शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

घटस्फोटाचं सेलिब्रेशन करत वाटली 50 किलो मिठाई

By admin | Updated: April 25, 2017 13:40 IST

राजकोटमधील एका व्यवसायिकासाठी आपल्या लग्नाचा शेवट म्हणजे एक आनंदाचा क्षण होता

ऑनलाइन लोकमत
राजकोट, दि. 25 - घटस्फोट म्हटलं की अनेकांवर दुखाचा डोंगर कोसळलेला असतो. मग अशावेळी दर्दभरी गाणी ऐकणे, एकट्याने रडत बसून आपलं दुख: हलकं करण्याचा प्रयत्न करणे अशा गोष्टी सुरु होतात. पण राजकोटमधील एका व्यवसायिकासाठी आपल्या लग्नाचा शेवट म्हणजे एक आनंदाचा क्षण होता. एवढंच कशाला आपला हा आनंद आपल्यापुरता मर्यादित न ठेवता महाशयांनी सगळ्या मित्र आणि नातेवाईकांमध्ये 50 किलो मिठाई वाटली. 
 
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार 26 वर्षीय रिंकेश आपल्या मित्र आणि नातेवाईकांना काजू बर्फीचे बॉक्स पाठवत आहेत. त्यावर त्यांनी घटस्फोटाचं सेलिब्रेशन असं लिहिलंदेखील आहे. मिठाईंच्या या बॉक्समध्ये महिला आपल्या हक्कांचा कसा गैरवापर करत आहेत यासंबंधी एक चिठ्ठीदेखील लिहिण्यात आली आहे. 
 
15 एप्रिल रोजी रिंकेशचा घटस्फोट झाला. तेव्हापासून आपला फोन सतत वाजत असून शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याचं त्याने सांगितलं आहे. "अनेक पुरुषांनी फोन करुन तुमचा आनंद समजू शकतो अशी प्रतिक्रिया दिली. अनेकांना महिलांच्या बाजूने कायदा झुकला असताना कशाप्रकारे प्रक्रियेला सामोरे गेलात हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. अनेक महिलांनीही मला फोन करुन त्यांच्या सुनेसोबत घडलेले भयंकर किस्से सांगितले", असं रिंकेश सांगतो. 
 
विशेष म्हणजे हे सर्व जाहीर करत असताना त्याने कुठेही आपल्या पत्नीच्या नावाचा उल्लेख केला नाही. "आपल्या कुटुंबापासून वेगळं राहण्याची इच्छा तिने व्यक्त केली तेव्हाच हे प्रकरण सुरु झालं. मी घटस्फोटासाठी अर्ज केला तेव्हाच मला महिलांच्या बाजूने असलेल्या कायद्याची माहिती मिळाली. घटस्फोट घेताना तिने मागितलेली रक्कम माझ्या आवाक्याबाहेर होती, त्यामुळे यासाठी दोन वर्ष लागली", अशी माहिती रिंकेशने दिली आहे.
 
ही आपल्या आयुष्यातील एक पायरी असल्याचं म्हणत रिंकेशने पुन्हा लग्न करण्याची तयारी दर्शवली आहे.