शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

महामार्गांवर आणणार कॅशलेस उपचार व्यवस्था

By admin | Updated: July 26, 2015 23:49 IST

देशात रस्ते अपघातांच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडक शहरे आणि महामार्गांवर रोखरहित

नवी दिल्ली : देशात रस्ते अपघातांच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडक शहरे आणि महामार्गांवर रोखरहित(कॅशलेस)उपचार व्यवस्था लागू करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमात त्यांनी लवकरच रस्ते वाहतूक-रस्ते सुरक्षा विधेयक आणणार असल्याची ग्वाही दिली. राष्ट्रीय रस्ते सुरक्षा धोरण निश्चित करतानाच राष्ट्रीय रस्ते सुरक्षा कृती योजना आणण्याचा विचारही त्यांनी बोलून दाखविला. संसदेत सध्या सुरू असलेला गोंधळ आणि राजकारणावर त्यांनी भाष्य टाळले. गुडगाव, जयपूर, बडोदापासून तर मुंबई, रांची, रणगाव, मौंडिया महामार्गावर अपघातातील जखमींसाठी ही रोखरहित उपचार व्यवस्था आणली जात आहे, असे ते म्हणाले.१५ मिनिटांच्या भाषणात त्यांनी चांगला पाऊस पाहता चांगले पीक होण्याची शक्यता व्यक्त करीत शेतकरी बांधवांना शुभेच्छा दिल्या. कारगिल विजय दिवसानिमित्त शहीद जवानांना आदरांजली अर्पण केली. त्यांनी स्वातंत्र्यदिनी काय बोलावे, याबाबत जनतेला सूचना मागितल्या. रक्षाबंधनानिमित्त शौचालयांची भेट देण्याबाबत घेण्यात आलेल्या पुढाकाराचा आणि इस्रोने ब्रिटनच्या पाच उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केल्याचा मुद्दाही उपस्थित केला. ईशान्येकडील राज्यांच्या मुद्यालाही त्यांनी हात घातला. ब्रदर नंबर वन! मध्य प्रदेशच्या हरदा जिल्ह्यातील सरकारी अधिकाऱ्यांच्या चमूने ब्रदर नंबर वन (भाई नंबर वन) योजनेसाठी पुढाकार घेतला आहे. बहिणीला रक्षाबंधनाच्या दिवशी शौचालय भेट देणारा भाऊ सर्वोत्तम ठरतो. हे अधिकारी रक्षाबंधनाच्या पर्वावर हे काम करीत असून, त्यामुळे रक्षाबंधनाचा अर्थ कसा बदलला ते बघा. हरदा जिल्ह्याच्या सर्व सरकारी अधिकाऱ्यांच्या चमूला मी शुभेच्छा देतो. छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातील छोट्याशा केश्ला गावातील एकाही व्यक्तीला खुल्या जागेवर शौचाला जावे लागत नाही, असा उल्लेखही त्यांनी केला.(लोकमत न्यूज नेटवर्क)