जाणारे अर्थसाहाय्य थांबविण्याचा कडक इशाराही दिला आहे.

नवी दिल्ली : जनगणना पूर्ण करण्यात होत असलेल्या अकारण विलंबाची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने राज्यांना १५ मार्चपूर्वी जातनिहाय जनगणना पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे. उपरोक्त मुदतीत ही प्रक्रिया पार न पाडल्यास ग्रामीण भागात घरे बांधण्यासाठी तसेच कल्याण निवृत्ती योजनांना दिले जाणारे अर्थसाहाय्य थांबविण्याचा कडक इशाराही दिला आहे.
पुढील महिन्यात सामाजिक-आर्थिक आणि जातनिहाय जनगणना (एसईसीसी)पूर्ण करण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी सवार्ेच्च प्राधान्य द्यावे, असे ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे. २०१५-१६ पासून पुढे एसईसीसी डाटा इंदिरा आवास योजनेच्या (आयएवाय)लाभार्थ्यांच्या निवडीसाठी उपयोगात आणला जाणार आहे. ज्या राज्यांना सदर डाटाच्या आधारे लाभार्थीर्ंची निवड करणे शक्य होणार नाही, अशांना राष्ट्रीय सामाजिक मदत कार्यक्रमांतर्गत (एनएसएपी)आर्थिक मदत दिली जाणार नाही, असे ग्रामीण विकास मंत्रालयाने म्हटले.
---------------------
अन्न सुरक्षा कायद्याच्या
अंमलबजावणीला विलंब
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची(एनएफएसए) अंमलबजावणी न होण्याचे मुख्य कारण अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी एसईसीसी प्रक्रिया(जातनिहाय जनगणना)पूर्ण न करणे हेच असल्याकडे पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज(पीयुसीएल)या स्वयंसेवी संघटनेने एका जनहित याचिकेद्वारे लक्ष वेधले होते. जून २०११पासून देशभरात दारोदार जाऊन जातनिहाय तसेच आर्थिक- सामाजिक घटकांचा समावेश करीत माहिती गोळा केली जात आहे. राज्यांनी ही प्रक्रिया पुढील महिन्यात पूर्ण न केल्यास इंदिरा आवास योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था निवृत्ती योजना, इंदिरा गांधी विधवा निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अंपगत्व निवृत्ती योजना, राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजना आणि अन्नपूर्णा या योजनांच्या लाभार्थ्यांना फटका बसेल. काही राज्यांनी जनगणनेच्या याद्याही तयार केल्या नसल्याने केंद्र सरकारने कठोर धोरण अवलंबल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.