शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कुलभूषण जाधव प्रकरणी भारत अडून, पाकिस्तानसोबत सर्व चर्चा रद्द

By admin | Updated: April 15, 2017 08:30 IST

कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर भारत - पाकिस्तानमधील संबंध ताणले जात असून भारताने कठोर पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर भारत - पाकिस्तानमधील संबंध ताणले जात असून भारताने कठोर पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. भारताने पाकिस्तानसोबत सर्व द्विपक्षीय चर्चांवर तात्पुरती स्थगिती आणली आहे. 
 
(कुलभूषण जाधव यांची फाशी म्हणजे पाकचा पूर्वनियोजित हत्येचा कट - राजनाथ सिंह)
 
भारत आणि पाकिस्तानमध्ये 17 एप्रिल रोजी समुद्र सुरक्षेसंबंधी होणारी चर्चा रद्द करण्याचा निर्णय सरकारकडून शुक्रवारी घेण्यात आला. भारताने अधिकृतरित्या पाकिस्तानला रविवारी होणा-या प्रस्तावित चर्चेसाठी आम्ही तुमच्या पाकिस्तान समुद्र सुरक्षा एनज्सीच्या (पीएमएसए) प्रतिनिधीमंडळाच्या स्वागतासाठी तयार नसल्याचं कळवलं आहे. सर्व आंतरराष्ट्रीय कायद्यांना झुगारत पाकिस्तानकडून कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर भारतीय संरक्षण मंत्रालयाने पाकिस्तानसोबत चर्चा न करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
 
महत्वाचं म्हणजे गतवर्षी पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून पठाणकोट आणि उरीमध्ये दहशतवादी हल्ले झाल्यानंतर दोन्ही देशांमधील चर्चा थांबल्या होत्या. त्या नव्याने सुरु करण्याचे प्रयत्न नुकते सुरु झाले होते. गेल्याच महिन्यात सिंधू नदी करारावर चर्चा करण्यासाठी भारताचं प्रतीनिधीमंडळ पाकिस्तानला गेलं होतं. मात्र आता पुन्हा दोन्ही देशांमधील सर्व प्रकारची देवाण - घेवाण थांबली आहे.  "इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयाने 17 एप्रिलला पाकिस्तान समुद्र सुरक्षा एनज्सी आणि भारतीय तटरक्षक दलात होणारी बैठक स्थगित करण्यात आली आहे, असं कळवलं असल्याची", माहिती पाकिस्तान उच्चायुक्तालयाचे प्रवक्ते ख्वाजा तारिक यांनी दिली आहे.
 
याआधी भारत आणि पाकिस्तानदरम्यान सिंधू पाणी करारसंबंधी होणारी चर्चा स्थगित करण्यात आली होती. अमेरिकेत 11 ते 13 एप्रिलदरम्यान ही चर्चा होणार होती. 
 
भारतीय तटरक्षक दल आणि पाकिस्तान समुद्र सुरक्षा एनज्सीमध्ये 2005 रोजी एक करार झाला होता. या करारानुसार दोन्ही देश एकमेकांना बेकायदेशीर जहाजं, सागरी प्रदूषण आणि नैसर्गित आपत्तीशी संबंधित गोष्टींची माहिती पुरवतील. 2016 मध्ये हा करार पाच वर्षांसाठी वाढवण्यात आला. याआधी जुलै महिन्यात भारतीय तटरक्षक दल आणि पाकिस्तान समुद्र सुरक्षा एनज्सीमध्ये शेवटची चर्चा झाली होती. 
 
हेरगिरीच्या आरोपांवरून भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेवर कोणतीही तडजोड न करण्याचा निर्णय पाकिस्तानच्या वरिष्ठ लष्करी जनरल्सनी गुरुवारी घेतला. जाधव यांना फाशी दिले गेले तर त्याचे द्विपक्षीय संबंधांवर अत्यंत गंभीर परिणाम होतील, असा इशारा भारताने आधीच दिलेला आहे. लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा यांच्या अध्यक्षतेखाली कोअर कमांडर्सची बैठक रावळपिंडीत झाली. त्यात कोणतीही तडजोड न करण्याचा निर्णय झाला. लष्कराच्या जनसंपर्क विभागाने निवेदनाद्वारे ही माहिती दिली.
 
कुलभूषण जाधव प्रकरणाची थोडक्यात माहिती जनरल्सना देण्यात आली व अशा देशविरोधी कृत्यांबद्दल कोणतीही तडजोड न करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे त्यात म्हटले आहे.