शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
2
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
5
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
6
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
7
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
8
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
9
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
10
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
11
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
12
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
13
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
14
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
15
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
16
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
17
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
18
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
19
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
20
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट

कावेरीचे पाणी पेटले : बंगळुरूमध्ये गोळीबारात एक ठार

By admin | Updated: September 13, 2016 06:16 IST

कावेरी नदीच्या पाणीवाटपावरून कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात हिंसाचार सुरू झाला असून, अनेक ठिकाणी जाळपोळीच्या व दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत.

बंगळुरू/चेन्नई : कावेरी नदीच्या पाणीवाटपावरून कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात हिंसाचार सुरू झाला असून, अनेक ठिकाणी जाळपोळीच्या व दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. दोन्ही राज्यांत ट्रक्स आणि हॉटेल्सवर हल्ले सुरू असून, बंगळुरूमध्ये आणि कर्नाटकच्या काही भागात हिंसाचाराचे प्रकार घडले. त्यामुळे या दोन्ही राज्यांच्या राजधानीमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बंगळुरूमध्ये आगारात उभ्या असलेल्या २0 बसना आगी लावल्यानंतर जमावबंदी लागू करण्यात आली. बंगळुरूच्या पिनया भागात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक जण ठार तर एक जण जखमी झाला असून, परिस्थिती चिघळत चालल्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे.

चेन्नईतील कन्नड मालकाच्या हॉटेलवर आणि रामेश्वरममध्ये कर्नाटकच्या सात पर्यटक वाहनांवर हल्ले करण्यात आले. इरोड आणि पुडुच्चेरीमध्ये निदर्शकांनी कर्नाटकच्या बँक शाखांत गोंधळ घातला. हॉटेलवरील हल्ल्यासंदर्भात चार तर पुडुच्चेरीत २५ जणांना ताब्यात घेण्यात आले. तामिळनाडूमध्ये कर्नाटकच्या सरकारच्या काही कार्यालयांवर आणि व्यापारी प्रतिष्ठानांवर हल्ले झाले. कन्नड अभिनेत्याविरुद्ध सोशल मीडियात २२ वर्षांच्या तमिळ तरुणाने कथित अवमानकारक भाष्य केल्याबद्दल त्याला बंगळुरूमध्ये मारहाण झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे हल्ले झाले. ते वृत्त येताच कर्नाटकातील बंगळुरू, मंड्या, मैसूर, चित्रदुर्ग, धारवाड जिल्ह्यांत तामिळनाडूचे रजिस्ट्रेशन असलेल्या ट्रक्सवर दगडफेक करण्यात आली आणि काही ठिकाणी ते पेटवण्यात आले. १२ हजार क्युसेक्स पाणी सोडावे लागणारकर्नाटकने तामिळनाडूला २० सप्टेंबरपर्यंत रोज १५ हजार क्सुसेक्सऐवजी १२ हजार क्सुसेक्स पाणी सोडावे, अशी सुधारणा सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात केली. कर्नाटक व तामिळनाडूने कायदा व सुव्यवस्था कायम राहील याची काळजी घेण्यासही न्यायालयाने सांगितले. सुप्रीम कोर्टाने ५ सप्टेंबर रोजीचा आदेश स्थगित ठेवावा ही कर्नाटकची विनंतीही फेटाळताना आमच्या आदेशाचे पालन करा, असे स्पष्ट केले. कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा हा काही न्यायालयाच्या आदेशात बदल करण्याचा आधार होऊ शकत नाही, असे न्या. दीपक मिश्र आणि यु. यु. ललित यांच्या खंडपीठाने म्हटले.जयललितांना पत्रतामिळनाडूतील कानडी भाषिक लोकांना हिंसाचाराला तोंड द्यावे लागत असल्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना पत्र लिहून कानडी लोकांची सुरक्षितता व संरक्षण करण्याची विनंती केली. कर्नाटकातील तमिळ भाषिकांची योग्य ती काळजी घेतली जाईल, असेही म्हटले आहे.समितीची बैठककावेरी सुपरवायझरी समितीची बैठक केंद्रीय जलस्रोत सचिव शशी शेखर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी येथे झाली. २० सप्टेंबरनंतर पाणी सोडण्याचे प्रमाण ठरविले जाईल, असे या बैठकीत ठरवण्यात आले.