शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कावेरी पाणी वाटपामुळे 'तिच्या' लग्नावर संकट

By admin | Updated: September 13, 2016 13:39 IST

अपवादात्मक परिस्थितीत एखादी कौटुंबिक दुर्घटना किंवा कायदा-सुव्यवस्थेमुळे विवाह सोहळयाच्या उत्साहावर विरजण पडते. बंगळुरुमध्ये रहाणा-या प्रेमालाही सध्या अशाच अनुभवातून जावे लागत आहे.

ऑनलाइन लोकमत 

बंगळुरु, दि. १३ - विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो पण अपवादात्मक परिस्थितीत एखादी कौटुंबिक दुर्घटना किंवा कायदा-सुव्यवस्थेमुळे विवाह सोहळयाच्या उत्साहावर विरजण पडते. बंगळुरुमध्ये रहाणा-या प्रेमालाही सध्या अशाच अनुभवातून जावे लागत आहे. 
 
कावेरी पाणी वाटपावरुन कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारामुळे प्रेमाला मंगळवारी बंगळुरुमध्ये वाहनाच्या शोधात अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागली. प्रेमाचा तामिळनाडूतील युवकाशी बुधवारी विवाह होणार आहे. 
 
नववधूच्या वेशात नटलेली प्रेमा आणि तिचे कुटुंबिय विवाहस्थळी पोहोचण्यासाठी वाहनाच्या शोधात फिरत होते. बंगळुरुमध्ये सोमवारी अनेक बसेस पेटवून देण्यात आल्या. त्यामुळे बससेवा पूर्णपणे बंद असून, कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यात परस्परांच्या वाहनांना तूर्तास प्रवेशबंदी करण्यात आली आहे. 
 
प्रेमाचे विवाहस्थळ तामिळनाडूमध्ये आहे. त्यामुळे प्रेमा आणि तिच्या कुटुंबाला कावेरी पाणी वाटप प्रश्नाचा सर्वाधिक फटका बसला आहे. आमचा आनंद हरवला असून, आम्ही हा दिवस कधी विसरु शकत नाही अशी प्रतिक्रिया प्रेमाच्या कुटुंबियांनी दिली. आम्ही ६०० जणांना लग्नाचे निमंत्रण दिले होते पण आता लग्नाला फक्त २० जणच उपस्थित रहाणार आहेत  असे निराश झालेल्या प्रेमाने सांगितले.