शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

घटस्फोटाचं सेलिब्रेशन करत वाटली 50 किलो मिठाई

By admin | Updated: April 25, 2017 13:40 IST

राजकोटमधील एका व्यवसायिकासाठी आपल्या लग्नाचा शेवट म्हणजे एक आनंदाचा क्षण होता

ऑनलाइन लोकमत
राजकोट, दि. 25 - घटस्फोट म्हटलं की अनेकांवर दुखाचा डोंगर कोसळलेला असतो. मग अशावेळी दर्दभरी गाणी ऐकणे, एकट्याने रडत बसून आपलं दुख: हलकं करण्याचा प्रयत्न करणे अशा गोष्टी सुरु होतात. पण राजकोटमधील एका व्यवसायिकासाठी आपल्या लग्नाचा शेवट म्हणजे एक आनंदाचा क्षण होता. एवढंच कशाला आपला हा आनंद आपल्यापुरता मर्यादित न ठेवता महाशयांनी सगळ्या मित्र आणि नातेवाईकांमध्ये 50 किलो मिठाई वाटली. 
 
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार 26 वर्षीय रिंकेश आपल्या मित्र आणि नातेवाईकांना काजू बर्फीचे बॉक्स पाठवत आहेत. त्यावर त्यांनी घटस्फोटाचं सेलिब्रेशन असं लिहिलंदेखील आहे. मिठाईंच्या या बॉक्समध्ये महिला आपल्या हक्कांचा कसा गैरवापर करत आहेत यासंबंधी एक चिठ्ठीदेखील लिहिण्यात आली आहे. 
 
15 एप्रिल रोजी रिंकेशचा घटस्फोट झाला. तेव्हापासून आपला फोन सतत वाजत असून शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याचं त्याने सांगितलं आहे. "अनेक पुरुषांनी फोन करुन तुमचा आनंद समजू शकतो अशी प्रतिक्रिया दिली. अनेकांना महिलांच्या बाजूने कायदा झुकला असताना कशाप्रकारे प्रक्रियेला सामोरे गेलात हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. अनेक महिलांनीही मला फोन करुन त्यांच्या सुनेसोबत घडलेले भयंकर किस्से सांगितले", असं रिंकेश सांगतो. 
 
विशेष म्हणजे हे सर्व जाहीर करत असताना त्याने कुठेही आपल्या पत्नीच्या नावाचा उल्लेख केला नाही. "आपल्या कुटुंबापासून वेगळं राहण्याची इच्छा तिने व्यक्त केली तेव्हाच हे प्रकरण सुरु झालं. मी घटस्फोटासाठी अर्ज केला तेव्हाच मला महिलांच्या बाजूने असलेल्या कायद्याची माहिती मिळाली. घटस्फोट घेताना तिने मागितलेली रक्कम माझ्या आवाक्याबाहेर होती, त्यामुळे यासाठी दोन वर्ष लागली", अशी माहिती रिंकेशने दिली आहे.
 
ही आपल्या आयुष्यातील एक पायरी असल्याचं म्हणत रिंकेशने पुन्हा लग्न करण्याची तयारी दर्शवली आहे.