शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

घटस्फोटाचं सेलिब्रेशन करत वाटली 50 किलो मिठाई

By admin | Updated: April 25, 2017 13:40 IST

राजकोटमधील एका व्यवसायिकासाठी आपल्या लग्नाचा शेवट म्हणजे एक आनंदाचा क्षण होता

ऑनलाइन लोकमत
राजकोट, दि. 25 - घटस्फोट म्हटलं की अनेकांवर दुखाचा डोंगर कोसळलेला असतो. मग अशावेळी दर्दभरी गाणी ऐकणे, एकट्याने रडत बसून आपलं दुख: हलकं करण्याचा प्रयत्न करणे अशा गोष्टी सुरु होतात. पण राजकोटमधील एका व्यवसायिकासाठी आपल्या लग्नाचा शेवट म्हणजे एक आनंदाचा क्षण होता. एवढंच कशाला आपला हा आनंद आपल्यापुरता मर्यादित न ठेवता महाशयांनी सगळ्या मित्र आणि नातेवाईकांमध्ये 50 किलो मिठाई वाटली. 
 
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार 26 वर्षीय रिंकेश आपल्या मित्र आणि नातेवाईकांना काजू बर्फीचे बॉक्स पाठवत आहेत. त्यावर त्यांनी घटस्फोटाचं सेलिब्रेशन असं लिहिलंदेखील आहे. मिठाईंच्या या बॉक्समध्ये महिला आपल्या हक्कांचा कसा गैरवापर करत आहेत यासंबंधी एक चिठ्ठीदेखील लिहिण्यात आली आहे. 
 
15 एप्रिल रोजी रिंकेशचा घटस्फोट झाला. तेव्हापासून आपला फोन सतत वाजत असून शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याचं त्याने सांगितलं आहे. "अनेक पुरुषांनी फोन करुन तुमचा आनंद समजू शकतो अशी प्रतिक्रिया दिली. अनेकांना महिलांच्या बाजूने कायदा झुकला असताना कशाप्रकारे प्रक्रियेला सामोरे गेलात हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. अनेक महिलांनीही मला फोन करुन त्यांच्या सुनेसोबत घडलेले भयंकर किस्से सांगितले", असं रिंकेश सांगतो. 
 
विशेष म्हणजे हे सर्व जाहीर करत असताना त्याने कुठेही आपल्या पत्नीच्या नावाचा उल्लेख केला नाही. "आपल्या कुटुंबापासून वेगळं राहण्याची इच्छा तिने व्यक्त केली तेव्हाच हे प्रकरण सुरु झालं. मी घटस्फोटासाठी अर्ज केला तेव्हाच मला महिलांच्या बाजूने असलेल्या कायद्याची माहिती मिळाली. घटस्फोट घेताना तिने मागितलेली रक्कम माझ्या आवाक्याबाहेर होती, त्यामुळे यासाठी दोन वर्ष लागली", अशी माहिती रिंकेशने दिली आहे.
 
ही आपल्या आयुष्यातील एक पायरी असल्याचं म्हणत रिंकेशने पुन्हा लग्न करण्याची तयारी दर्शवली आहे.