शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

घटस्फोटाचं सेलिब्रेशन करत वाटली 50 किलो मिठाई

By admin | Updated: April 25, 2017 13:40 IST

राजकोटमधील एका व्यवसायिकासाठी आपल्या लग्नाचा शेवट म्हणजे एक आनंदाचा क्षण होता

ऑनलाइन लोकमत
राजकोट, दि. 25 - घटस्फोट म्हटलं की अनेकांवर दुखाचा डोंगर कोसळलेला असतो. मग अशावेळी दर्दभरी गाणी ऐकणे, एकट्याने रडत बसून आपलं दुख: हलकं करण्याचा प्रयत्न करणे अशा गोष्टी सुरु होतात. पण राजकोटमधील एका व्यवसायिकासाठी आपल्या लग्नाचा शेवट म्हणजे एक आनंदाचा क्षण होता. एवढंच कशाला आपला हा आनंद आपल्यापुरता मर्यादित न ठेवता महाशयांनी सगळ्या मित्र आणि नातेवाईकांमध्ये 50 किलो मिठाई वाटली. 
 
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार 26 वर्षीय रिंकेश आपल्या मित्र आणि नातेवाईकांना काजू बर्फीचे बॉक्स पाठवत आहेत. त्यावर त्यांनी घटस्फोटाचं सेलिब्रेशन असं लिहिलंदेखील आहे. मिठाईंच्या या बॉक्समध्ये महिला आपल्या हक्कांचा कसा गैरवापर करत आहेत यासंबंधी एक चिठ्ठीदेखील लिहिण्यात आली आहे. 
 
15 एप्रिल रोजी रिंकेशचा घटस्फोट झाला. तेव्हापासून आपला फोन सतत वाजत असून शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याचं त्याने सांगितलं आहे. "अनेक पुरुषांनी फोन करुन तुमचा आनंद समजू शकतो अशी प्रतिक्रिया दिली. अनेकांना महिलांच्या बाजूने कायदा झुकला असताना कशाप्रकारे प्रक्रियेला सामोरे गेलात हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. अनेक महिलांनीही मला फोन करुन त्यांच्या सुनेसोबत घडलेले भयंकर किस्से सांगितले", असं रिंकेश सांगतो. 
 
विशेष म्हणजे हे सर्व जाहीर करत असताना त्याने कुठेही आपल्या पत्नीच्या नावाचा उल्लेख केला नाही. "आपल्या कुटुंबापासून वेगळं राहण्याची इच्छा तिने व्यक्त केली तेव्हाच हे प्रकरण सुरु झालं. मी घटस्फोटासाठी अर्ज केला तेव्हाच मला महिलांच्या बाजूने असलेल्या कायद्याची माहिती मिळाली. घटस्फोट घेताना तिने मागितलेली रक्कम माझ्या आवाक्याबाहेर होती, त्यामुळे यासाठी दोन वर्ष लागली", अशी माहिती रिंकेशने दिली आहे.
 
ही आपल्या आयुष्यातील एक पायरी असल्याचं म्हणत रिंकेशने पुन्हा लग्न करण्याची तयारी दर्शवली आहे.