शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: वडाळा, हिंदमाता, दादर टीटीसह मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले; वाहतूक मंदावली
2
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
3
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
4
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
5
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
6
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
7
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
8
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
9
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
10
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
11
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
12
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
13
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
14
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
15
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
16
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
17
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
18
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
19
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
20
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू

मणिपूरमधील बनावट चकमकींची सीबीआय चौकशी

By admin | Updated: July 15, 2017 00:27 IST

आसाम रायफल्स आणि पोलिसांकडून झालेल्या कथित बनावट चकमकींची चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय गुप्तचर खात्याला (सीबीआय) शुक्रवारी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : बंडखोरीने त्रस्त असलेल्या मणिपूर राज्यात लष्कर, आसाम रायफल्स आणि पोलिसांकडून झालेल्या कथित बनावट चकमकींची चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय गुप्तचर खात्याला (सीबीआय) शुक्रवारी दिले. न्यायमुर्ती एम. बी. लोकूर, यू. यू. ललित यांच्या खंडपीठाने सीबीआयच्या संचालकांना कथित हत्याकांडाच्या चौकशीसाठी अधिकाऱ्यांच्या तुकडीची नियुक्ती करण्यास सांगितले आहे. मणिपूरमध्ये वर्ष २००० ते २०१२ दरम्यान सुरक्षा दले आणि पोलिसांकडून झालेल्या बनावट चकमकींत १,५२८ जणांच्या झालेल्या कथित हत्यांची चौकशी करून नुकसान भरपाई मागणाऱ्या सार्वजनिक हिताच्या याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने हा आदेश दिला. जम्मू-काश्मीर, मणिपूरसारखी जी राज्ये बंडखोरीला तोंड देत आहेत तेथे अतिरेक्यांविरोधात कारवाया करताना आमच्याविरोधात गुन्हे दाखल केले जाऊ शकत नाहीत, असे लष्कराने २० एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते.त्या भागांमध्ये आमच्याविरोधात स्थानिक पातळीवर पूर्वग्रहदूषित भूमिकेतून न्यायालयीन चौकशा करण्यात आल्या व त्यामुळे आमची प्रतिमा मलीन झाली असा आरोपही लष्कराने केला होता. प्रत्येक लष्करी कारवाईत लष्करावर अविश्वास दाखवला जाऊ शकत नाही. प्रत्येक न्यायालयीन चौकशी लष्कराविरोधात असू शकत नाही. मणिपूरमधील कथित बनावट चकमकींची प्रकरणे ही हत्याकांडांची नसून काहीशी अतिरेकी कारवायांची आहेत, असे केंद्र सरकारने न्यायालयाला सांगितले होते. >न्यायालयीन चौकशी पूर्वग्रह दूषित?कथित बनावट चकमकींच्या आरोपांची झालेली न्यायालयीन चौकशी पूर्वग्रहदूषित होती व स्थानिक घटक कारण होते, असे लष्कराने न्यायालयाला सांगितले होते. कथित हत्यांची न्यायालयीन चौकशी स्थानिक जिल्हा न्यायाधीशांनी केली व चौकशीत स्थानिक घटक सशस्त्र दलांच्याविरोधात गेले, असाही आरोप लष्कराने केला होता.