शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

मुस्लीम लोकसंख्येच्या बाबतीत 2050 मध्ये भारत बनेल नंबर 1

By admin | Updated: April 6, 2017 12:29 IST

मुस्लीम लोकसंख्येच्या बाबतीत सध्या दुसऱ्या क्रमांकावर असलेला भारत 2050 मध्ये इंडोनेशियाला मागे टाकत पहिल्या स्थानावर असेल असे भाकित प्यू रिसर्च या संस्थेने केले आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - मुस्लीम लोकसंख्येच्या बाबतीत सध्या दुसऱ्या क्रमांकावर असलेला भारत 2050 मध्ये इंडोनेशियाला मागे टाकत पहिल्या स्थानावर असेल असे भाकित प्यू रिसर्च या संस्थेने केले आहे. जागतिक स्तरावर सध्या ख्रिश्चनांची संख्या सर्वाधिक असून मुस्लीम दुसऱ्या स्थानावर आहेत. मात्र, मुस्लीमांचा जननदर ख्रिश्चनांपेक्षा जास्त असून 2055 ते 2060 च्या सुमारास मुस्लीम लोकसंख्या ख्रिश्चनांबरोबर होईल असा अंदाजही प्यूने व्यक्त केला आहे. येत्या 20 वर्षांमध्ये ख्रिश्चनांच्या पोटी जन्माला येणाऱ्या मुलांपेक्षा मुस्लीमांच्या पोटी जन्माला येणाऱ्या मुलांची संख्याही जास्त असेल. प्यू रिसर्च सेंटर डेमॉग्राफीच्या अंदाजानुसार 2030 ते 2035 या कालावधीत जन्माला येणाऱ्या मुस्लीमांची संख्या 22.5 कोटी असेल तर याच कालावधीत जन्माला येणाऱ्या ख्रिश्चनांची संख्या 22.4 कोटी असेल. अर्थात, या कालावधीत एकूण ख्रिश्चनांची संख्या जरी जास्त राहणार असली तरी पुढील 20 ते 25 वर्षात मुस्लीम लोकसंख्या ख्रिश्चनांना मागे टाकेल असा अंदाज आहे. 2055 ते 2060 या कालावधीत मुस्लीमांच्या पोटी जन्माला येणाऱ्या मुलांची संख्या 23.2 कोटी असेल तर ख्रिश्चनांची संख्या 22.6 कोटी असेल. सध्या दिसत असलेल्या कलांवरून हे अंदाज बांधत असल्याचे प्यूने म्हटले आहे. उदाहरणार्थ, 2010 ते 2015 या कालावधीत जगात जन्माला आलेल्या मुलांमध्ये मुस्लीमांचा वाटा 31 टक्के आहे, तर जागतिक लोकसंख्येतील मुस्लीमांचा वाटा 24 टक्के आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त जननदर असल्यामुळे आणि ख्रिश्चनांमध्ये जननदर कमी असल्यामुळे दोघांमधला फरक हळूहळू कमी होईल आणि 2060 च्या सुमारास दोघांची संख्या समसमान असेल असा हा अंदाज आहे.
जागतिक स्तरावरील हा कल भारतामध्येही प्रतिबिंबीत होत आहे. सध्या मुस्लीम लोकसंख्येच्या बाबतीत इंडोनेशिया प्रथमस्थानी आहे, मात्र 2050 मध्ये भारत मुस्लीम लोकसंख्य़ेच्या बाबतीत इंडोनेशियाला मागे सारत प्रथमस्थानी येईल असे भाकित प्यूने केले आहे.